शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 17:39 IST

महापूर, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी कराकाँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये वाद रंगला

सांगली : महापूर, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केला. तसेच विकास कामाच्या उद्घाटनासाठी ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना बोलावत नाहीत, यावरुन भाजप व काँग्रेस सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी, विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास सदस्यांना बोलाविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, ब्रम्हदेव पडळकर, तम्मणगौडा रवी-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे आदी उपस्थित होते.सभेत जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी, दुष्काळ, महापूर आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शंभर टक्के कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशा मागणीचा ठराव मांडला. त्यास जितेंद्र पाटील यांनी पाठिंबा देत, तो सभागृहाने मंजूर करण्याची मागणी केली. यावर संग्रामसिंह देशमुख यांनी, ठराव मंजूर करुन शासनाकडे पाठवू, असे आश्वासन दिले.डी. के. पाटील, प्रमोद शेंडगे यांनी, ग्रामपंचायतीला विविध योजनेतून निधी जिल्हा परिषदेतून दिला जातो. या विकास कामांच्या उद्घाटनाला ग्रामपंचायत सदस्यांना बोलावत नाहीत, याबद्दल नाराजी व्यक्त केली.

पाटील, शेंडगे यांनी समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांनाही जाब विचारला. यावर काँग्रेसचे सदस्य जितेंद्र पाटील यांनी, ग्रामपंचायतीनी विकास कामाच्या उद्घाटनाला कुणाला बोलवायचे, हा त्यांचा अधिकार आहे. सदस्यांना उद्घाटनास बोलविले नाही, म्हणून त्यांनी सभागृहात या विषयावर चर्चा करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. यावरून काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये वाद रंगला. अखेर राष्ट्रवादीचे सदस्य संभाजी कचरे यांनी, जितेंद्र पाटील व प्रमोद शेंडगे यांना शांत करुन वादावर पडदा टाकला.संग्रामसिंह देशमुख यांनी, ग्रामपंचायतीचा निर्णय काहीही असो, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी विकास कामाच्या उद्घाटनाला जि. प. सदस्य व पंचायत समिती सदस्यांना बोलाविले पाहिजे. पत्रिकेतही नाव घातले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली