शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

'ही' लक्षणं दिसत असतील तर समजा, तुमचं नातं आता तुटायचंच बाकी राहिलय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 15:00 IST

प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये  येतात.

(image credit-kroc.com)

प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये  येतात. तेव्हा  खुप इंन्टरेस्टिंग वाटत असतं. सुरूवातीच्या काळात एकमेकांना फारसं ओळखत नसल्यामुळे  पार्टनरच्या बोलण्याच्या, विनोदी स्वभावाच्या सगळ्यात गोष्टी  चांगल्या वाटत  असतात पण काही काळानंतर आपल्याला त्याच व्यक्तीचा  राग यायला सुरूवात होते. कारण  अनेकदा त्या व्यक्तीला इग्नोर सुद्धा करत असतो.  

एका रिसर्चमध्ये  हे स्पष्ट झाले आहे की अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेले कपल्स सगळ्यांच्या समोर चांगले वागत असतात. पण त्यांच्य नात्यात दुरावा यायला  सुरूवात झालेली असते. पण नेमकं काय बिनसलय आणि काय हे चुकतय .हे अनेकदा कपल्सना कळत नाही.  त्यामुळे नातं तुटत असतं.  आज आम्ही तुम्हाला रिलेशनशीपच्या बाबतीत काही टिप्स देणार आहोत. त्यामुळे जर तुमच्या नात्यात दुरावा आला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल आणि तुम्ही स्वतःच्या पार्टनरला गमावण्यापासून वाचवू शकता.

 इतर व्यक्तींशी गोष्टी शेअर करता

(image credit- www.pressdemocrate.com)

रिलेशनशीमध्ये असताना पार्टनरशी गोष्टी शेअर करणं हे खूप नॉर्मल आहे.  कारण जर तुम्ही आपल्या रोजच्या  लाईफमध्ये जगत असताना ज्या गोष्टी पार्टनरशी शेअर करण्यासाठी  ऑकवर्ड फिल करत असाल किंवा त्याच गोष्टी पार्टनरला न सांगता इतर मित्रांना सांगत असाल तर तुमच्या नात्यात दुरावा  येण्याचे हे लक्षण असु शकतं.

वेळ न देणे

(image credit-www.india.com)

कोणतेही कपल्स एकमेकांसोबत  जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी उत्सूक असतात.  दोघांना वेळ मिळाल्यानंतर आपल्या वेळेनुसार एकमेकांना भेटायचा प्रयत्न करत असतात. पण जर तुम्ही पार्टनरच्या सुट्टीच्या दिवसाचा विचार  न करता स्वतःच्या  विकऑफच्या दिवशी पार्टनरला भेटायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही भावनीकदृष्या आपल्या पार्टनरपासून लांब जात आहात.

सोबत राहण्याचा विचार न करणे

(image credit-www,parantmap.com)

जर तुम्ही आपल्या  पार्टनरला कंटाळून सोबत राहू शकणार नाही असा विचार करत असाल तर तुमचं नातं कधीही तुटण्याची शक्यता असते .किंवा एकमेकांसोबत राहण्याबद्दल तुमच्या मनात शंका येत असेल तर तुम्ही आपल्या पार्टनरशी ब्रेकअप कधीही करू शकता असे संकेत दिसू  लागतात. ( हे पण वाचा-प्रेमात धोका देऊ शकतात 'या' राशीच्या मुली, जाणून घ्या...)

फिजीकल टचचा अभाव

(image credit- bustle)

 लग्न झालेले लोकं असूदे किंवा  रिलेशनशीपमध्ये असलेले लोकं असू दे नेहमीच एकमेकांचा हात हातात घेऊन गप्पा मारणे, मिठी मारून प्रेम व्यक्त करणे अशा भावना फिजीकल टच करून व्यक्त केल्या जातात पण जर तुमच्या रिलेशनशीपमध्ये स्पर्शाचा अभाव असेल तर तुम्हाला एकटेपणा किंवा अनसेफ वाटू शकतं. त्यामुळे नकळतपणे तुम्ही तुमच्या पार्टनर पासून लांब जाऊ लागता. 

बोलण्यासाठी विषय न सुचणे

(image credit- listaka)

जर तुम्हाला पार्टनरशी बोलताना कोणताच महत्वाचा मुद्दा सुचत नसेल. किंवा सारख  'तु बोल , तु बोलना' असं बोलावं लागत असेल तर समजा तुमचं रिलेशनशीप खूपच बोअर होत चाललं  आहे.   तुमच्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी खास टॉपिक नसतील तर तुमच्याकडे भावनीकदृष्या बोलण्यासाठी काहीही उरलेलं नाही. (हे पण वाचा-गर्लफ्रेन्डला खूश करण्याचा वैज्ञानिक फंडा कधीच कमी  होणार नाही तिच्यातील रोमान्स...)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप