शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणांमुळे नात्यांमध्ये वाढतयं पर्सनल स्पेसचं महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 17:54 IST

काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत.

काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत. ते एकमेकांवर हक्क गाजवण्यापेक्षा एकमेकांना पर्सनल स्पेस देताना दिसत आहेत. त्यांना याची जाणीव आहे की, कधी त्यांना एकांत पाहिजे आणि कधी आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा आहे. 

भांडण होणं चांगलं

आधी असं समजलं जात असे की, जर नात्यामध्ये भांडण होत असेल तर ते नातं कमजोर आहे किंवा नात्यामध्ये फूट पडत आहे. पण आताच्या पिढीचा असा समज आहे की, भांडणांमुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं. पण ही भांडण वेळीच सोडवणं गरजेचं असतं. तसेच नवीन जोडप्यांच्या म्हणण्यानुसार नवरा-बायको असणं म्हणजे दोघांचे विचार एकच असणं गरजेचं नसतं. दोघांमध्येही मतभेद होऊ शकतात आणि अनेकदा जबाबदाऱ्या, राहण्याची पद्धत किंवा इतर अन्य छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होऊ शकतात. अनेकदा मतभेदांचं रूपांतरही भांडणांमध्ये होतं. परंतु या छोट्या छोट्या मतभेदांना आपापसात सोडवण्याची कलाही या जोडप्यांमध्ये आहे. 

घरातील गोष्टी बाहेर कराव्यात

आधी घरातल्या गोष्टी घरातच सोडवण्याचा सल्ला देण्यात येत असे. थोरामोठ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आधी घरातील गोष्टी या घरातील चार भिंतींमध्येच सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्यांची चर्चा घराबाहेरील लोकांसोबत करू नये. पण या जुन्या विचारांनाही नवीन जोडप्यांनी पूर्णविराम दिला असून जोपर्यंत त्यांना वाटते की ही समस्या ते सोडवू शकतात. तोपर्यंत ते यामध्ये तिसऱ्या व्यक्तिला येऊ देत नाहीत. पण जेव्हा प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे त्यांना जाणवते त्यावेळी ते घराबाहेरील सदस्याचा सल्ला घेऊन ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. 

घटस्फोटाचा विषय

लग्न म्हणजे दोन व्यक्तिंना एकमेकांची साथ देण्यासाठी तयार करण्यात आलेली सामाजिक-पारिवारिक संस्था होय. अनेकदा या नात्यामध्ये फूट पडते आणि त्यावेळी वेगळं होणं हा एकच पर्याय समोर असतो. पण अशा परिस्थितीतही ही जोडपी एकमेकांना समजून घेताना दिसतात. अनेक जोडपी अशी आहेत ज्यांना मुलं झाल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला आहे तरिसुद्धा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी ते एकत्र येऊन पार पाडत आहेत. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट