शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

लग्नानंतर सुद्धा एक्सची आठवण येते? तर 'हा' फंडा वापरून नेहमी खूश रहा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 18:03 IST

अनेकदा पार्टनरला लग्न झालं असेल तरी आधीच्या गर्लफ्रेंडची किंवा बॉयफ्रेंडची आठवण येत असते.  

(image credit-buildingblocks.solutions)

अनेकदा पार्टनरला लग्न झालं असेल तरी आधीच्या गर्लफ्रेंडची किंवा बॉयफ्रेंडची आठवण येत असते.  वैवाहिक आयुष्य जगात असताना तिसऱ्या  व्यक्तीची आठवण येणं हे खूपच त्रासदायक ठरु शकतं. कारण नवीनच लग्न होऊन आपल्या आयुष्यात आलेल्या पार्टनरला त्याचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला सुद्धा अशाच काहीश्या प्रसंगांचा सामना करावा लागत असेल  तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत  ज्याचा वापर करून तुम्ही आपल्या  स्वतःचं मन वळवण्यासाठी यशस्वी होऊ शकता.

(image credit-famousastrologerexpert.com)

सत्याचा स्वीकार करा 

 (image credit-singaporewolrld.sg)

तज्ञांच्या म्हणण्यानुसार एक्सचा सहवास नवीन पार्टनरपेक्षा जास्त काळ असल्यामुळे लग्नानंतर सुद्धा मुलांना  मुलींची आठवण येत असते.  एक्स पार्टनर लांब गेल्यानंतर असं वाटणं स्वाभाविक आहे पण जी व्यक्ती अनेक दिवसांपासून आयु्ष्यात होती त्या व्यक्तीच्या जागी कोणी इतर व्यक्ती आहे या गोष्टीचा स्वीकार करा. 

भेटवस्तू  स्वतःपासून लांब ठेवा

प्रेमात गिफ्ट देणे किंवा घेणे हे खूपच कॉमन आहे. कारण यामुळेच नात्यात गोडवा येत असतो. जर तुम्हाला तुमच्या एक्स गर्लफ्रेन्डने काही गिफ्टस् दिले असतील तर  सतत डोळ्यांपुढे ठेवू नका. कारण त्यामुळे तुम्हाला सतत पार्टनरची आठवण येत राहील. ( हे पण वाचा-पार्टनरच्या 'या' गोष्टींमध्ये लुडबुड कराल तर भांडण झाल्याशिवाय राहणार नाही)

फिरायला त्याच ठिकाणी जाऊ नका

(image credit-www.hotched.co.uk)

गर्लफ्रेन्डबरोबर ज्या ठिकाणी  फिरायला जात होतात. त्या ठिकाणी शक्यतो जाऊ नका. कारण त्यामुळे  तुम्हाला मानसीक त्रास होण्याची शक्यता आहे.  तिच्यासोबत  घालवलेला वेळ तुम्हाला आठवणींच्या माध्यमतून त्रासदायक ठरू शकतो.  म्हणून पार्टनरसोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जा. त्यामुळे तुमचा मुड फ्रेश होईल.

फोटो डिलीट करा 

फोनमधले तेच तेच फोटो बघून तुम्हाला एक्सची आठवण सतत येईल म्हणून  फोटो शक्य होईल तितक्या लवकर डिलीट करा. कारण कोणत्याही पार्टनरला तुमच्या फोनमध्ये एक्सचे फोटो असतील तर आवडणार नाही. या गोष्टीमुळे होणारं भांडण टाळण्यासाठी फोटोज  डिलीट करा. ( हे पण वाचा-'ही' लक्षणं दिसत असतील तर समजा, तुमचं नातं आता तुटायचंच बाकी राहिलय)

आयुष्याकडे नव्याने पहा

आयुष्य सुंदर बनवणं तुमच्या हातात असतं. तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ इच्छित असाल तर भूतकाळातील  घटनांना विसरणं गरजेचं आहे. कारण काळानुरूप अनेक गोष्टी बदलत जातात. त्याचा स्वीकार करायला हवा.  कारण तुमचं लग्न जर  इतर कोणाशी झालं असेल तर एकमेकांचे स्वभाव समजून घ्या. तुम्हाला आयुष्यभर त्याच व्यक्तीसोबत राहायचं असतं. जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर ही गोष्ट आपल्या पार्टनरशी शेअर करा. पार्टनर तुम्हाला भूतकाळातील घटना विसरण्यासाठी मदत करू शकतो.  

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप