शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

'या' तीन गोष्टी नात्याला करतात असुरक्षित; वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 15:16 IST

काही लोकांना त्यांचा पार्टनर फोनवर जास्त बिझी राहिल्याने त्याच्यावर शंका येते. पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात काही मित्र, नातेवाईक आणि लोक असतीलच ज्यांच्याशी तो किंवा ती बोलत असले.

जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यावर संशय करत असेल किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रश्न विचारत असेल तर तो असं वागण्याचं कारण म्हणजे त्याला असुरक्षित वाटतंय. जर तुम्ही अशावेळी त्याला किंवा विश्वास देऊ शकले नाही तर हे नातं तुटू शकतं. अशाच तीन गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की, तुमच्या पार्टनरला नात्याबाबत असुरक्षितता वाटत आहे. हे संकेत वेळी ओळखले तर तुम्ही नातं तुटण्यापासून वाचवू शकता. 

सतत फोन बिझी का असतो?

काही लोकांना त्यांचा पार्टनर फोनवर जास्त बिझी राहिल्याने त्याच्यावर शंका येते. पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात काही मित्र, नातेवाईक आणि लोक असतीलच ज्यांच्याशी तो किंवा ती बोलत असले. तुम्ही त्याच्या लाइफमध्ये आल्यावर तो ती नाती तर तोडू शकत नाही ना. जर तुम्हाला खरंच काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही दोघांनी यावर संवाद साधला पाहिजे. 

दिवसभर ऑनलाइन राहतो, काय करतो?

आजकाल अनेक नाते हे सोशल मीडियावर तयार होतात. कधी कधी तर ही नाती तयार झाल्यावरही काही लोक सोशल मीडियातच अधिक वेळ घालवतात. अशात जेव्हा नातं नवं नवं असतं तेव्हा आपल्या सोबतच त्याने किंवा तिने बोलावं असं वाटत असतं. पण यामुळे गैरसमजही होऊ शकतात. अनेकांना असं वाटत असतं की, पार्टनर त्यांना इग्नोर करतोय. पण तसं नसेल तर नातं गैरसमजामुळे अडचणीत येऊ शकतं. 

मित्रांनी मित्रासारखं रहावं

अनेकदा जेव्हा पार्टनर आपल्या मित्रांसोबत मोकळेपणाने हसतात आणि बोलतात, एकटे फिरायला जातात किंवा त्यांच्या घरी थांबतात या गोष्टी वाईट वाटू लागतात. अशात तुमचं डोकं मित्राच्या लिमिटबाबत विचार करू लागतं. पण मुळात असं असतं की, मैत्रिच्या नात्यात कोणतीही लिमिट नसते. अशावेळी गैरसमजातून अशा काही गोष्टी बोलल्या जातात ज्यामुळे पार्टनर्सला वाईट वाटून जातं. याने नातं अडचणीत येतं. त्यामुळे आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवा आणि कोणताही ठोस पुरावा असल्याशिवाय गैरसमज करून घेऊ नका.

गैरसमज दूर होणे गरजेचे

असे कितीतरी गैरसमज आहेत ज्यामुळे अनेकांचं नातं सुरू होण्यापूर्वी बिघडायला लागतं. त्यामुळे अशा वाईट गोष्टी मनात येऊ देऊ नका आणि पार्टनरला असं काही बोलू नका ज्यामुळे त्यांना हर्ट होईल. काही वेळी पार्टनरबाबत तुम्हाला येणारी शंका बरोबरही असू शकते, पण अशावेळी पार्टनरसोबत थेट बोलावं. स्वत:हून काही शोधण्याच्या नादात तुम्ही नातं अडचणीत आणू शकता. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप