शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 17:39 IST

महापूर, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी कराकाँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये वाद रंगला

सांगली : महापूर, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केला. तसेच विकास कामाच्या उद्घाटनासाठी ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना बोलावत नाहीत, यावरुन भाजप व काँग्रेस सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी, विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास सदस्यांना बोलाविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, ब्रम्हदेव पडळकर, तम्मणगौडा रवी-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे आदी उपस्थित होते.सभेत जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी, दुष्काळ, महापूर आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शंभर टक्के कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशा मागणीचा ठराव मांडला. त्यास जितेंद्र पाटील यांनी पाठिंबा देत, तो सभागृहाने मंजूर करण्याची मागणी केली. यावर संग्रामसिंह देशमुख यांनी, ठराव मंजूर करुन शासनाकडे पाठवू, असे आश्वासन दिले.डी. के. पाटील, प्रमोद शेंडगे यांनी, ग्रामपंचायतीला विविध योजनेतून निधी जिल्हा परिषदेतून दिला जातो. या विकास कामांच्या उद्घाटनाला ग्रामपंचायत सदस्यांना बोलावत नाहीत, याबद्दल नाराजी व्यक्त केली.

पाटील, शेंडगे यांनी समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांनाही जाब विचारला. यावर काँग्रेसचे सदस्य जितेंद्र पाटील यांनी, ग्रामपंचायतीनी विकास कामाच्या उद्घाटनाला कुणाला बोलवायचे, हा त्यांचा अधिकार आहे. सदस्यांना उद्घाटनास बोलविले नाही, म्हणून त्यांनी सभागृहात या विषयावर चर्चा करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. यावरून काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये वाद रंगला. अखेर राष्ट्रवादीचे सदस्य संभाजी कचरे यांनी, जितेंद्र पाटील व प्रमोद शेंडगे यांना शांत करुन वादावर पडदा टाकला.संग्रामसिंह देशमुख यांनी, ग्रामपंचायतीचा निर्णय काहीही असो, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी विकास कामाच्या उद्घाटनाला जि. प. सदस्य व पंचायत समिती सदस्यांना बोलाविले पाहिजे. पत्रिकेतही नाव घातले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली