शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

दरवेळी नव-याचे चुकते का? बायकोही कमी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 12:07 IST

नव-याच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या बायकोचा संयम टिकत नसल्याने त्या नात्याची वीण उसवली जात असल्याचे कोर्टाच्या पायरीवर दिसून येत आहे..

ठळक मुद्दे23 ते 35 वयोगटातील नवविवाहातांच्या घटस्फोटाचे प्रमाण जास्त :  घरात आई वडील नकोचघटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये आता पुरुषांपेक्षा दावा दाखल करण्याचे प्रमाण वाढले भारतीय दंड संहिता 498 व  घरगुती हिंसाचार कायदा 2005 चा महिला गैरवापर करत असल्याचे स्पष्टमाहेरच्या लोकांचा मुलीच्या संसारात प्रमाणापेक्षा वाढलेला हस्तक्षेप हा घटस्फोटाच्या मुख्य कारणांपैकी एक

- युगंधर ताजणे-  पुणे : वाढत्या जीवघेण्या स्पर्धेतून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठीचा सततचा संघर्ष, बदलती जीवनशैली, घरात मुलाचे आई-वडील म्हणजे अडगळ ही मनात दृढ झालेली भावना, जोडीला सोशल माध्यमांवर वाढलेला मुक्त वावर या सर्वांचा प्रतिकूल परिणाम वैवाहिक नात्यावर होत आहे. दरवेळी नव-याचे चुकते असे म्हणणा-यांकडून बायकांकडूनही चुका घडतात, याकडे काणाडोळा केला जातो. नव-याच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या बायकोचा संयम टिकत नसल्याने त्या नात्याची वीण उसवली जात असल्याचे कोर्टाच्या पायरीवर दिसून येत आहे.घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये आता पुरुषांपेक्षा स्रियांकडून दावा दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात 23 ते 35 वयोगटातील जोडप्यांचा काडीमोड होण्याची टक्केवारी साधारण 50 ते 60 टक्यांच्या घरात आहे. आपण कमवते आहोत, स्वत:च्या पायावर उभे आहोत या भावनेतून वाढलेला  ‘‘इगो’’ तसेच यातून आई वडिलांना दूर करुन नवीन घर घेण्याचा नव-यामागे लावलेला तगादा यामुळे नात्यांमधील गोडवा संपत चालला आहे. सोशल माध्यमांव्दारे स्वत:चे खासगीपण जपण्याने संघर्ष निर्माण होत आहे. अनेक महिला यामुळे निराशेच्या गर्तेत गेल्या आहेत. फेसबुक, व्हाटसअप यातून अनोळखी व्यक्तिशी झालेली ओळख त्यातून वाढलेले चँटिंग यामुळे संसारात कटूता येत आहेत. चंगळवादी वृत्तीतून पतीकडून केलेल्या अवास्तव अपेक्षा आणि त्यातून अपेक्षाभंग झाल्यास तात्काळ नाते तोडून टाकण्यापर्यंत पावले उचलली जात आहेत. भारतीय दंड संहिता 498 व  घरगुती हिंसाचार कायदा 2005 चा महिला गैरवापर करत असल्याचे स्पष्ट होत आहे. माहेरच्या लोकांचा मुलीच्या संसारात प्रमाणापेक्षा वाढलेला हस्तक्षेप हा देखील घटस्फोटाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. 

* बायकोचे हे चुकते ....- सासु-सासऱ्यांना टोचून बोलणे, त्यांचा तिरस्कार करणे, त्यांच्यापासून लांब राहण्याची कारणे देत नवीन घरोब्याचा अट्टहास. -  घरांतील माणसांपेक्षा  व्हाटस अप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी आभासी जगात वेळ घालवणे. त्यावरुन प्रश्न केल्यास  ’प्रायव्हसी’चा मुद्दा पुढे करणे. - पाश्चिमात्य संस्कृतीतील गोष्टींची माहिती न घेता त्याचे अनुकरण संसारात करणे. चित्रवाहिन्यांवरील वेशभुषा, खानपान, शॉपिंग, याविषयांवरील कार्यक्रम पाहून त्याप्रमाणे ’आपण ते करुन पाहायलाच हवे,’ असा धोशा लावणे अनेक नवरोबांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे. ...........* लग्नापूर्वी समुपदेशनाची संकल्पना रुजली नाही पाश्चिमात्य देशांमध्ये लग्नापूर्वी एकमेकांना समजून घेण्याकरिता समुपदेशन केले जाते. मात्र आपल्याकडे हा विषय अनेकदा मुलगा आणि मुलीच्या ’’ इगो’’ चा विषय होतो.  मी सर्वोत्कृष्ट असून मला समुपदेशनाची गरजच काय, असा प्रश्न मुलाला व मुलीला पडतो. यातून दोघांच्या भावी संसारी जीवनाकरिता कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याची त्यांना माहिती होत नाही. एकमेकांच्या अपेक्षा समजून घेता येत नाहीत. दोघांच्या कौटूंबिक पार्श्वभूमीची माहिती होत नसल्याने त्याने देखील नात्यांमध्ये कटूता येत असल्याचे घटस्फोटाच्या प्रकरणांतून समोर आले आहे. ........................* आपण स्वत:च्या पायावर उभे आहोत. आपल्याला चांगला पगार आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना मुलींमध्ये अहंपणाची भावना निर्माण झाली आहे. लग्न झाल्याबरोबर काही दिवसांतच मुलीला घरात मुलाचे आई वडिल नको असतात. तिला तिची  ‘‘प्रायव्हसी’’ जपायची असते. मुलींनी संसाराची व्याख्या समजून घेण्याची गरज आहे. समजून घेणे आणि स्वीकारणे या दोन गोष्टी त्यांनी संसार करताना लक्षात घ्यायला हव्यात. मात्र ते त्यांच्या पचनी पडताना दिसत नाही. नव-याकडून सतत अपेक्षा करत राहणे त्या पूर्ण न झाल्यास त्याला पाठींबा देण्याऐवजी  वाद सुरु करणे चूकीचे आहे. काळानुसार बदलणा-या गोष्टींचा कितपत परिणाम आपल्या वैवाहिक नात्यावर होऊ द्यायचा हे मुलींना ठरवता यायला हवे. -अ‍ॅड. सुनीता जंगम ( कौटूंबिक न्यायालय, पुणे) 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपDivorceघटस्फोट