शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मोठी होत असलेली मुलं तुमचं ऐकत नाहीत? वापरून बघा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 16:05 IST

Parenting : अशावेळी त्यांच्यावर राग व्यक्त करण्याऐवजी विचार करावा की, त्यांना कसं समजावून सांगणार. कारण त्यांना तुम्ही लहान मुलांसारखंही वागवू शकत नाही आणि ना मोठ्यांसारखं.

Parenting : लहान मुलं जेव्हा मोठी होत असतात किंवा तारूण्यात येत असतात तेव्हा सगळ्याच पालकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. बरीच मुलं किंवा मुली पालकांचं ऐकत नाही. त्यांना त्यांचंच खरं वाटतं आणि आई-वडिलांचं चुकीचं वाटतं. अशात पालक मुलांवर चिडतात. पण अशावेळी त्यांच्यावर राग व्यक्त करण्याऐवजी विचार करावा की, त्यांना कसं समजावून सांगणार. कारण त्यांना तुम्ही लहान मुलांसारखंही वागवू शकत नाही आणि ना मोठ्यांसारखं. कारण त्यांचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो. त्यामुळे तुम्हीच समजदारी दाखवत काहीतरी मार्ग काढणं गरजेचं असतं. 

त्यांची मानसिकता समजून घ्या

एक पालक म्हणून हे गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या मोठ्या होत असलेल्या मुलांमधील बदलांना समजून घ्या. या काळात मुला-मुलींचं मन फार अशांत राहतं आणि हे त्यांच्या शरीरात होत असलेल्या हार्मोनल बदलांमुळे होतं. यासोबतच ते समाजात आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि या चढ-उतारात त्यांना भावनात्मक आधाराची गरज असते. 

तुम्ही शांत रहा

पालक या नात्याने तुम्हाला तुमच्यावर फार संयम ठेवावा लागेल. तुम्हाला तुमच्या मुलांचा मित्र होऊन बोलण्याची गरज नाही. कारण जर तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र झालात तर तुम्ही त्यांना योग्य किंवा चूक यातील फरक समजावून सांगू शकणार नाहीत. तुम्ही स्वत:हून समजून घ्या आणि मुलांसोबत अशी बॉंडींग तयार करा की, ते स्वत:हूनच तुम्हाला त्यांच्या मनातील गोष्टी सांगतील आणि तुमच्याकडून सल्ला घेतील.

आधी स्वत:त करा बदल

मुला-मुलींमध्ये चांगले गुण टाकण्याआधी तुम्हाला तुमच्या आत डोकावून बघावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर तुमचं उदाहरण द्याल तर ते लवकर समजू शकतील. सोबतच या वयातील मुला-मुलींसोबत घर-परिवाराबाबत बोला. त्यांच्याशी आर्थिक आणि कौंटुबिक मुद्द्यांवर बोला. तसेच त्यांच्या करिअरशी संबंधित गोष्टींवर बोला. या गोष्टी करून त्यांच्यात समजदारी आणि गंभीरता निर्माण होईल.   

टॅग्स :Parenting Tipsपालकत्वrelationshipरिलेशनशिप