शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

काय आहे 'इमोशनल स्ट्रेन' ज्यामुळे ए आर रहमानचा होत आहे घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:37 IST

AR Rahman divorce : २९ वर्षाचं दोघांचं नातं तुटण्यामागचं कारण इमोशनल स्ट्रेन असल्याचं सांगण्यात आलं आहे.

AR Rahman divorce : भारतातील प्रसिद्ध संगीतकार, गायक ए आर रहमान हे पत्नी सायरा बानूपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा समोर आली आहे. 12, मार्च 1995 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. दोघांना २ मुली आणि एक मुलगा आहे. आता २९ वर्षाच्या संसारानंतर दोघांनी सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. 

सायरा बानू यांनी मंगळावारी रात्री पतीपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती. ही बातमी समोर येताच ए आर रहमानच्या फॅन्सना धक्का बसला. २९ वर्षाचं दोघांचं नातं तुटण्यामागचं कारण इमोशनल स्ट्रेन असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेकांना हे माहीत नसतं की, नात्यात इमोशनल स्ट्रेन काय असतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

घटस्फोटाचं कारण...

सायरा बानू यांच्या वकील वंदना शाह यांनी त्यांच्या क्लाएंटकडून जाहीर करत लिहिलं की, अनेक वर्षांच्या संसारानंतर मिसेज सायरा बानू यांनी पती ए आर रहमान यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारण नात्यात इमोशनल स्ट्रेन आहे. भरपूर प्रेम असूनही दोघांनाही असं जाणवलं की, तणावामुळे दोघांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे. सायरा यांनी या गोष्टीवर जोर दिला की, हा निर्णय नात्यात असलेल्या वेदनेमुळे घेण्यात आला आहे.

रहमान यांनी व्यक्त केलं दु:खं

दुसरीकडे ए आर रहमान यांनीही एक्सवर पोस्ट करत आपल्या वेदना व्यक्त केल्या. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, "अपेक्षा होती की, आम्ही ३० वर्ष संसार पूर्ण करू. पण, असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा एक न दिसणारा अंत असतो. तुटलेल्या हृदयाच्या वजनाने देवाचं सिंहासनही हलत असेल'. यावेळी त्यांनी प्रायव्हसी दिल्याबद्दल फॅन्सचे आभार मानले.

काय आहे 'इमोशनल स्ट्रेन'?

ए आर रहमान आणि सायरा बानू यांच्या घटस्फोटाचं कारण 'इमोशनल स्ट्रेन' असून प्रत्येक कपलने हे समजून घेतलं पाहिजे. जेव्हा एखाद्या नात्यात वाढतं अंतर स्ट्रेसचं कारण बनतं तेव्हा त्याला इमोशनल स्ट्रेन म्हटलं जातं. याची वेगवेगळी कारणे असतात. जसे की, कम्युनिकेशन गॅप, विश्वास कमी असल्याने संशय वाढणे इत्यादी.

त्याशिवाय नात्यात गमावलेला विश्वास स्ट्रेसचं सगळ्यात कॉमन कारण बनतं. प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा आणि मग त्या पूर्ण न होणंही कारण ठरतं. नात्यात होत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे स्ट्रेस वाढतो.

'इमोशनल स्ट्रेन'सोबत कसं डील कराल?

- एक्सपर्टनुसार, 'इमोशनल स्ट्रेन' सोबत लढण्यासाठी दोघांमध्ये संवाद होणं महत्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुम्ही समस्या सांगणारच नाही तर त्याचं समाधान कसं निघेल? नात्यात दोघांमध्ये भरपूर संवाद होणं मजूबत नात्याची खूण आहे. 

- या कठिण काळातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला माइंड डायवर्ट करावा लागेल. जर तुम्ही एकाच गोष्टीबाबत विचार करत रहाल तर तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतील. अशात तुम्ही सोशल मीडिया, इंटरनेट किंवा फिजिकल अॅक्टिविटी, आवडीच्या गोष्टींमध्ये लक्ष घाला.

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपDivorceघटस्फोटA. R. Rahmanए. आर. रहमान