शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पार्टनरच्या राशीवरून ओळखा कसा आहे 'त्यांचा' स्वभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 14:32 IST

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात. तर काही वाईट गुण सुद्धा असतात.

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात. तर काही वाईट गुण सुद्धा असतात. या गुणांमुळे काही वेळा इतर लोकांना त्रास सुद्धा होत असतो. कारण रिलेशनशीपमध्ये असताना प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव जर जुळत नसतील तर तुम्हाला मानसीक ताण सुद्धा येऊ शकतो. तसंच  पार्टनरच्या वागण्यामुळे तुम्ही खूश नसाल तर पाश्चाताप होण्याची वेळ येईल. म्हणून आज आम्ही तुम्हाला प्रत्येक राशीनुसार व्यक्तीचे स्वभाव कसे असतात हे सांगणार आहोत. कारण जर तुम्हाला व्यक्तीचा स्वभावाबद्दल पूर्ण माहिती नसेल तर तुम्हाला रिलेशनशीपमध्ये असताना नंतर आपण असं का केलं, आपली चुक झाली, व्यक्तीला ओळखू शकलो नाही असं म्हणण्याची पाळी येऊ शकते.

मेष

मेष राशीच्या लोकांना खूप लवकर राग येतो. त्यामुळे अनेक व्यक्तींसोबत त्याचे भांडण होते.  परिणामी पार्टनरसोबत असलेले नातं जास्तवेळ टिकवू शकतं नाही. त्यामुळेच मेष राशीच्या लोकांना आपलं नातं टिकवून ठेवायचं असेल. तर रागावर नियंत्रण ठेवायला हवं.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव आयडीयल असतो. यांच्या स्वभावामुळे इतर लोकांच्या तुलनेत या राशीचे लोकं मागे राहत असतात.  त्यामुळेच  वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या रागिष्ट आणि हट्टी  स्वभाव काही प्रमाणात नियंत्रणात ठेवायला हवा. 

मिथून 

मिथून राशीचे लोक इतर व्यक्तींवर खूप लवकर विश्वास ठेवतात. त्यांच्या संयमी आणि शांत स्वभावामुळे अनेकदा त्यांना नुकसानाचा सामना करावा लागतो. तसंच इतर व्यक्तींवर  विश्वास ठेवण्याआधी या व्यक्तींनी  स्वतःच्या डोक्याने नीट विचार करून मग वागायला हवं.

कर्क 

कर्क राशीचे लोक खूप इमोशनल असतात. सर्वसाधारणपणे भावनेच्या भरात कर्क राशीचे लोक चुकीचा निर्णय घेतात. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांवर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. 

सिंह 

सिंह राशीचे लोक आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. खूप खर्चसुद्धा करतात. गरजेपेक्षा आणि प्रमाणापेक्षा जास्त खर्च करायची सवय त्यांना झालेली असते. पण याच सवयीमुळे त्यांना नंतर पशचाताप सुद्धा करण्याची वेळ येते. जर वेळीच ही सवय बदलली नाही. तर गरजा पूर्ण न झाल्यास मानसिक ताण येण्याची शक्यता असते. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांना खूपच अहंकार असतो. त्यामुळे या राशीचे लोक इतर व्यक्तींना समजून घेण्यात कमी पडत असतात. कन्या राशीच्या लोकांनी इतर लोकांना कमी लेखताना  विचार करायला हवा. 

तुळ

तुळ राशीचे लोक गरजेपेक्षा जास्त इतरांचा विचार करतात. त्यामुळे त्यांचातील ही उणीव त्यांना महागात सुद्धा पडत असते. अनेक लोक यांच्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांना वेडं बनवतात. त्यांच्या उदार स्वभावाचा त्यांना त्रास होऊ शकतो.

वृश्चिक 

प्रत्येक गोष्टीत प्रमाणापेक्षा जास्त राग करण्याची सवय वृश्चिक राशीच्या लोकांना असते. त्यांच्या प्रगतीत राग अनेकदा आडवा येत असतो. इतकेच नाही तर या राशीच्या लोकांच्या स्वभावाचा त्यांचा शारीरिक स्थितीवर सुद्धा परिणाम होत असतो. 

धनू

धनू राशीचे लोकं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात पण प्रत्यक्षात मात्र असं काही नसतं. धनू राशीच्या लोकांचं असं वागणं त्यांच्या प्रगतीच्या आड येत असतं.

मकर

मकर राशीच्या लोकांना गैरसमज असतो की त्यांच्यात काही कमतरता आहे. या राशीचे लोक नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे यांना ही गोष्ट सफल होण्यापासून रोखू शकतो. कारण या राशीच्या लोकांना असं वाटत असतं की ते खूपच परफेक्ट आहेत.

कुंभ 

 कुंभ राशीच्या व्यक्ती आपल्या गोष्टींना घेऊन अडून राहातात. कुंभ राशीच्या लोकांसाठी थोडं सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं फायदेशीर ठरेल. कारण त्यांना नेहमी त्याचंच म्हणणं योग्य आहे असं वाटतं असतं. 

मीन 

मीन राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. त्यामुळे कोणतेही आवाहन स्वीकारण्यासाठी या राशीचे लोकं सहजासहजी तयार होत नाहीत.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप