शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

सांगलीतून केरळला १४ टन अन्नपदार्थ प्रशासनाची मोहीम : जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:27 IST

केरळमध्ये महापुराच्या आपत्ती निवारणासाठी आता सांगली जिल्ह्यानेही पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी सोमवारी केरळला मदत पाठविण्याबाबत आवाहन केले आणि केवळ काही तासातच १४ टन खाद्यपदार्थ व तीन लाखाहून

सांगली : केरळमध्ये महापुराच्या आपत्ती निवारणासाठी आता सांगली जिल्ह्यानेही पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी सोमवारी केरळला मदत पाठविण्याबाबत आवाहन केले आणि केवळ काही तासातच १४ टन खाद्यपदार्थ व तीन लाखाहून अधिक निधी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाला. विशेष म्हणजे सोमवारी सायंकाळी बिस्किटे, दूध पावडर, भडंग घेऊन पहिला ट्रक रवानाही झाला. मंगळवारी आणखी मदत पाठविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

सोमवारी जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी समाजमाध्यमांतून केरळमधील नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यात कपडे व इतर साहित्य न देता केवळ पाकीटबंद खाद्यपदार्थ देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातून बिस्किट, दूध पावडर आणि भडंग अशा १३ हजार ९७० किलो अन्नपदार्थांचे बॉक्स प्रशासनाकडे जमा झाले. मदतीच्या संकलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष निर्माण करण्यात आला होता. तालुका पातळीवरही मदतीच्या संकलनासाठी मोहीम राबविण्यात आली.

सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी काळम पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मदत घेऊन जाणारा पहिला ट्रक पुण्याकडे रवाना झाला. पुणे येथून हा माल केरळला जाणार आहे. चितळे उद्योग समूहाने दूध पावडर, बाकरवडी आणि भडंग दिला. जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था व नागरिकांनीही यावेळी बिस्किटांचे बॉक्स जमा केले. निधी संकलनातही सोमवारी ३ लाख २१२ रुपये धनादेश व डीडीच्या स्वरूपात जमा झाले. यात खा. संजय पाटील यांनी ५१ हजार रूपये, हुतात्मा उद्योग समूहाने २५ हजार रूपये जमा केले.निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, मीनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, मिरजेचे तहसीलदार शरद पाटील, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.केरळच्या पूरग्रस्तांसाठी आटपाडीकरांची मदतआटपाडी : केरळमधील पूरग्रस्तांसाठी आटपाडीकरांनी ८२ हजार रुपयांसह एक टनाहून अधिक बिस्किटे जमा केली. यावेळी गावातून फेरी काढून मदतीचे आवाहन करण्यात आले. केरळ राज्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे. यात ३५० हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, यात जीवित हानीबरोबरच आर्थिक नुकसानही झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आटपाडीकर सरसावले आहेत. बिस्किटे व आर्थिक मदत करण्यासाठी ग्रामपंचायत, तहसीलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मदत फेरी काढण्यात आली. यावेळी एकूण १०७० किलो बिस्किटे, तसेच रोख २००१७ रुपये जमा झाले. तसेच राजेंद्र शिवाजी पाटील यांनी ५१ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, तर आटपाडी शहर डॉक्टर असोसिएशनकडून ११ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. अशी एकूण ८२ हजाराची रक्कम जमा झाली.मिरजेतून केरळच्या पूरग्रस्तांना मदत

मिरज : मिरजेहून केरळ येथील महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मिरजेतून औषधे, ब्लॅँकेट व खाद्यपदार्थ पाठविण्यात आले. सेवासदन रुग्णालयातील वैद्यकीय तंत्रज्ञ पॉल चॉको मिरजेतून रेल्वेने मदत घेऊन रवाना झाले. डॉ. रविकांत पाटील, डॉ. पाठक, मोहसीन बागवान, इस्माईल बेपारी, गौरव कोळ्ळोळी, बेला मानकर, सद्दाम शेख, सुनील मोरे, हर्षल, साजन यांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली. 

टॅग्स :SangliसांगलीKerala Floodsकेरळ पूर