शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगली, कोल्हापूर, सोलापुरातून १३११ हरकती; लढ्याचे केंद्र कवलापूर

By संतोष भिसे | Updated: March 29, 2024 17:30 IST

महामार्गबाधितांचा कवलापुरात मेळावा

बुधगाव : नागपूर ते गोवा या नियोजित शक्तिपीठ महामार्गाविरोधातसांगली जिल्ह्यातून ६११, कोल्हापूरमधून ४५० आणि सोलापूर जिल्ह्यातून सुमारे २५० अशा एकूण १३११ हरकती २८ मार्चअखेर शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. त्याची सुनावणी प्रक्रिया लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी सुनावणीवेळी आक्रमक भूमिका मांडावी असे आवाहन महामार्गबाधितशेतकरी संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक दिगंबर कांबळे यांनी केले. महामार्ग बाधित पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मेळावा शुक्रवारी कवलापूर (ता. मिरज) येथे झाला. यावेळी समितीचे कांबळे म्हणाले, या मार्गाची कोणीही मागणी केलेली नसताना प्रक्रिया सुरु करणे अनाकलनीय आहे. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकऱ्यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मूठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या २२ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या, तरच शेतकरी संमती देतील.कांबळे म्हणाले, हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकऱ्यांची एकजुटच शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. सामाजिक सलोखाही तुटणार आहे. या मार्गामुळे फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होणार आहेत. त्यामुळे तो रद्द करावा.दरम्यान, सुनावणीदरम्यान शेतकऱ्यांचा एकसंधपणा दिसण्यासाठी कोणती भूमिका घ्यायची याचे मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात आले. भूषण गुरव यांनी प्रास्ताविक केले. घनशाम नलावडे, राहुल जमदाडे, प्रवीण पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. शरद पवार यांनी आभार मानले.

संघर्षाचा केंद्रबिंदू कवलापूरशक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या लढ्यात कवलापूरमधील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे लक्षात घेऊन या राज्यव्यापी लढ्याचे केंद्र कवलापूर येथेच राहील असा निर्णय झाला. घनशाम नलावडे (सांगली), सागर बिले (सोलापूर), दिलीप खोत (कोल्हापूर) यांच्या जिल्हा समन्वयकपदी निवडी करण्यात आल्या.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी