शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

टेंभू योजनेसाठी १२०३ कोटी मंजूर : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:45 IST

सांगली : महाराष्टÑातील सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून, टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी १२०३ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीस बुधवारी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. २०१९ पर्यंत या निधीअंतर्गत कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.दिल्ली येथे सिंचन योजनांबाबत झालेल्या बैठकीस कृष्णा खोरे विकास ...

ठळक मुद्देउरमोडी प्रकल्पासाठी ४८३ कोटी; दिल्लीतील बैठकीत नितीन गडकरी यांनी दिली मान्यता

सांगली : महाराष्टÑातील सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून, टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी १२०३ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीस बुधवारी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. २०१९ पर्यंत या निधीअंतर्गत कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

दिल्ली येथे सिंचन योजनांबाबत झालेल्या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार राजेंद्र गावित, आमदार कपिल पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीविषयी संजयकाका पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, नितीन गडकरींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून टेंभू योजनेसाठी भरीव निधी मंजूर झाला आहे. बळीराजा जल संजीवनी योजनेतून महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील ८ प्रमुख सिंचन योजनांकरिता १३ हजार ६५१ कोटी ६१ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या निधीमुळे या सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील ७ लाख ६८ हजार ३७५ एकर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे. यातील टेंभू उपसा सिंचन सिंचन योजनेकरिता बळीराजा जल संजीवनी योजनेतून आता १२०३ कोटी रुपये निधीची तरतूद केलेली असून यामुळे २ लाख ४० हजार ७९८ एकर इतक्या लाभक्षेत्राला फायदा होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील उरमोडी सिंचन प्रकल्पासाठी याच योजनेतून ४८३.०१ कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील ६० हजार ९३० एकर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे.

या भरीव तरतुदीमुळे बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या सिंचन योजना पूर्णत्वाकडे जाऊन, सततच्या दुष्काळी परिस्थितीचा कलंक कायमचा पुसण्यास मदत होणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारकडे भविष्यातही पाठपुरावा करून मे २०१९ पर्यंत हे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार असेल, असेही संजयकाका पाटील यांनी यावेळी सांगितले.वंचित गावांना लाभकृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजयकाका पाटील म्हणाले, बळीराजा जल संजीवनी योजनेच्या माध्यमातून खºयाअर्थाने पश्चिम महाराष्टÑातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली आहे. येत्या २०१९ पर्यंत यातील सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. जतपर्यंतची कामे पूर्ण करतानाच योजनेपासून वंचित गावांनाही सामावून घेण्यात येईल.

टॅग्स :SangliसांगलीNitin Gadkariनितीन गडकरीfundsनिधी