शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर पार्टनरला आणि घरच्यांना कसं कराल हॅन्डल, वाचा 'या' खास टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 15:48 IST

कोणत्याही मुलाचं अथवा मुलीचं लग्न झाल्यानंतर आयुष्यच बदलून जात असतं.  

कोणत्याही मुलाचं अथवा मुलीचं लग्न झाल्यानंतर आयुष्यच बदलून जात असतं.  अनेकदा आपल्याला नवीन घरात गेल्यानंतर एडज्टमेंटचा सामना करावा लागतो. आपल्या पार्टनरला समजून घेण्यासोबतच त्याच्या घरच्यांना सुद्धा समजून घ्यावं  लागतं. तर काही वेळा आपली इच्छा नसेल तरी त्यांच्या मनासारखं वागवं लागत असतं.

लग्न होऊन सासरच्या घरी गेल्यानंतर मुलींना साधारणपणे आपली पाककला म्हणजेच वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार करून नवरा आपल्या नव्या कुटूंबाचं मन जिंकायचं असतं. त्यात पण जर काही पदार्थ मुलीने तयार केला तर 'आमच्याकडे अशीच फोडणी देतात, अश्याच पध्दतीने पदार्थ करतात, साखरेचं प्रमाण इतकंच असावं'. अश्याप्रकारचे डायलॉग्स सुरूवातीच्या काळाच  मुलींना ऐकून घ्यावे लागतात.

सध्याच्या काळात मुली कितीही ऑफिसवर्क किंवा कामाला जात असल्या तरी घरची जबाबदारी तर सांभाळावीच लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टीप्स सांगणार आहोत.  ज्या टीप्स तुम्हाला जर तुमचं लग्न नुकतच झालं असेल तर नक्की उपयोगी पडतील. 

समजून घेण्याचा प्रयत्न करा

जर तुम्ही तुमच्या सासरच्या कु़टूंबाला चुकिचं समजत असाल तर  तुम्ही मोठी चुक करत आहात.जर तुमच्याशी कोणी वरच्या आवाजात किंवा रागात बोलले तर तुम्ही आधी त्या व्यक्तीची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.  अनेकदा असं होऊ शकतं की समोरच्या जे सांगायच आहे ते न समजता तुम्ही भलतचं काही गैरसमज करून घेतला असेल. कारण काहीजण स्वाभाविकपणे रागीष्ट असतात नवीनच लग्न झालं असल्यामुळ कोणाशीही बोलत असताना  नम्रपणे बोलण्याचा प्रयत्न करा. 

सासरच्या कुटूंबाला माहेरच्या कुटूंबासारखं समजा

(image credit0 kentlive news)

जर तुमच्या सासूला तुमच्या वागण्यामुळे नेहमी प्रोब्लेमच होत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत अधिकवेळ घालवा . आणि त्यांना काय आवडत आणि काय नाही आवडत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.  त्यांचा स्वभाव कसा आहे.  हे ओळखा. मग त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून मन जिंकण्याचा प्रयत्न करा. मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.

वाद टाळण्याचा प्रयत्न करा

कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण घरच्यांचा हस्तक्षेप असेल तेव्हा   त्यांचात सुद्धा वाद होत असतात. पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.  जर भांडणं होत असतील तुम्हालाच त्रास होऊन तुमची मानसीक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे  समजदारीने वागण्याचा प्रयत्न करा. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप