शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून नात्यामध्ये दुःखी असूनही नातं जपण्यासाठी झटत राहतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 12:40 IST

प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच.

प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच. एवढचं नाहीतर नात्यामध्ये चढउतारही येतात. कधीकधी तर अशी परिस्थिती उद्भवते की, त्यामध्ये नात्याबाबात टोकाचा निर्णयही घ्यावा लागतो. पण तरिही अनेकजण या परिस्थितीतून मार्ग काढतात आणि आपलं नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. 

मग प्रश्न असा उद्भवतो की, ज्यामध्ये प्रेम नाही किंवा नुसतं भांडणं होतात. तर लोक का असं नातं टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात? अनेकांना हा प्रश्न पडतो. त्यांच्या याच प्रश्नाचं उत्तर काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. 

पर्सनॅलिटी आणि सोशल सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, जास्तीत जास्त लोक रोमॅन्टिक नसतानाही आपल्या पार्टनरसाठी नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा नात्यामध्ये दुःखी असूनही ते नातं तोडण्याचा निर्णय घेतं नाहीत. कारण त्यांना वाटत असतं की, असं केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम त्यांच्या पार्टनरवर होऊ शकतो. 

जेव्हा जोडीदार नात्यावरच अवलंबून असेल 

जेव्हा लोक रिलेशनशिप संपवण्याचा विचार करतात. तेव्हा त्यांना असं वाटतं की, कदाचित त्यांचा जोडीदार हे नातं जपण्याचा विचार करत आहे. याचमुळे ते आपल्या पार्टनरचा विचार करतात आणि ब्रेकअप करत नाहीत. संशोधक ऑथर सामंथा जोएल यांनी सांगितलं की, 'रिलेशनशिपवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवतात आणि त्या ब्रेकअपचा विचारही करत नाहीत.'

तज्ज्ञांचं म्हणणं... 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या पार्टनरसोबत ब्रेकअप करणं फार कठिण असतं. एवढचं नाहीतर जर रिलेशनमधील एक पार्टनर आपल्या नात्यामध्ये खूश असेल आणि दुसरा त्या नात्याला कंटाळला असेल तर अशावेळी ब्रेकअप करणं अत्यंत कठिण होतं. 

इतर संशोधनांनुसार...

इतर संशोधनांचा विचार केला तर इमोशन्स आणि रिलेशनशिपमध्ये एकमेकांना दिलेला वेळ या गोष्टीचा निर्णय घेण्यास मदत करतो की, तुम्हाला हे नातं टिकवायचं आहे की नाही? अनेकदा लोक असं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांच्याकडे इतर कोणताही पर्याय नसतो. तसेच ज्या व्यक्तींना एकटं पडण्याची भिती वाटते त्या व्यक्तीही काहीही झालं तरिही नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व