शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

लग्नानंतरच्या पहिल्या रात्री चुकूनही करु नका या 5 गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 11:48 IST

अनेकजण आपल्या उत्सुकतेच्या नादात पहिली रात्र खराब करतात. लग्नाच्या पहिल्या रात्री काय करु नये अशा 5 गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबाबत मुलगा आणि मुलगी दोघांनाही उत्सुकता असते. दोघांनी वेगवेगळी स्वप्ने रंगवलेली असतात. प्रत्येकालाच आपली पहिली रात्र यादगार करायची असते. मात्र अनेकजण आपल्या उत्सुकतेच्या नादात पहिली रात्र खराब करतात. लग्नाच्या पहिल्या रात्री काय करु नये अशा 5 गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

1) भूतकाळाबाबत सगळं सांगू नका

अनेकदा काही लोक आपल्या पार्टनरसोबत सहज झाल्यावर आपल्या भूतकाळातीस एक एक घटना सांगायला लागतात. काही लोक फारच पुढे जाऊन आपल्या आधीच्या रिलेशनशिपबाबतही सांगतात. खरंतर असं कसं करणं तुमच्या भविष्यासाठी महागात पडू शकतं. त्यामुळे कधीही लग्नानंतरच्या पहिल्या रात्री चुकूनही आपल्या भूतकाळाबाबत सांगू नका. आपल्याला ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं आहे त्याला भूतकाळाबाबत सांगणं चुकीचं नाहीये, पण पहिली रात्र योग्य वेळ नाही.

2) कूटुंबियांच्या तक्रारी करु नये

लग्न म्हटलं की, कितीतरी कामं असतात. कितीही प्रयत्न करुन काहीना काही कमतरता राहून जाते. काही चुका मुलींच्या कूटुंबियांकडून होतात तर काही चुका मुलांच्यां कूटुंबियांकडून होतात. पण कूटुंबियांच्या या चुकांबाबत किंवा त्यांच्या चुकीच्या वागण्याबाबत पहिल्या रात्री काही बोलू नका. यामुळे पहिल्याच रात्री दोघांनाही निराशा येऊ शकते.

3) शारीरिक संबंधासाठी घाई नको

लग्नाच्या पहिल्या रात्रीच दोघांमध्ये शारीरिक संबंध व्हावे असे गरजेचे नाहीये. पहिल्या रात्री दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी गप्पा करणेही आवश्यक आहे. दोघेही अनोळखी असल्याने आधी एकमेकांना जाणून घ्या. तरच पुढे तुम्ही चांगलं लैंगिक आयुष्य जगू शकाल. 

4) पहिल्याच रात्री तक्रारी करु नका

बोलता बोलता असंही होऊ शकतं की, तुम्हाला तुमच्या पार्टनरची एखादी गोष्ट आवडली नसेल. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री एकमेकांमधील खोट काढणं, एकमेकांना चुकीचं ठरवणं जरा घाईचं होईल. 

5) एकमेकांचं ऐका

लग्नाच्या रात्री उत्साहाच्या भरात केवळ तुम्हील बोलू नका. तुमच्या पार्टनरचंही ऐका. तिला काय आवडतं, तिचं काय म्हणनं आहे हेही जाणून घ्या. केवळ तुम्ही बोलत रहाल तर तुमच्या पार्टनरला सहज होण्याची संधी मिळणार नाही. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न