शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

...म्हणून नात्यामध्ये दुःखी असूनही नातं जपण्यासाठी झटत राहतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 12:40 IST

प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच.

प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच. एवढचं नाहीतर नात्यामध्ये चढउतारही येतात. कधीकधी तर अशी परिस्थिती उद्भवते की, त्यामध्ये नात्याबाबात टोकाचा निर्णयही घ्यावा लागतो. पण तरिही अनेकजण या परिस्थितीतून मार्ग काढतात आणि आपलं नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. 

मग प्रश्न असा उद्भवतो की, ज्यामध्ये प्रेम नाही किंवा नुसतं भांडणं होतात. तर लोक का असं नातं टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात? अनेकांना हा प्रश्न पडतो. त्यांच्या याच प्रश्नाचं उत्तर काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. 

पर्सनॅलिटी आणि सोशल सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, जास्तीत जास्त लोक रोमॅन्टिक नसतानाही आपल्या पार्टनरसाठी नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा नात्यामध्ये दुःखी असूनही ते नातं तोडण्याचा निर्णय घेतं नाहीत. कारण त्यांना वाटत असतं की, असं केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम त्यांच्या पार्टनरवर होऊ शकतो. 

जेव्हा जोडीदार नात्यावरच अवलंबून असेल 

जेव्हा लोक रिलेशनशिप संपवण्याचा विचार करतात. तेव्हा त्यांना असं वाटतं की, कदाचित त्यांचा जोडीदार हे नातं जपण्याचा विचार करत आहे. याचमुळे ते आपल्या पार्टनरचा विचार करतात आणि ब्रेकअप करत नाहीत. संशोधक ऑथर सामंथा जोएल यांनी सांगितलं की, 'रिलेशनशिपवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवतात आणि त्या ब्रेकअपचा विचारही करत नाहीत.'

तज्ज्ञांचं म्हणणं... 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या पार्टनरसोबत ब्रेकअप करणं फार कठिण असतं. एवढचं नाहीतर जर रिलेशनमधील एक पार्टनर आपल्या नात्यामध्ये खूश असेल आणि दुसरा त्या नात्याला कंटाळला असेल तर अशावेळी ब्रेकअप करणं अत्यंत कठिण होतं. 

इतर संशोधनांनुसार...

इतर संशोधनांचा विचार केला तर इमोशन्स आणि रिलेशनशिपमध्ये एकमेकांना दिलेला वेळ या गोष्टीचा निर्णय घेण्यास मदत करतो की, तुम्हाला हे नातं टिकवायचं आहे की नाही? अनेकदा लोक असं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांच्याकडे इतर कोणताही पर्याय नसतो. तसेच ज्या व्यक्तींना एकटं पडण्याची भिती वाटते त्या व्यक्तीही काहीही झालं तरिही नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व