शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

अरेंज मॅरेजमध्ये पार्टनरकडून लगेच या अपेक्षा ठेवणं ठरू शकतं घातक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 12:17 IST

Relationship : जर तुमचं अरेंज्ड मॅरेज होणार असेल किंवा नुकतंच झालं असेल तर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. लगेच आपल्या पार्टनरकडून खालील 5 गोष्टींची अपेक्षा करु नये.

Relationship : भारतात अरेंज मॅरेजलाच जास्त महत्व आहे. आजही भारतात जास्तीत जास्त लग्ने अरेंजच असतात. जास्तीत जास्त हेच बघण्यात येतं की, जुळवलेली लग्नेच जास्त काळ टिकतात. अरेंज मॅरेजमध्ये दोन अनोळखी लोक एकत्र येतात आणि आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात करतात. पण अरेंज मॅरेजमध्ये काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. 

जर तुमचं अरेंज्ड मॅरेज होणार असेल किंवा नुकतंच झालं असेल तर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. लगेच आपल्या पार्टनरकडून खालील 5 गोष्टींची अपेक्षा करु नये. अपेक्षांच्या बाबतीत घाई करुन अजिबात चालत नाही. याने तुमचं नातं अडचणीत येण्याची शक्यता आहे.

1) लग्न होऊन नुकतेच काही दिवस झाले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की, पत्नीने तिचे आई-वडील किंवा भाऊ-बहिणींच्या तुलनेत तुमच्याकडे जास्त लक्ष द्यावं, तर ही जरा घाई होईल. ज्या घरात ती इतकी वर्ष राहिली ते घर सोडून ती तुमच्या अनोळखी लोकांच्या घरात आली आहे. तिला तुमच्याप्रति प्रेम वाढायला जरा वेळ लागेल. तिला जरा वेळ द्या कारण तिच्यासाठी सगळंच नवीन असतं.

2) बहुतेक मुलांची अपेक्षा असते की, त्यांच्या पत्नीने लग्नानंतर लगेच आपल्या आई-वडीलांची काळजी घ्यावी, त्यांची सेवा करावी. जर मुलगी हाऊसवाईफ असेल तर अपेक्षा अधिकच होते. पण त्यांची सेवा करणे आणि त्यांना मनापासून प्रेम देणे यात फरक आहे. जे प्रेम मुलगी आपल्या आई-वडिलांना देते, तेच प्रेम लग्न झाल्यावर सून तिच्या सासू-सासऱ्यांना दिलं जाऊ शकतं. सासू-सासरे आणि सून यांच्यातील नातं वेळेनुसार आणखी मजबूत होत जातं. पण हे नातं एकतर्फी प्रयत्नातून होत असेल तर कधीही शक्य होत नाही. 

3) ज्या व्यक्तीसोबत तुम्ही लग्न केलंय त्या व्यक्तीला तुम्ही काही दिवसांपूर्वीच भेटले आहात. तिच्यासोबत लग्न केल्यावर दुस-या दिवशीच तिच्याशी तुमचं सगळं पटायला लागेल असं होत नसतं. तुम्हा दोघांनाही एकमेकांच्या आवडी-निवडी, चांगल्या-वाईट गोष्टी जाणून घ्यायला वेळ लागेल. यादरम्यान तुमच्यात छोटी छोटी भांडणंही होतीलच. पण ही भांडणं सोडवत तुम्हाला नातं पुढे न्यावं लागेल. 

4) साखरपुडा आणि लग्न यामधील वेळ हा दोघांसाठीही महत्वाचा असतो. तुम्हाला एकमेकांना थोडंफार जाणून घेण्यासाठी हा वेळ महत्वाचा ठरतो. पण काही लोक फारच उतावळे झालेले बघायला मिळतात. त्यांना असं वाटतं की, त्यांच्या होणा-या बायकोने सतत त्यांच्याशी गुलूगुलू बोलावं. पण हे शक्य आणि योग्यही नाही. एकमेकांना समजून घेण्यासाठी एक अंतर ठेवणंही महत्वाचं ठरतं. 

5) तुमच्या पार्टनरचं तुमच्या मित्रांसोबत वागणं कसं आहे, हेही अनेकदा अनेकांसाठी महत्वाचं ठरतं. प्रत्येकालाच असं वाटत असतं की, तुमच्या पार्टनरने तुमच्या मित्रांसोबत आनंदाने भेटावं. पण तुमच्या पार्टनरला त्यांना भेटणं पसंत नसेल किंवा ती तुमच्याबद्दल एखादी गोष्ट त्यांना सांगत असेल, तर त्यावर चिडण्यापेक्षा शांतपणे विचार करा.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपmarriageलग्न