शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संख तहसीलची 'ती' १५ गावे पुन्हा 'जत'ला जोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 18:42 IST

जत जवळची अनेक गावे संख कार्यालयास जोडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.

जत : संख अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करताना जत जवळची अनेक गावे संख कार्यालयास जोडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वळसंग हे नवीन मंडल तयार करून त्याला गावे जोडण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार १५ गावे जतला जोडण्यात आल्याची माहिती आमदार विक्रम सावंत यांनी आज, शुक्रवारी दिली.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराय्या बिराजदार, मुचंडीचे सरपंच अशोक पाटील यांच्यासह जत आसपासच्या ग्रामस्थांनी संखऐवजी जतला गाव जोडावे असे सूचविले होते. जत जवळील १५ गावे संखऐवजी जत तहसीलला जोडावीत, अशी मागणी होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते.संख अप्पर तहसील कार्यालयास जोडले गेलेली सनमडी, घोलेश्वर, मायथळ, कुणीकोणूर, आबाचीवाडी, कोळगिरी, काराजनगी, वळसंग, मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी, शेड्याळ, सालेकेरी, सोरडी व दरीकोणूर ही गावे जत तहसील कार्यालयास जोडण्याबरोबरच या गावांसाठी वळसंग हे नवीन मंडल तयार करण्यात येणार आहे.त्याचबरोबर उर्वरित मंडलामधील गावांत फेरबदल प्रस्तावित आहे. यासंदर्भात दावे, हरकती उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी मागवून घेतल्या होत्या. गुरुवारी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.संखच्या अप्पर तहसील कार्यालयांतर्गत मुचंडी महसूल मंडल रद्द करण्यात येत असून सिद्धनाथ अंतर्गत सिद्धनाथ, जालीहाळ खुर्द व पांढरेवाडी अशी एक सजा व तीन गावे संख मंडलामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे संख मंडलामध्ये एकूण ६ सजे व १५ गावांचा समावेश राहील, असेही आ. सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली