शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
4
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
5
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
6
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
7
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
8
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
9
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
10
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
11
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
12
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
13
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
14
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
15
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
17
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
18
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
19
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
20
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच

...म्हणून नात्यामध्ये दुःखी असूनही नातं जपण्यासाठी झटत राहतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 12:40 IST

प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच.

प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच. एवढचं नाहीतर नात्यामध्ये चढउतारही येतात. कधीकधी तर अशी परिस्थिती उद्भवते की, त्यामध्ये नात्याबाबात टोकाचा निर्णयही घ्यावा लागतो. पण तरिही अनेकजण या परिस्थितीतून मार्ग काढतात आणि आपलं नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. 

मग प्रश्न असा उद्भवतो की, ज्यामध्ये प्रेम नाही किंवा नुसतं भांडणं होतात. तर लोक का असं नातं टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात? अनेकांना हा प्रश्न पडतो. त्यांच्या याच प्रश्नाचं उत्तर काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. 

पर्सनॅलिटी आणि सोशल सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, जास्तीत जास्त लोक रोमॅन्टिक नसतानाही आपल्या पार्टनरसाठी नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा नात्यामध्ये दुःखी असूनही ते नातं तोडण्याचा निर्णय घेतं नाहीत. कारण त्यांना वाटत असतं की, असं केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम त्यांच्या पार्टनरवर होऊ शकतो. 

जेव्हा जोडीदार नात्यावरच अवलंबून असेल 

जेव्हा लोक रिलेशनशिप संपवण्याचा विचार करतात. तेव्हा त्यांना असं वाटतं की, कदाचित त्यांचा जोडीदार हे नातं जपण्याचा विचार करत आहे. याचमुळे ते आपल्या पार्टनरचा विचार करतात आणि ब्रेकअप करत नाहीत. संशोधक ऑथर सामंथा जोएल यांनी सांगितलं की, 'रिलेशनशिपवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवतात आणि त्या ब्रेकअपचा विचारही करत नाहीत.'

तज्ज्ञांचं म्हणणं... 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या पार्टनरसोबत ब्रेकअप करणं फार कठिण असतं. एवढचं नाहीतर जर रिलेशनमधील एक पार्टनर आपल्या नात्यामध्ये खूश असेल आणि दुसरा त्या नात्याला कंटाळला असेल तर अशावेळी ब्रेकअप करणं अत्यंत कठिण होतं. 

इतर संशोधनांनुसार...

इतर संशोधनांचा विचार केला तर इमोशन्स आणि रिलेशनशिपमध्ये एकमेकांना दिलेला वेळ या गोष्टीचा निर्णय घेण्यास मदत करतो की, तुम्हाला हे नातं टिकवायचं आहे की नाही? अनेकदा लोक असं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांच्याकडे इतर कोणताही पर्याय नसतो. तसेच ज्या व्यक्तींना एकटं पडण्याची भिती वाटते त्या व्यक्तीही काहीही झालं तरिही नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व