शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

'या' लक्षणांवरून ओळखा तुमचा पार्टनर तुमच्यासाठी योग्य आहे की नाही? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 11:41 IST

अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपला निर्णय चुकला असं अनेकांना वाटतं. परंतू वेळ निघून गेलेली असते.

रिलेशनशिपमध्ये असण्याचा अनुभव खूप सुखावणारा असतो. पण प्रेमात भांडणं सुद्धा होत असतात. अनेकदा भांडणं टोकाला जातात.  काही कपल्सना एकमेकांचा चेहरा पाहायला सुद्धा आवडत नाही.  अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपला निर्णय चुकला असं अनेकांना वाटतं. परंतू वेळ निघून गेलेली असते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही आपला पार्टनर नक्की कसा आहे. याबाबत कळेल.

वेगवेगळ्या इमोशन्स

रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती असतात. दोघांचेही इमोशन्स एकसमान असतील असं नाही.  तरी सुद्धा विचारांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. जर तुमचा पार्टनर तुमचा रिस्पेक्ट करत नसेल तर तुमच्यासाठी तो योग्य नाही.  कारण पार्टनरला मेंटली आणि इमोशनली सपोर्ट करणं प्रत्येकाची जबाबदारी असते.

पर्सनल स्पेस 

प्रत्येक नात्यात पर्सनल स्पेस देणं गरजेचं असतं.ऑफिसची महत्वाची मिटींग असेल किंवा मित्रांना वेळ देणं असेल त्यावेळी पार्टनरने पर्सनल स्पेस द्यायला हवी. प्रत्येक गोष्टीत रोख, ठोक करणं, सतत प्रश्न विचारणं, तुमचा मोबाईल चेक करणं असे प्रकार तुमचा पार्टनर तुमच्यासोबत करत असेल तर वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे पार्टनर हा नात्यात स्पेस देणारा असावा.

तुम्ही बदलावं असं वाटत असेल

रिलेशनशिपमध्ये असताना काही कपल्सना आपले पार्टनर जसे आहेत तसे आवडत नसतात. नेहमी अपडेट आणि आपल्याला हवं तसं पार्टनरने रहायला हवं असं काहीजणांना वाटत असतं.  तुम्हाला सुद्धा पार्टनर सतत बदलण्याचा प्रयत्न करत असेल हे रिलेशन तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्ही जसे आहात तसं स्वीकारणारा पार्टनर असावा 

तुमच्या भावना समजून घेत नसेल

कोणतीही लहान मोठी गोष्ट असेल तर याबद्दल पार्टनरला काही कळत नसेल तर तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. नातं टिकवायचं असेल तर एकमेकांना समजून घेणं आवश्यक असतं. आपल्या पार्टनरने आपल्याला वेळ द्यायला हवा, असं सगळ्यांनाच वाटत असंत. पण जेव्हा तुम्ही या गोष्टी करण्यात कमी पडत असता. तसंच गर्लफ्रेडबद्दल इतरांशी बोलण्यासाठी विचार करता, तिच्यापासून दूर राहता आणि जेव्हा इंटरेस्ट कमी होतो तेव्हा इतर मुलींकडे लक्ष देता. या गोष्टी मुलींना जराही आवडत नसतात. 

 तुमचं मत विचारात घेतलं जात नाही

प्रेमात कोणताही निर्णय एकाच व्यक्तीच्या विचाराने घेतला जात नाही. दोघांचं मत विचारात  घेणं गरजेचं असतं. अश्यात जर तुमचा पार्टनर मत विचारात घेत नसेल किंवा कोणतीही कल्पना न देता एखादी गोष्ट ठरवत असेल तर तुम्हाला हीच गोष्ट महागात पडू शकते.  त्यामुळे आधीच योग्य निर्णय घ्या.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप