शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'या' तीन गोष्टी नात्याला करतात असुरक्षित; वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 15:16 IST

काही लोकांना त्यांचा पार्टनर फोनवर जास्त बिझी राहिल्याने त्याच्यावर शंका येते. पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात काही मित्र, नातेवाईक आणि लोक असतीलच ज्यांच्याशी तो किंवा ती बोलत असले.

जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यावर संशय करत असेल किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रश्न विचारत असेल तर तो असं वागण्याचं कारण म्हणजे त्याला असुरक्षित वाटतंय. जर तुम्ही अशावेळी त्याला किंवा विश्वास देऊ शकले नाही तर हे नातं तुटू शकतं. अशाच तीन गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की, तुमच्या पार्टनरला नात्याबाबत असुरक्षितता वाटत आहे. हे संकेत वेळी ओळखले तर तुम्ही नातं तुटण्यापासून वाचवू शकता. 

सतत फोन बिझी का असतो?

काही लोकांना त्यांचा पार्टनर फोनवर जास्त बिझी राहिल्याने त्याच्यावर शंका येते. पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात काही मित्र, नातेवाईक आणि लोक असतीलच ज्यांच्याशी तो किंवा ती बोलत असले. तुम्ही त्याच्या लाइफमध्ये आल्यावर तो ती नाती तर तोडू शकत नाही ना. जर तुम्हाला खरंच काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही दोघांनी यावर संवाद साधला पाहिजे. 

दिवसभर ऑनलाइन राहतो, काय करतो?

आजकाल अनेक नाते हे सोशल मीडियावर तयार होतात. कधी कधी तर ही नाती तयार झाल्यावरही काही लोक सोशल मीडियातच अधिक वेळ घालवतात. अशात जेव्हा नातं नवं नवं असतं तेव्हा आपल्या सोबतच त्याने किंवा तिने बोलावं असं वाटत असतं. पण यामुळे गैरसमजही होऊ शकतात. अनेकांना असं वाटत असतं की, पार्टनर त्यांना इग्नोर करतोय. पण तसं नसेल तर नातं गैरसमजामुळे अडचणीत येऊ शकतं. 

मित्रांनी मित्रासारखं रहावं

अनेकदा जेव्हा पार्टनर आपल्या मित्रांसोबत मोकळेपणाने हसतात आणि बोलतात, एकटे फिरायला जातात किंवा त्यांच्या घरी थांबतात या गोष्टी वाईट वाटू लागतात. अशात तुमचं डोकं मित्राच्या लिमिटबाबत विचार करू लागतं. पण मुळात असं असतं की, मैत्रिच्या नात्यात कोणतीही लिमिट नसते. अशावेळी गैरसमजातून अशा काही गोष्टी बोलल्या जातात ज्यामुळे पार्टनर्सला वाईट वाटून जातं. याने नातं अडचणीत येतं. त्यामुळे आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवा आणि कोणताही ठोस पुरावा असल्याशिवाय गैरसमज करून घेऊ नका.

गैरसमज दूर होणे गरजेचे

असे कितीतरी गैरसमज आहेत ज्यामुळे अनेकांचं नातं सुरू होण्यापूर्वी बिघडायला लागतं. त्यामुळे अशा वाईट गोष्टी मनात येऊ देऊ नका आणि पार्टनरला असं काही बोलू नका ज्यामुळे त्यांना हर्ट होईल. काही वेळी पार्टनरबाबत तुम्हाला येणारी शंका बरोबरही असू शकते, पण अशावेळी पार्टनरसोबत थेट बोलावं. स्वत:हून काही शोधण्याच्या नादात तुम्ही नातं अडचणीत आणू शकता. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप