शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लग्नाचा निर्णय घेण्यासाठी लोक किती दिवसांचा वेळ घेतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 16:15 IST

नुकतंच निक जोनास आणि प्रियांका चोप्रा या बहुचर्चीत जोडप्याचा शाही विवाह पार पडला. पण अजूनही त्यांच्या चाहत्यांना एका प्रश्नाने छळलं आहे.

नुकतंच निक जोनास आणि प्रियांका चोप्रा या बहुचर्चीत जोडप्याचा शाही विवाह पार पडला. पण अजूनही त्यांच्या चाहत्यांना एका प्रश्नाने छळलं आहे. तो म्हणजे केवळ सहा महिने डेटिंग करुन या दोघांनी लग्नाचा निर्णय कसा घेतला? यावर निक जोनासला विचारलं गेलं तर त्याने सांगितलं की, 'आमच्या दोघांच्याही आई-वडिलांनी लवकर लग्न केलं होतं. जेव्हा तुम्हाला कळतं की ही योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती आहे. तेव्हा तुम्हाला आपोआप जाणवतं'.

लग्न करण्याचा निर्णय घेणं ही कुणासाठीही वेळखाऊ आणि गंभीर प्रोसेस आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातूनही हे समोर आलं आहे. यातून समोर आलं आहे की, एखादी व्यक्ती लग्नासाठी योग्य आहे अथवा नाही, याचा निर्णय घेण्यासाठी लोक साधारण सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ घेतात.  

हे जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी यूनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील २ हजार रिलेशनशिपमध्ये असलेल्या आणि नसलेल्या लोकांना काही प्रश्न विचारले. त्यांना विचारण्यात आलं होतं की, ते किती दिवस आणि किती डेटनंतर हे ठरवतात किंवा ठरवतील की त्यांना समोरची व्यक्ती आवडते आणि हे नातं पुढे जाऊ शकतं. 

यातून अभ्यासकांना हे आढळलं की, रिलेशनशिपमध्ये असणारे लोक हे सरासरी १७२ दिवस हे ठरवण्यासाठी वेळ घेतात की, त्यांना पार्टनरसोबत लग्न करायचं आहे की नाही. तर सिंगल असणारे लोक हाच निर्णय घेण्यासाठी साधारण २१० दिवस वेळ घेतात. 

तज्ज्ञ याबाबत त्यांचं मत सांगतात की, हनीमूनचा मडू हा साधारण ३ महिने कायम असतो आणि त्यानंतर लोक आपलं खरं रुप दाखवायला लागतात. यानंतरच दोघांनाही एकमेकांच्या चांगल्या-वाईट सवयी माहीत व्हायला लागतात. तज्ज्ञांनी हेही सांगितलं की, असा काही आयुष्य बदलवणारा निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या आतून येणाऱ्या भावना ओळखता यायला हव्यात. 

या अभ्यासात सहभागी काही लोकांनी सांगितले की, पाच वाईट इंटरॅक्शननंतर ते कुणी आवडलं की नाही याचा निर्णय घेतात. पण रिसर्च सांगतो की, यासाठी पाच नाही तर केवळ ३ वाईट इंटरॅक्शनच फार आहेत.  

टॅग्स :marriageलग्नrelationshipरिलेशनशिप