शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून नात्यामध्ये दुःखी असूनही नातं जपण्यासाठी झटत राहतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 12:40 IST

प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच.

प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच. एवढचं नाहीतर नात्यामध्ये चढउतारही येतात. कधीकधी तर अशी परिस्थिती उद्भवते की, त्यामध्ये नात्याबाबात टोकाचा निर्णयही घ्यावा लागतो. पण तरिही अनेकजण या परिस्थितीतून मार्ग काढतात आणि आपलं नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. 

मग प्रश्न असा उद्भवतो की, ज्यामध्ये प्रेम नाही किंवा नुसतं भांडणं होतात. तर लोक का असं नातं टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात? अनेकांना हा प्रश्न पडतो. त्यांच्या याच प्रश्नाचं उत्तर काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. 

पर्सनॅलिटी आणि सोशल सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, जास्तीत जास्त लोक रोमॅन्टिक नसतानाही आपल्या पार्टनरसाठी नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा नात्यामध्ये दुःखी असूनही ते नातं तोडण्याचा निर्णय घेतं नाहीत. कारण त्यांना वाटत असतं की, असं केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम त्यांच्या पार्टनरवर होऊ शकतो. 

जेव्हा जोडीदार नात्यावरच अवलंबून असेल 

जेव्हा लोक रिलेशनशिप संपवण्याचा विचार करतात. तेव्हा त्यांना असं वाटतं की, कदाचित त्यांचा जोडीदार हे नातं जपण्याचा विचार करत आहे. याचमुळे ते आपल्या पार्टनरचा विचार करतात आणि ब्रेकअप करत नाहीत. संशोधक ऑथर सामंथा जोएल यांनी सांगितलं की, 'रिलेशनशिपवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवतात आणि त्या ब्रेकअपचा विचारही करत नाहीत.'

तज्ज्ञांचं म्हणणं... 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या पार्टनरसोबत ब्रेकअप करणं फार कठिण असतं. एवढचं नाहीतर जर रिलेशनमधील एक पार्टनर आपल्या नात्यामध्ये खूश असेल आणि दुसरा त्या नात्याला कंटाळला असेल तर अशावेळी ब्रेकअप करणं अत्यंत कठिण होतं. 

इतर संशोधनांनुसार...

इतर संशोधनांचा विचार केला तर इमोशन्स आणि रिलेशनशिपमध्ये एकमेकांना दिलेला वेळ या गोष्टीचा निर्णय घेण्यास मदत करतो की, तुम्हाला हे नातं टिकवायचं आहे की नाही? अनेकदा लोक असं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांच्याकडे इतर कोणताही पर्याय नसतो. तसेच ज्या व्यक्तींना एकटं पडण्याची भिती वाटते त्या व्यक्तीही काहीही झालं तरिही नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व