शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लग्नानंतर पार्टनरला आणि घरच्यांना कसं कराल हॅन्डल, वाचा 'या' खास टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 15:48 IST

कोणत्याही मुलाचं अथवा मुलीचं लग्न झाल्यानंतर आयुष्यच बदलून जात असतं.  

कोणत्याही मुलाचं अथवा मुलीचं लग्न झाल्यानंतर आयुष्यच बदलून जात असतं.  अनेकदा आपल्याला नवीन घरात गेल्यानंतर एडज्टमेंटचा सामना करावा लागतो. आपल्या पार्टनरला समजून घेण्यासोबतच त्याच्या घरच्यांना सुद्धा समजून घ्यावं  लागतं. तर काही वेळा आपली इच्छा नसेल तरी त्यांच्या मनासारखं वागवं लागत असतं.

लग्न होऊन सासरच्या घरी गेल्यानंतर मुलींना साधारणपणे आपली पाककला म्हणजेच वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार करून नवरा आपल्या नव्या कुटूंबाचं मन जिंकायचं असतं. त्यात पण जर काही पदार्थ मुलीने तयार केला तर 'आमच्याकडे अशीच फोडणी देतात, अश्याच पध्दतीने पदार्थ करतात, साखरेचं प्रमाण इतकंच असावं'. अश्याप्रकारचे डायलॉग्स सुरूवातीच्या काळाच  मुलींना ऐकून घ्यावे लागतात.

सध्याच्या काळात मुली कितीही ऑफिसवर्क किंवा कामाला जात असल्या तरी घरची जबाबदारी तर सांभाळावीच लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टीप्स सांगणार आहोत.  ज्या टीप्स तुम्हाला जर तुमचं लग्न नुकतच झालं असेल तर नक्की उपयोगी पडतील. 

समजून घेण्याचा प्रयत्न करा

जर तुम्ही तुमच्या सासरच्या कु़टूंबाला चुकिचं समजत असाल तर  तुम्ही मोठी चुक करत आहात.जर तुमच्याशी कोणी वरच्या आवाजात किंवा रागात बोलले तर तुम्ही आधी त्या व्यक्तीची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.  अनेकदा असं होऊ शकतं की समोरच्या जे सांगायच आहे ते न समजता तुम्ही भलतचं काही गैरसमज करून घेतला असेल. कारण काहीजण स्वाभाविकपणे रागीष्ट असतात नवीनच लग्न झालं असल्यामुळ कोणाशीही बोलत असताना  नम्रपणे बोलण्याचा प्रयत्न करा. 

सासरच्या कुटूंबाला माहेरच्या कुटूंबासारखं समजा

(image credit0 kentlive news)

जर तुमच्या सासूला तुमच्या वागण्यामुळे नेहमी प्रोब्लेमच होत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत अधिकवेळ घालवा . आणि त्यांना काय आवडत आणि काय नाही आवडत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.  त्यांचा स्वभाव कसा आहे.  हे ओळखा. मग त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून मन जिंकण्याचा प्रयत्न करा. मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.

वाद टाळण्याचा प्रयत्न करा

कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण घरच्यांचा हस्तक्षेप असेल तेव्हा   त्यांचात सुद्धा वाद होत असतात. पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.  जर भांडणं होत असतील तुम्हालाच त्रास होऊन तुमची मानसीक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे  समजदारीने वागण्याचा प्रयत्न करा. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप