शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सांगलीतून केरळला १४ टन अन्नपदार्थ प्रशासनाची मोहीम : जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:27 IST

केरळमध्ये महापुराच्या आपत्ती निवारणासाठी आता सांगली जिल्ह्यानेही पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी सोमवारी केरळला मदत पाठविण्याबाबत आवाहन केले आणि केवळ काही तासातच १४ टन खाद्यपदार्थ व तीन लाखाहून

सांगली : केरळमध्ये महापुराच्या आपत्ती निवारणासाठी आता सांगली जिल्ह्यानेही पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी सोमवारी केरळला मदत पाठविण्याबाबत आवाहन केले आणि केवळ काही तासातच १४ टन खाद्यपदार्थ व तीन लाखाहून अधिक निधी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाला. विशेष म्हणजे सोमवारी सायंकाळी बिस्किटे, दूध पावडर, भडंग घेऊन पहिला ट्रक रवानाही झाला. मंगळवारी आणखी मदत पाठविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

सोमवारी जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी समाजमाध्यमांतून केरळमधील नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यात कपडे व इतर साहित्य न देता केवळ पाकीटबंद खाद्यपदार्थ देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातून बिस्किट, दूध पावडर आणि भडंग अशा १३ हजार ९७० किलो अन्नपदार्थांचे बॉक्स प्रशासनाकडे जमा झाले. मदतीच्या संकलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष निर्माण करण्यात आला होता. तालुका पातळीवरही मदतीच्या संकलनासाठी मोहीम राबविण्यात आली.

सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी काळम पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मदत घेऊन जाणारा पहिला ट्रक पुण्याकडे रवाना झाला. पुणे येथून हा माल केरळला जाणार आहे. चितळे उद्योग समूहाने दूध पावडर, बाकरवडी आणि भडंग दिला. जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था व नागरिकांनीही यावेळी बिस्किटांचे बॉक्स जमा केले. निधी संकलनातही सोमवारी ३ लाख २१२ रुपये धनादेश व डीडीच्या स्वरूपात जमा झाले. यात खा. संजय पाटील यांनी ५१ हजार रूपये, हुतात्मा उद्योग समूहाने २५ हजार रूपये जमा केले.निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, मीनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, मिरजेचे तहसीलदार शरद पाटील, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.केरळच्या पूरग्रस्तांसाठी आटपाडीकरांची मदतआटपाडी : केरळमधील पूरग्रस्तांसाठी आटपाडीकरांनी ८२ हजार रुपयांसह एक टनाहून अधिक बिस्किटे जमा केली. यावेळी गावातून फेरी काढून मदतीचे आवाहन करण्यात आले. केरळ राज्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे. यात ३५० हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, यात जीवित हानीबरोबरच आर्थिक नुकसानही झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आटपाडीकर सरसावले आहेत. बिस्किटे व आर्थिक मदत करण्यासाठी ग्रामपंचायत, तहसीलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मदत फेरी काढण्यात आली. यावेळी एकूण १०७० किलो बिस्किटे, तसेच रोख २००१७ रुपये जमा झाले. तसेच राजेंद्र शिवाजी पाटील यांनी ५१ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, तर आटपाडी शहर डॉक्टर असोसिएशनकडून ११ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. अशी एकूण ८२ हजाराची रक्कम जमा झाली.मिरजेतून केरळच्या पूरग्रस्तांना मदत

मिरज : मिरजेहून केरळ येथील महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मिरजेतून औषधे, ब्लॅँकेट व खाद्यपदार्थ पाठविण्यात आले. सेवासदन रुग्णालयातील वैद्यकीय तंत्रज्ञ पॉल चॉको मिरजेतून रेल्वेने मदत घेऊन रवाना झाले. डॉ. रविकांत पाटील, डॉ. पाठक, मोहसीन बागवान, इस्माईल बेपारी, गौरव कोळ्ळोळी, बेला मानकर, सद्दाम शेख, सुनील मोरे, हर्षल, साजन यांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली. 

टॅग्स :SangliसांगलीKerala Floodsकेरळ पूर