शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगली, कोल्हापूर, सोलापुरातून १३११ हरकती; लढ्याचे केंद्र कवलापूर

By संतोष भिसे | Updated: March 29, 2024 17:30 IST

महामार्गबाधितांचा कवलापुरात मेळावा

बुधगाव : नागपूर ते गोवा या नियोजित शक्तिपीठ महामार्गाविरोधातसांगली जिल्ह्यातून ६११, कोल्हापूरमधून ४५० आणि सोलापूर जिल्ह्यातून सुमारे २५० अशा एकूण १३११ हरकती २८ मार्चअखेर शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. त्याची सुनावणी प्रक्रिया लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी सुनावणीवेळी आक्रमक भूमिका मांडावी असे आवाहन महामार्गबाधितशेतकरी संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक दिगंबर कांबळे यांनी केले. महामार्ग बाधित पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मेळावा शुक्रवारी कवलापूर (ता. मिरज) येथे झाला. यावेळी समितीचे कांबळे म्हणाले, या मार्गाची कोणीही मागणी केलेली नसताना प्रक्रिया सुरु करणे अनाकलनीय आहे. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकऱ्यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मूठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या २२ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या, तरच शेतकरी संमती देतील.कांबळे म्हणाले, हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकऱ्यांची एकजुटच शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. सामाजिक सलोखाही तुटणार आहे. या मार्गामुळे फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होणार आहेत. त्यामुळे तो रद्द करावा.दरम्यान, सुनावणीदरम्यान शेतकऱ्यांचा एकसंधपणा दिसण्यासाठी कोणती भूमिका घ्यायची याचे मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात आले. भूषण गुरव यांनी प्रास्ताविक केले. घनशाम नलावडे, राहुल जमदाडे, प्रवीण पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. शरद पवार यांनी आभार मानले.

संघर्षाचा केंद्रबिंदू कवलापूरशक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या लढ्यात कवलापूरमधील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे लक्षात घेऊन या राज्यव्यापी लढ्याचे केंद्र कवलापूर येथेच राहील असा निर्णय झाला. घनशाम नलावडे (सांगली), सागर बिले (सोलापूर), दिलीप खोत (कोल्हापूर) यांच्या जिल्हा समन्वयकपदी निवडी करण्यात आल्या.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी