शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

संख तहसीलची 'ती' १५ गावे पुन्हा 'जत'ला जोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 18:42 IST

जत जवळची अनेक गावे संख कार्यालयास जोडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.

जत : संख अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करताना जत जवळची अनेक गावे संख कार्यालयास जोडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वळसंग हे नवीन मंडल तयार करून त्याला गावे जोडण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार १५ गावे जतला जोडण्यात आल्याची माहिती आमदार विक्रम सावंत यांनी आज, शुक्रवारी दिली.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराय्या बिराजदार, मुचंडीचे सरपंच अशोक पाटील यांच्यासह जत आसपासच्या ग्रामस्थांनी संखऐवजी जतला गाव जोडावे असे सूचविले होते. जत जवळील १५ गावे संखऐवजी जत तहसीलला जोडावीत, अशी मागणी होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते.संख अप्पर तहसील कार्यालयास जोडले गेलेली सनमडी, घोलेश्वर, मायथळ, कुणीकोणूर, आबाचीवाडी, कोळगिरी, काराजनगी, वळसंग, मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी, शेड्याळ, सालेकेरी, सोरडी व दरीकोणूर ही गावे जत तहसील कार्यालयास जोडण्याबरोबरच या गावांसाठी वळसंग हे नवीन मंडल तयार करण्यात येणार आहे.त्याचबरोबर उर्वरित मंडलामधील गावांत फेरबदल प्रस्तावित आहे. यासंदर्भात दावे, हरकती उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी मागवून घेतल्या होत्या. गुरुवारी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.संखच्या अप्पर तहसील कार्यालयांतर्गत मुचंडी महसूल मंडल रद्द करण्यात येत असून सिद्धनाथ अंतर्गत सिद्धनाथ, जालीहाळ खुर्द व पांढरेवाडी अशी एक सजा व तीन गावे संख मंडलामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे संख मंडलामध्ये एकूण ६ सजे व १५ गावांचा समावेश राहील, असेही आ. सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली