शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

तुमचा बॉयफ्रेन्ड करत असेल 'या' ६ गोष्टी तर त्याला सोडलेलेच बरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 14:56 IST

एका नॉर्मल रिलेशनशिपमध्ये तुम्ही तेव्हाच आनंदी असता जेव्हा पार्टनर आणि तुमच्यात योग्यप्रकारे संवाद होतो आणि दोघांचा एकमेकांवर विश्वास असतो.

एका नॉर्मल रिलेशनशिपमध्ये तुम्ही तेव्हाच आनंदी असता जेव्हा पार्टनर आणि तुमच्यात योग्यप्रकारे संवाद होतो आणि दोघांचा एकमेकांवर विश्वास असतो. पण तसं नसेल तर हे नातं तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकतं. काही लोकांना असं वाटत असतं की, त्यांचा आपल्या पार्टनरवर पूर्ण हक्क आहे आणि ते पार्टनरवर स्वामित्व थोपवू पाहतात. तर काही लोक हे आपल्या पार्टनरच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. असा जोडीदार असणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाहीये. खालील बाबींवर लक्ष द्या आणि तुमचा पार्टनर पझेसिव्ह तर नाहीये ना! 

१) तो तुमच्यावर नजर ठेवतो?

तुमचा पार्टनर तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देत असेल, तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुम्ही काय शेअर करता, कुणाला फोन करता, कुणाला मेसेज करता यावर लक्ष ठेवत असेल तर हे जरा जास्तच होतंय, असं तुम्हाला वाटत नाही का? अशाप्रकारे तुम्हा दोघांचंही जगणं कठिण होऊ शकतं. त्याचं अशाप्रकारे वागणं म्हणजे तुमच्यावरील अविश्वासच आहे. वेळीच यावर विचार केलेला बरा.

२) तुमच्यावर कंट्रोल

त्याला कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं. जर तो तुमच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत असेल तर तो पझेसिव्ह आहे हे समजा. अशा लोकांना हेही जाणून घ्यायचं असतं की, तुम्ही कधी, कुणाला आणि कुठे भेटणार आहात. तुम्हाला थोडा उशीर झाला तरी अशांना ते पसंत नसतं. अशावेळी प्रेमाच्या या नात्यात किती विश्वास राहिलाय किंवा नाही याचा विचार तुम्हीच करायला हवा.  

३) तुमच्यावर जळतो

जर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये किंवा परिवारातील सदस्यांमध्ये चांगल्याप्रकारे मिसळलात. आणि हे पाहून तो वैतागत असेल किंवा त्याला राग येत असेल तर हे योग्य नाही. कदाचित पुढे जाऊन तुम्हाला तो काय करावं आणि काय करु नये हेही सांगू शकतो. तसेच तो जर तुमच्यावर किंवा तुमच्या यशावर जळत असेल तर अशांपासून दूर राहिलेलेच बरे! त्याच्याशी नातं ठेवून तुम्हाला आनंद कसा मिळणार?

४) तुम्हाला धमकावू शकतो

सनकी लोक हे तुम्हाला पूर्णपणे त्यांच्या हिशोबाने वागवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही त्यांच्या मनासारखं ऐकलं नाही तर ते तुम्हाला सोडून जाण्याचीही धमकी देऊ शकतात. इतकेच नाही तर ते स्वत:लाही इजा करुन घेऊ शकतात किंवा आत्महत्या करण्याचीही धमकी देऊ शकतात. अशा लोकांवर प्रेम करणं तर दूरच त्यांच्यापासून १० हात दूर रहायला हवं. 

५) तुमचे निर्णय तो घेतो

भलेही तुमचा एखादा निर्णय तुमच्या पार्टनरच्या संबंधित नसेल तरीही तो निर्णय घेत असेल तर हे साफ चुकीचं आहे. तुमच्या एखाद्या गोष्टीचा किंवा कामाचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हालाच आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला त्याबाबत सल्ला किंवा त्यांचं मत सांगू शकतो. पण निर्णय तो घेत असेल तर तुमचं जगणं अडचणीत येऊ शकतं.  

६) सतत भांडत असेल

भांडण हा प्रेमाचाच भाग आहे असे म्हटले जाते. पण यालाही एक सीमा असायला हवी. उगाच काहीही विनाकारण उकरून काढून भांडणं केलं जात असेल तर दोघांनाही याचा त्रास होईल. काहींना सतत काहीतरी कारण शोधून भांडण्याची सवय असते. अशांसोबत प्रेम कमी आणि त्रास जास्त होतो.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPersonalityव्यक्तिमत्व