शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुडा झाल्यावर जास्तीत जास्त तरूण-तरूणी करतात 'या' चुका, ज्या पडू शकतात महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 13:32 IST

Relationship Tips : याच काळात कपल्स भविष्याबाबत अनेक स्वप्ने बघतात आणि रंगवतात. काहींना भेटण्याची संधी असेल तर भेटीही घेतात. या सगळ्यामागे एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.  

Relationship Tips : लग्न हा विषय कुणाच्याही आयुष्यात फार महत्वाचा असतो. फार विचार करूनच तो करावा लागतो. दोन अनोळखी व्यक्ती सोबत येतात आणि नव्या आयुष्याला सुरूवात करतात. साखरपुडा झाला की, एक वेगळंच जीवन सुरू होतं. दोघांनाही एकमेकांची ओढ वाटू लागते. तरूण आणि तरूणीचा साखरपुडा आणि लग्नादरम्यानचा काळ फार खास असतो. याच काळात कपल्स भविष्याबाबत अनेक स्वप्ने बघतात आणि रंगवतात. काहींना भेटण्याची संधी असेल तर भेटीही घेतात. या सगळ्यामागे एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.  

लग्नाआधी एकमेकांना जाणून घेणे गरजेचे आहे पण अनेकदा काही कपल्स यादरम्यानच्या काळात अशा काही चुकाही करतात. ज्यामुळे नातं बिघडण्याची शक्यता जास्त असते. मग ते बोलण्यातून असो वा वागण्यातून. जास्त मोकळेपणा कधीकधी अंगलट येतो. अशात लग्नाआधी होणाऱ्या जोडीदारासोबत बोलताना काही गोष्टींची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. चला जाणून घेऊया काही चुका ज्या कपल्स करतात. 

वाढवून सांगणे

लग्नाआधीच्या पहिल्या भेटीत अनेकदा कपल्स हे एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी स्वत:बाबत मोठमोठ्या बढाया मारतात. पण हे सांगताना काहीजण हे विसरतात की, समोरचा व्यक्ती त्याच्या घरातीलच नाहीतर आयुष्याचा भाग होणार आहे. पुढे जाऊन सगळंकाही त्याला कळणारच आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टी खोट्या सांगू नये नाहीतर याने नात्यात दरी निर्माण होऊ शकते.

प्रामाणिकपणा

अनेकदा कपल्स लग्नाआधी आपल्याबाबत खोटं सांगतात जे फार चुकीचं आहे. आपल्या भूतकाळाबाबत आपल्या पार्टनरला खरं सांगायला हवं. नंतर त्याबाबत माहिती मिळाल्यावर तुमच्या पार्टनरला धक्काही बसू शकतो. पण हे सांगण्याआधी आपल्या पार्टनरचा स्वभाव कसा आहे हे जाणून घ्या त्यानंतरच या गोष्टी सांगा.

कंट्रोल ठेवत नाहीत

अनेकदा कपल्स साखरपुडा झाला की, एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेले असतात. ते लग्नांपर्यंत वाट पाहू शकत नाहीत. अशात बोलण्यापर्यंत, ऐकमेकांना जाणून घेण्यापर्यंत ठिक आहे पण लग्नाआधी फिजिकल रिलेशन ठेवणे चुकीचं ठरु शकतं. जर लग्नाआधीच तुम्ही तुमच्या पार्टनरमागे या गोष्टीसाठी तगादा लावत असाल, त्याबाबत सतत बोलत असाल तर यामुळे तुमच्या पार्टनरच्या नजरेत तुमचं चुकीचं इम्प्रेशन पडू शकतं. 

जास्त बोलणं अडचणीचं

सगळेच लग्न जुळल्यावर आपल्या पार्टनरसोबत बोलण्यासाठी उत्सुक असतात. अनेकजण जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत बोलण्यात घालवतात. संवाद योग्यच आहे पण लग्नाआधी इतकंही बोलू नये की, लग्नानंतर तुमच्यात काही रोमांच उरणार नाही. आताच पार्टनरला सगळं सांगितलं तर लग्नानंतर काय सांगाल? 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप