शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीत १०० गुणांच्या लेखी परीक्षेने ग्रामीण टक्का घसरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:16 IST

पुरेशा मार्गदर्शनाअभावी लेखी परीक्षेत दांडी उडते, परिणामी पोलीस खात्यात ग्रामीण महाराष्ट्राचा टक्का घसरण्याची भीती

संतोष भिसेसांगली : पोलीस भरतीत १०० गुणांच्या लेखी परीक्षेमुळे ग्रामीण तरुण भरती प्रक्रियेतून बाहेर फेकले जात आहेत. पुरेशा मार्गदर्शनाअभावी लेखी परीक्षेत दांडी उडते, परिणामी पोलीस खात्यात ग्रामीण महाराष्ट्राचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा ५० गुणांची करण्याची मागणी होत आहे.पोलिसात शहरी तरुण आणि अधिकाऱ्यांचाच भरणा झाल्यास सामाजिक समतोल ढासळण्याची भीती आहे. ग्रामीण मुले शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही खाकी वर्दी पासून वंचित राहत आहेत. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या काळात मैदानी चाचणी १०० गुणांची होती. लेखी ७५ गुणांची व मुलाखत २५ गुणांसाठी होती. मुलाखतीत संशयास्पद प्रकाराच्या शक्यतेने २०१० मध्ये ती पद्धत बंद करण्यात आली. लेखी व मैदानी चाचण्या प्रत्येकी १०० गुणांच्या केल्या.

नंतर फडणवीस सरकारने मैदानी ५० व लेखी चाचणी १०० गुणांची केली. त्यामुळे ग्रामीण तरुणांची मोठी पीछेहाट झाली. महाविकास आघाडी सरकारने पॅटर्न पुन्हा १००-१०० गुणांचा केला. २०२१ मधील परीक्षांमध्ये हाच पॅटर्न राहिला. आता तोदेखील बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.परीक्षांचा बदलता पॅटर्न ग्रामीण तरुणांना त्रासदायी ठरत आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम असतानाही लेखी परीक्षेत दांडी उडते. ग्रामीण भागात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत नाही. शिकवणीही लावता येत नाही. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीवरच भर असतो, पण लेखी परीक्षेचा टप्पा पार करण्यात अयशस्वी ठरतात. त्यामुळे लेखी परीक्षा ५० गुणांची करण्याची मागणी आहे.

१०० गुणांच्या लेखी परीक्षेने ग्रामीण तरुण भरतीतून बाहेर पडतात, त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करायला हवा. १०० गुणांची मैदानी चाचणी प्रथम घ्यावी, त्यात उत्तीर्ण झालेल्यांचीच लेखी परीक्षा घ्यावी. यामुळे ग्रामीण तरुणांनाही क्षमता दाखविता येईल. - प्रा. रणजीत चव्हाण, पोलीस भरती मार्गदर्शक, सांगली.

२०१९ पूर्वीच्या पोलीस भरतीत १०० गुणांची मैदानी व नंतर ५० गुणांची लेखी परीक्षा व्हायची. त्यानंतर मात्र दोन्ही परीक्षा १०० गुणांच्या केल्या. मैदानी चाचणी नंतर घेतली जाते. ग्रामीण भागात मार्गदर्शन केंद्रांअभावी तरुण मागे पडतात. शहरी विद्यार्थी लेखी परीक्षेत बाजी मारतात. ग्रामीण उमेदवार मैदानी परीक्षेत सक्षम व पात्र असूनही लेखी परीक्षेच्या फेरीत बाहेर फेकले जातात. नवा पॅटर्न ग्रामीण तरुणांवर अन्यायकारक आहे. तो बंद करावा. - संगीता खटावकर, राज्य कार्यकारिणी सदस्या, पुरोगामी संघर्ष परिषद.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस