शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 13:02 IST

'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' हे आपण सारेच जाणतो. पु.लंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकातून याचा प्रत्यय आपल्या सर्वांनाच येत असतो. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती असतात.

(Image credit : Разноблог)

'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' हे आपण सारेच जाणतो. पु.लंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकातून याचा प्रत्यय आपल्या सर्वांनाच येत असतो. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती असतात. सर्वांच्या स्वभावामध्ये आपल्याला काहीना काही बदल दिसून येत असतात. एवढचं नाहीतर काही व्यक्ती अशाही असतात. ज्या परिस्थितीनुसार आपल्या स्वभावामध्ये बदल करतात. पण हे सर्वांना जमतं अस नाही. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणं अनेकांना जमत नाही. अनेक व्यक्ती अशा असतात, ज्या अजिबात मागचा-पुडचा विचार न करता आपल्या मनातील गोष्टी इतरांना सांगतात. तर काही व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी कोणलाच सांगत नाहीत.

आज आम्ही तुम्हाला अशा राशीच्या व्यक्तींबाबत सांगणार आहोत. ज्या स्वतःमध्ये कोणत्याही परिस्थितीनुसार बदल घडवून आणतात. एवढंच नाहीतर त्या आपलं दुःख कोणालाच सांगत नाहीत. तसेच मनातील गोष्टीही इतरांना सांगताना फार विचार करतात. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींचा यामध्ये समावेश होतो त्याबाबत... 

कर्क राशी 

कर्क राशीच्या व्यक्ती आपलं मन सहजासहजी कोणासमोर मोकळं करत नाहीत. त्या आपल्या मनातील गोष्टी, प्रॉब्लेम्स कोणाला सांगण्याऐवजी स्वतःच्या मनातच ठेवतात. या राशीच्या व्यक्ती फार सेन्सिटिव्ह आणि इमोशनल असतात. या राशीच्या व्यक्तींबाबत सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे, या ज्यांच्यावर प्रेम करतात, त्यांना कधीच संकटात किंवा दुःखात पाहू शकत नाहीत. कदाचित याच कारणामुळे आपल्या समस्या आणि दुःख ते कोणासोबत शेअर करत नाहीत. या व्यक्तींच्या मनातल्या गोष्टी ओळखणं अत्यंत आवघड असतं. कारण या व्यक्ती कितीही संकटात असल्या तरि त्यांच्या चेहऱ्यावर ते अजिबात जाणवू देत नाहीत. या राशीच्या व्यक्तींसाठी प्रत्येक नात्याचं वेगळं अस्तित्व आणि महत्त्व असतं. या प्रत्येक नातं जपायला आवडतं. 

कन्या राशी

कन्या राशीच्या व्यक्ती कधीच स्वतःला परिपूर्ण समजत नाहीत. कोणत्याही बाबतीत ते कधीच दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीवर आरोप लावत नाहीत. ते नेहमी स्वतःलाच दोषी समजतात. तुम्हाला वाटेल की, त्यांच्या या गुणामुळे त्यांना प्रत्येकवेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल. पण त्यांच्या या गुणांमुळे त्यांना अनेक फायदेही होतात. कारण आपल्यातील दुर्गुण शोधून ते दूर करण्यासाठी कन्या राशीच्या व्यक्ती सतत प्रयत्नशील असतात. आपल्या गोष्टी या व्यक्ती सहजासहजी कोणाला सांगत नाहीत. एवढचं नाहीतर हे आनंदी आहेत की, दुःखी आहेत याचा शोध तुम्ही त्यांना भेटल्यावरही लावू शकत नाहीत. तसेच आपल्यातील कमतरता दूर करण्याच्या प्रयत्नात ते फार विचारात जातात. तुम्ही त्यांना कितीही समजावलं तरिही ते लवकर समजून घेत नाहीत. 

वृश्चिक राशी

अनेक लोकांचा असा समज असतो की, त्यांचे प्रॉब्लेम्स कोणीही चटकन दूर करू शकत नाही. असाच काहीसा विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा समावेश होतो. या राशीच्या व्यक्ती जास्त सोशल नसतात. या व्यक्तींना लोकांना भेटणं जास्त आवडत नाही. या व्यक्ती आपला आनंद कोणाशीही शेअर करत नाहीत. या स्वतःला आपल्यापर्यंतंच मर्यादित ठेवतात. 

कुंभ राशी 

आपलं दुःख कितीही मोठं असलं तरिही ते कोणालाही न दाखवणं या राशीच्या व्यक्तींना अगदी उत्तम प्रकारे येतं. कुंभ राशीच्या व्यक्ती कोणतीही परिस्थिती गंभीरपणे हाताळतात. एवढचं नाहीतर या व्यक्ती अत्यंत सावधपणे आपल्या समस्यांचं निवारण करतात. त्या कधीही आपल्या भावनांचा दिखावा करत नाहीत. 

टिप : वरील सर्व गोष्टी या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यPersonalityव्यक्तिमत्वRelationship Tipsरिलेशनशिप