शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

पोलीस भरतीत १०० गुणांच्या लेखी परीक्षेने ग्रामीण टक्का घसरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:16 IST

पुरेशा मार्गदर्शनाअभावी लेखी परीक्षेत दांडी उडते, परिणामी पोलीस खात्यात ग्रामीण महाराष्ट्राचा टक्का घसरण्याची भीती

संतोष भिसेसांगली : पोलीस भरतीत १०० गुणांच्या लेखी परीक्षेमुळे ग्रामीण तरुण भरती प्रक्रियेतून बाहेर फेकले जात आहेत. पुरेशा मार्गदर्शनाअभावी लेखी परीक्षेत दांडी उडते, परिणामी पोलीस खात्यात ग्रामीण महाराष्ट्राचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा ५० गुणांची करण्याची मागणी होत आहे.पोलिसात शहरी तरुण आणि अधिकाऱ्यांचाच भरणा झाल्यास सामाजिक समतोल ढासळण्याची भीती आहे. ग्रामीण मुले शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही खाकी वर्दी पासून वंचित राहत आहेत. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या काळात मैदानी चाचणी १०० गुणांची होती. लेखी ७५ गुणांची व मुलाखत २५ गुणांसाठी होती. मुलाखतीत संशयास्पद प्रकाराच्या शक्यतेने २०१० मध्ये ती पद्धत बंद करण्यात आली. लेखी व मैदानी चाचण्या प्रत्येकी १०० गुणांच्या केल्या.

नंतर फडणवीस सरकारने मैदानी ५० व लेखी चाचणी १०० गुणांची केली. त्यामुळे ग्रामीण तरुणांची मोठी पीछेहाट झाली. महाविकास आघाडी सरकारने पॅटर्न पुन्हा १००-१०० गुणांचा केला. २०२१ मधील परीक्षांमध्ये हाच पॅटर्न राहिला. आता तोदेखील बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.परीक्षांचा बदलता पॅटर्न ग्रामीण तरुणांना त्रासदायी ठरत आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम असतानाही लेखी परीक्षेत दांडी उडते. ग्रामीण भागात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत नाही. शिकवणीही लावता येत नाही. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीवरच भर असतो, पण लेखी परीक्षेचा टप्पा पार करण्यात अयशस्वी ठरतात. त्यामुळे लेखी परीक्षा ५० गुणांची करण्याची मागणी आहे.

१०० गुणांच्या लेखी परीक्षेने ग्रामीण तरुण भरतीतून बाहेर पडतात, त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करायला हवा. १०० गुणांची मैदानी चाचणी प्रथम घ्यावी, त्यात उत्तीर्ण झालेल्यांचीच लेखी परीक्षा घ्यावी. यामुळे ग्रामीण तरुणांनाही क्षमता दाखविता येईल. - प्रा. रणजीत चव्हाण, पोलीस भरती मार्गदर्शक, सांगली.

२०१९ पूर्वीच्या पोलीस भरतीत १०० गुणांची मैदानी व नंतर ५० गुणांची लेखी परीक्षा व्हायची. त्यानंतर मात्र दोन्ही परीक्षा १०० गुणांच्या केल्या. मैदानी चाचणी नंतर घेतली जाते. ग्रामीण भागात मार्गदर्शन केंद्रांअभावी तरुण मागे पडतात. शहरी विद्यार्थी लेखी परीक्षेत बाजी मारतात. ग्रामीण उमेदवार मैदानी परीक्षेत सक्षम व पात्र असूनही लेखी परीक्षेच्या फेरीत बाहेर फेकले जातात. नवा पॅटर्न ग्रामीण तरुणांवर अन्यायकारक आहे. तो बंद करावा. - संगीता खटावकर, राज्य कार्यकारिणी सदस्या, पुरोगामी संघर्ष परिषद.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस