शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

Friendship Day 2018: समाज माध्यमांमुळे मैत्रीही झाली ‘ग्लोबल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 01:55 IST

जागतिकीकरणानंतर स्पर्धा निर्माण झाल्याने मनुष्याचे जीवन धावपळीचे बनले.

मुंबई : जागतिकीकरणानंतर स्पर्धा निर्माण झाल्याने मनुष्याचे जीवन धावपळीचे बनले. आप्तेष्टांसमवेत संवाद साधण्यासाठीही त्याला वेळ कमी पडू लागला. त्यामुळे नाती दुरावली. मात्र, इतर नाती दुरावली असली तरीही मैत्रीचे नाते कायमच त्याच्या जवळ राहिले आहे; कारण मैत्री हे एक असे नाते आहे, जे लोणच्यासारखे मुरत जाते आणि त्याला वेळ, काळ आणि जागेचे बंधन नसते. त्यामुळे ग्लोबलायझेशनच्या जमान्यात मैत्रीही ‘ग्लोबल’ झाली आहे.आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ‘पत्रमित्राची’ जागा चॅटिंग रूमने घेतली आहे. व्हर्च्युअल फ्रेंडशिपने मैत्रीचे वर्तुळ अजून व्यापक बनत आहे. काही अपवाद वगळता या व्हर्च्युअल जगातील मैत्रीची ओढ तशीच टिकून आहे. आयुष्यात कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आपण स्वीकारतो आणि काही गप्पांमध्येच तो कधी आपला जवळचा मित्र होतो, हे कळतही नाही.काही दशकांपूर्वी ज्यांना काही कारणांमुळे शाळेतील मित्र-मैत्रिणींशी संपर्क राखता आला नाही, त्यांनाही या आधुनिक जगामध्ये पुन्हा एकत्र आणण्याचे व्यासपीठ सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाले आहे. मैत्रीचे सेतू उभारण्यासाठी आज अनेक साधने अक्षरश: हात जोडून उभी आहेत. फेसबुक, गुगल प्लस, टम्बलर, लिंक्डइन, टिष्ट्वटर, जीटॉक, व्हॉट्सअ‍ॅप-व्हॉइस चॅट, इन्स्टाग्राम अशी अनेक सोशल नेटवर्किंगची माध्यमे आज मैत्रीची माध्यमे झाली आहेत. त्यामुळे सध्याच्या जगात ‘मैत्री करा, मैत्री जपा, मैत्री वाढवा’ असा जणू मंत्रजागरच अखंड चालू आहे.जगाच्या दुसऱ्या कोपºयात असणाºया मित्राला आपल्या आनंदात सहभागी करून घ्यायचेय? मग त्याला फेसबुकच्या फोटोवर टॅग करा. एखादी विनोदी घटना त्याला सांगायची आहे? तर व्हॉट्सअ‍ॅप-व्हॉइस चॅटवरून त्याला मेसेज करा. तुम्ही काढलेले फोटो पिकासावर अपलोड करून त्याला दाखवा. हे सगळे क्षणार्धात होईल इतके आभासी जग तुमच्या-आमच्या जवळ सोशल मीडियाने निर्माण केले आहे.मैत्री टिकविण्याचे काम या सोशल नेटवर्किंग साइटवरून होत असले, तरीही ती मैत्री रुजते-फुलते आणि दृढ होते ती ‘वेव्हलेन्थ’ जुळल्यानंतरच. आधीच्या पिढीमध्ये मित्र रस्त्यावर, शाळेत, कॉलेजमध्ये, मैदानावर, घराच्या बाहेर भेटत होते. आता हेच मित्र आॅनलाइनच्या ‘व्हर्च्युअल’ जगामध्ये भेटतात. त्यांचे हे नवे कट्टे आणि नवे अड्डेच आहेत. मैत्री तीच, तिचे माहात्म्यही तेच; फक्त भेटण्याच्या जागा बदलल्या. रोज भेटून गप्पा मारण्याची जागा व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅटबॉक्सने घेतली. इतकाच काय तो फरक, बाकी ये दोस्ती... आहेच की..!२0 वर्षांनंतरमित्र आले एकत्रसोशल मीडियाच्या माध्यमातून वांद्रे पूर्व येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९७६ सालच्या बॅचचे विद्यार्थी जोडले गेले आहेत. या सवंगड्यांनी शाळेत १ ली ते १० वीपर्यंतची १० वर्षे आनंदात घालवली आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशविदेशात ते स्थायिक झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनही उत्साहात साजरे केले आहे.२००८ साली या विद्यार्थ्यांचे पहिले स्नेहसंमेलन साजरे झाले. त्यानंतर २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१७ आणि यंदा फेब्रुवारी महिन्यात वार्षिक स्नेहसंमेलन साजरे केले. स्नेहसंमेलनाला मुंबई, ठाणे, वसई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, हैदराबादसह अमेरिका, दुबई येथून मित्र-मैत्रिणी आवर्जून येतात.१९६६ ते ७६ चा शाळेतील काळ वेगळा होता. त्या वेळी मोकळे वातावरण नव्हते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आमच्या शाळेतील १९७६च्या बॅचचे सुमारे ९० माजी विद्यार्थी रोज संपर्कात असतो आणि एकमेकांची सुख-दु:खं वाटतो. शाळेतील लोकप्रिय माजी पर्यवेक्षक अनिल कुलकर्णीदेखील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाला हजर असतात, असे यापैकी एक असलेल्या आरती भाटकर यांनी सांगितले.

टॅग्स :MobileमोबाइलrelationshipरिलेशनशिपFriendship Dayफ्रेण्डशीप डे