शहरं
Join us  
Trending Stories
1
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
2
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
3
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
4
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
5
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
6
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
7
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
8
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
9
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
10
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
11
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
12
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
13
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
14
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
15
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
16
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
17
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
18
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
19
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
20
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या

लग्नानंतर पार्टनरला आणि घरच्यांना कसं कराल हॅन्डल, वाचा 'या' खास टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 15:48 IST

कोणत्याही मुलाचं अथवा मुलीचं लग्न झाल्यानंतर आयुष्यच बदलून जात असतं.  

कोणत्याही मुलाचं अथवा मुलीचं लग्न झाल्यानंतर आयुष्यच बदलून जात असतं.  अनेकदा आपल्याला नवीन घरात गेल्यानंतर एडज्टमेंटचा सामना करावा लागतो. आपल्या पार्टनरला समजून घेण्यासोबतच त्याच्या घरच्यांना सुद्धा समजून घ्यावं  लागतं. तर काही वेळा आपली इच्छा नसेल तरी त्यांच्या मनासारखं वागवं लागत असतं.

लग्न होऊन सासरच्या घरी गेल्यानंतर मुलींना साधारणपणे आपली पाककला म्हणजेच वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार करून नवरा आपल्या नव्या कुटूंबाचं मन जिंकायचं असतं. त्यात पण जर काही पदार्थ मुलीने तयार केला तर 'आमच्याकडे अशीच फोडणी देतात, अश्याच पध्दतीने पदार्थ करतात, साखरेचं प्रमाण इतकंच असावं'. अश्याप्रकारचे डायलॉग्स सुरूवातीच्या काळाच  मुलींना ऐकून घ्यावे लागतात.

सध्याच्या काळात मुली कितीही ऑफिसवर्क किंवा कामाला जात असल्या तरी घरची जबाबदारी तर सांभाळावीच लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टीप्स सांगणार आहोत.  ज्या टीप्स तुम्हाला जर तुमचं लग्न नुकतच झालं असेल तर नक्की उपयोगी पडतील. 

समजून घेण्याचा प्रयत्न करा

जर तुम्ही तुमच्या सासरच्या कु़टूंबाला चुकिचं समजत असाल तर  तुम्ही मोठी चुक करत आहात.जर तुमच्याशी कोणी वरच्या आवाजात किंवा रागात बोलले तर तुम्ही आधी त्या व्यक्तीची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.  अनेकदा असं होऊ शकतं की समोरच्या जे सांगायच आहे ते न समजता तुम्ही भलतचं काही गैरसमज करून घेतला असेल. कारण काहीजण स्वाभाविकपणे रागीष्ट असतात नवीनच लग्न झालं असल्यामुळ कोणाशीही बोलत असताना  नम्रपणे बोलण्याचा प्रयत्न करा. 

सासरच्या कुटूंबाला माहेरच्या कुटूंबासारखं समजा

(image credit0 kentlive news)

जर तुमच्या सासूला तुमच्या वागण्यामुळे नेहमी प्रोब्लेमच होत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत अधिकवेळ घालवा . आणि त्यांना काय आवडत आणि काय नाही आवडत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.  त्यांचा स्वभाव कसा आहे.  हे ओळखा. मग त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून मन जिंकण्याचा प्रयत्न करा. मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.

वाद टाळण्याचा प्रयत्न करा

कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण घरच्यांचा हस्तक्षेप असेल तेव्हा   त्यांचात सुद्धा वाद होत असतात. पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.  जर भांडणं होत असतील तुम्हालाच त्रास होऊन तुमची मानसीक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे  समजदारीने वागण्याचा प्रयत्न करा. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप