शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 17:21 IST

मुलांचं संगोपन करणं म्हणजे पालकांसाठी अत्यंत अवघड काम. त्यांची काळजी घेण्यात आई-वडिलांना आपलं मुल कधी मोठं झालं हे समजतंच नाही. मुलांचे हट्ट पुरवण्यात बीझी असलेले आई-बाबा अनेकदा त्यांच्या वागण्याकडे आणि सवयींकडे दुर्लक्ष करतात.

मुलांचं संगोपन करणं म्हणजे पालकांसाठी अत्यंत अवघड काम. त्यांची काळजी घेण्यात आई-वडिलांना आपलं मुल कधी मोठं झालं हे समजतंच नाही. मुलांचे हट्ट पुरवण्यात बीझी असलेले आई-बाबा अनेकदा त्यांच्या वागण्याकडे आणि सवयींकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा अतीलाडामुळे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुलांना कमी वयातच वाईट सवयी लागतात. पण अशातच योग्य वेळी मुलांना त्या सवयी सोडण्यासाठी भाग नाही पाडलं तर मात्र फार अवघड जातं. याचे अनेक गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. पालक विचार करतात की, वेळेनुसार या वाईट सवयी दूर होतील. परंतु कमी वयामध्ये जडलेल्या वाईट सवयींना दूर करणं अशक्य असतं. कारण वेळेसोबत सवयी स्वभावाचाच एक भाग बनून जातात. 

तुमचं मुलंही खोटं बोलतयं?

मुलांच्या सर्व घाणेरड्या सवयींमध्ये 'खोटं बोलणं' एक अशी सवय आहे जी कॉमन आहे. परंतु कॉमन आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. कारण एकदा मुलानं खोटं बोलणं सुरू केलं तर ही सवय आयुष्यभरासाठीही तशीच राहू शकते. 

मुलं का बोलतात खोटं?

जर तुम्हाला तुमची मुंल छोट्या छोट्या गोष्टींवर खोटं बोलत असल्याचे जाणवले तर सर्वात आधी त्याच्या या वाईट सवयी मागील कारण शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या शालेतील टिचरला घाबरणारी मुलं अनेकदा शाळेमध्ये खोटं बोलतात. आई-वडिलांपासून एखादी गोष्ट लपवण्यची गरज असेल तर मुलं खोटं बोलतात. अनेकदा तर एखादी चूक झाल्यानंतर ती लपवण्यासाठीही मुलं खोटं बोलतात. 

मुलांची खोटं बोलण्याची सवय सोडण्यासाठी करा हे उपाय :

1. मुलांशी वागण्याची पद्धत बदला 

मुलांच्या एखाद्या सवयीमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वात आधी पालकांना मुलांशी बोलण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. जर तुम्ही त्यांना विचारलं की, अभ्यास केलास का? त्यावेळी स्वतःला वाचवण्यासाठी मुलं खोटं बोलू शकतात. याऐवजी तुम्ही त्यांना तू अभ्यास कधी करणार? असं विचारलं तर मुल तुम्हाला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. 

2. योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगा

कुठे आणि कोणासोबत काय बोलायचे आहे? एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं आणि खोटं बोलण्यामुळे काय नुकसान होऊ शकतं. मुलांना हे अवश्य सांगा. 5 वर्षांच्या मुलांना खोटं बोलण्याचा अर्थही समजत नाही. त्यामुळे त्यांना नीट समजावून सांगा. 

3. रागावू नका

मुलांवर सतत रागावू नका, त्यांना समजून घ्या. तुम्ही मुलांवर सतत रागावत असाल तर त्यापासून वाचण्यासाठी मुलं सर्रास खोटं बोलतात. त्यामुळे त्यांच्याशी प्रेमाने वागा.  

4. तुमचा फायदा पाहू नका

काही पालक आपल्या सवडीनुसार मुलांशी वागतात. जेव्हा मुल खोटं बोलतं तेव्हा त्याची ती सवय सुधारण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. असं केल्याने मुलांची सवय आणखी बिघडते. 

5. प्रेमाने सांभाळ करा

जर तुमचं मुलं खोटं बोलत असाल्याचे तुमच्या लक्षात येईल त्यावेळी त्यांना ओरडण्या किंवा मारण्याऐवजी बोलून समजावून सांगा. जर त्यावेळी तुम्ही रागावलात तर ते आणखी घाबरती आणि ही सवय आणखी वाढेल. 

टॅग्स :Parenting Tipsपालकत्वRelationship Tipsरिलेशनशिप