शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

नात्यात कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'या' गोष्टींचा विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:02 AM

हल्लीच्या काळात तुम्हाला प्रेम सहज मिळतं पण ते नातं जपणं फार अवघड असतं. बिजी लाइफस्टाइलमुळे अनेकदा लोक आपल्या पार्टनरसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा नातं दीर्घकाळ टिकणं अशक्य होतं.

हल्लीच्या काळात तुम्हाला प्रेम सहज मिळतं पण ते नातं जपणं फार अवघड असतं. बिजी लाइफस्टाइलमुळे अनेकदा लोक आपल्या पार्टनरसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा नातं दीर्घकाळ टिकणं अशक्य होतं. एवढचं नाहीतर पार्टनरचं इतर लोकांसोबत मिळून मिसळून राहण्यामुळेही नात्यामध्ये खटके उडतात. परंतु, नातं तुटल्यामुळे दोन लोकांच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम दिसून येतो. हे चांगलं आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचं असू शकतं. जर तुम्हालाही असं वाटतं असेल की, आपलं रिलेशनशिप बराच वेळ टिकत नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही कारणं सांगणार आहोत. वेळीच ही कराणं लक्षात घेऊन तुम्ही तुमचं नातं तुटण्यापासून वाचवू शकता. 

सतत बिझी राहणं तुमची असेल सवय तर... 

जर तुम्हाला आपल्या कामामध्ये सतत बिझी राहायला आवडत असेल आणि यामध्ये तुम्ही तुमच्या नात्याकडे दुर्लक्षं करत आहात का? तसेच आपल्या पार्टनरशी न बोलणं त्याला वेळ न देणं यांसारख्या चुका करत असाल तर असं करणं वेळीच टाळा. यामुळे तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं. 

नवीन ठिकाणी पार्टनरचा विसर पडणं

अनेक लोकांना नवीन ठिकाणी फिरायला फार आवडतं. परंतु, त्या ठिकाणी गेल्यावर ते आपल्या जवळच्या लोकांना किंवा पार्टनरला विसरून जातात. तुम्हीही असं करत असाल तर असं करणं वेळीच थांबवा. 

ऑनलाइन असूनही पार्टनरला मेसेज न करणं  

सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. इंटरनेटवर मित्रमैत्रिणी भेटतातच पण इंटरनेटवर आयुष्यभरासाठीची नातीही जोडली जातात. अशातच एखाद्या व्यक्तीला स्टॉक करणं अत्यंत सोपं आहे. जर तुम्ही ऑनलाइन आल्यानंतर आपल्या पार्टनरला मेसेज करत नसाल तर हे कारण तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकतं. याचा अर्थ असा नाही की, ऑनलाईन आल्यावर प्रत्येक वेळी पार्टनरला मेसेज करावा. पण तुमच्या बिझी शेड्यूलमधून पार्टनरसाठी वेळ देऊन तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. 

रिस्पॉन्स देणं आहे गरजेचं 

जर तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकत असाल पण त्यांचं म्हणणं तुम्हाला समजत नसेल तर या कारणामुळेही तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं. तुम्हाला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकून व्यवस्थित समजुन घेणं आवश्यक आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर रिस्पॉन्स करणं आवश्यक आहे. 

त्यांच्या निर्णयाला महत्त्व देणं

अनेकदा तुम्ही पार्टनरचं म्हणणं ऐकत नाही. तसेच त्यांच्या निर्णयाचा मान राखत नाही. दरवेळी तुम्ही स्वतःची मनमानी करता. जर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर राकला नाही तर त्यांनाही राग येऊ शकतो. आधी त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर ते चूक की बरोबर ते सोडवा. तसेच कोणत्याही गोष्टीबाबत बोलून तुम्ही मार्ग काढू शकता. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व