शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

'या' कारणांमुळे नात्यांमध्ये वाढतयं पर्सनल स्पेसचं महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 17:54 IST

काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत.

काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत. ते एकमेकांवर हक्क गाजवण्यापेक्षा एकमेकांना पर्सनल स्पेस देताना दिसत आहेत. त्यांना याची जाणीव आहे की, कधी त्यांना एकांत पाहिजे आणि कधी आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा आहे. 

भांडण होणं चांगलं

आधी असं समजलं जात असे की, जर नात्यामध्ये भांडण होत असेल तर ते नातं कमजोर आहे किंवा नात्यामध्ये फूट पडत आहे. पण आताच्या पिढीचा असा समज आहे की, भांडणांमुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं. पण ही भांडण वेळीच सोडवणं गरजेचं असतं. तसेच नवीन जोडप्यांच्या म्हणण्यानुसार नवरा-बायको असणं म्हणजे दोघांचे विचार एकच असणं गरजेचं नसतं. दोघांमध्येही मतभेद होऊ शकतात आणि अनेकदा जबाबदाऱ्या, राहण्याची पद्धत किंवा इतर अन्य छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होऊ शकतात. अनेकदा मतभेदांचं रूपांतरही भांडणांमध्ये होतं. परंतु या छोट्या छोट्या मतभेदांना आपापसात सोडवण्याची कलाही या जोडप्यांमध्ये आहे. 

घरातील गोष्टी बाहेर कराव्यात

आधी घरातल्या गोष्टी घरातच सोडवण्याचा सल्ला देण्यात येत असे. थोरामोठ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आधी घरातील गोष्टी या घरातील चार भिंतींमध्येच सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्यांची चर्चा घराबाहेरील लोकांसोबत करू नये. पण या जुन्या विचारांनाही नवीन जोडप्यांनी पूर्णविराम दिला असून जोपर्यंत त्यांना वाटते की ही समस्या ते सोडवू शकतात. तोपर्यंत ते यामध्ये तिसऱ्या व्यक्तिला येऊ देत नाहीत. पण जेव्हा प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे त्यांना जाणवते त्यावेळी ते घराबाहेरील सदस्याचा सल्ला घेऊन ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. 

घटस्फोटाचा विषय

लग्न म्हणजे दोन व्यक्तिंना एकमेकांची साथ देण्यासाठी तयार करण्यात आलेली सामाजिक-पारिवारिक संस्था होय. अनेकदा या नात्यामध्ये फूट पडते आणि त्यावेळी वेगळं होणं हा एकच पर्याय समोर असतो. पण अशा परिस्थितीतही ही जोडपी एकमेकांना समजून घेताना दिसतात. अनेक जोडपी अशी आहेत ज्यांना मुलं झाल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला आहे तरिसुद्धा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी ते एकत्र येऊन पार पाडत आहेत. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट