शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पार्टनरसोबतची भांडणं टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 13:20 IST

अनेकदा गैरसमजातून होणारी भांडणं टोकाला जातात आणि त्यातून नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं.

मुंबई : अनेकदा असं होतं की, तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बोलत असताना ते बोलणं भांडणात बदलतं. या भांडणाला अनेक कारणे असतात. प्रेमाच्या नात्यात भांडणं ही होतातच. पण अनेकदा गैरसमजातून होणारी भांडणं टोकाला जातात आणि त्यातून नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. त्यामुळे विनाकारणची भांडणं होऊ न देणं हे आवश्यक असतं. त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी खालील काही गोष्टींची काळजी घेता येईल.

1) बोलण्यासाठी योग्य वेळ

दिवसा किंवा रात्री बोलण्यासाठी अशी वेळ निवडा ज्यावेळी तुमच्या डोक्यात दुसरं काहीही नसणार. कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये अशी वेळ निवडा. 

2) एकमेकांचं ऐकून घ्या

समोरच्याने आपलंच बोलणं ऐकावं अशी अनेकांची भावना असते. समोरच्याचं ऐकून घ्यावं असा विचार केला जात नाही. हे फारच महागात पडू शकतं. समोरच्या व्यक्तीचा इगो दुखावला जाऊ शकतो. आपलं म्हणनं मांडा त्यासोबतच समोरच्या व्यक्तीचंही ऐकून घ्या.

(पहिली डेट शेवटची ठरु नये यासाठी खास डेटिंग टिप्स)

3) मध्येच उठून जाऊ नका

अनेकदा काही लोक हे रागाच्या भरात बोलणं अर्धवट सोडून निघून जातात. असे केल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. ज्या कारणामुळे भांडण होतंय, त्यावर तोडगा निघत नाही. त्यामुळे बोलणं मध्येच सोडून जाऊ नका.

4) बोलणं समजून घ्या

दोन प्रेमाच्या व्यक्तीतील भांडणात जय-पराजय असा काही मुद्दा नसतो. पण या भांडणात तुम्ही विजय मिळवण्याची भावना ठेवत असाल, तर त्याने समस्या सुटणार नाही तर आणखी वाढेल. त्यामुळे समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे समजून घ्या आणि मग त्यावर बोला.

(ही लक्षणे दिसतील तर लगेच करा ब्रेकअप)

5) शब्दांचे खेळ खेळू नका

तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्ही फिरवून, मोठ मोठ्या शब्दांचा वापर करुन बोलत असाल तर हे थांबवा. दुसरीकडे अशीही अपेक्षा करु नका की, तुम्ही काही बोलण्याआधीच समोरच्या व्यक्तीने तुमच्या मनातील ओळखावं.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट