शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करायला निघाला असाल तर 'या' चुका टाळाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 16:05 IST

खऱ्या आयुष्यात साथीदार निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. खरं आयुष्य हे डायलॉगबाजीवर चालत नसतं.

ऊपरवाले ने हर किसी के लिए कहीं न कहीं, कोई न कोई एक स्पेशल इंसान जरूर बनाया है... दिल तो पागल हैं या सिनेमातील हा माधुरीचा डायलॉन ऐकला की, अनेकांना असं वाटतं हा डायलॉग त्यांच्यासाठीच आहे. पण खऱ्या आयुष्यात साथीदार निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. खरं आयुष्य हे डायलॉगबाजीवर चालत नसतं. तसेच साथीदार निवडताना या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही तर नंतर पश्चाताप करुन फायदा होणार नाही. 

परफेक्ट जोडीदारीचा शोध

अनेकदा फरफेक्ट जोडीदाराच्या शोधात हातून चांगली स्थळं निघून जातात. या जगात कुणीच परफेक्ट नाहीये, त्यामुळे परफेक्ट जोडीदार शोधण्यापेक्षा राइट जोडीदार शोधा. तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये काय हवंय, त्याची एक लिस्ट तयार करा. मग याचा विचार करा की, तुम्ही यातील कोणत्या गोष्टी असल्या आणि नसल्या तर तुम्हाला चालेल. पूर्ण लिस्ट मिळवण्याच्या नादात तुम्हाला आयुष्यभर एकटच रहावं लागू शकतं.

प्रेमाने पोट भरत नाही

अनेकदा काही लोक प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखू शकत नाहीत आणि लग्न करण्याचा निर्णय घेतात. लव्ह मॅरेजमध्ये अनेकदा हा विचार केला जातो की, प्रेमाच्या आधारे ते आयुष्य जगतील पण केवळ प्रेमाने पोट भरत नाही. तुम्ही प्रेमाला आपली ताकद बनवा, मजबूरी नाही. जर दोघांमध्ये समजूतदारपणा असेल तर नातं घट्ट होईल.

फॅमिलीकडे दुर्लक्ष करणे

अनेकदा काही लोक जोडीदार निवडताना असा विचार करतात की, परिवार कसाही असो काय फरक पडतो? सोबत मुला-मुलीला रहायचंय ना? पण सत्य हे आहे की, लग्न केवळ दोन लोकांचं नाही तर दोन परिवारांचं नातं असतं. त्यामुळे लग्न ठरवताना दोन्ही परिवारातील सदस्यांबाबत जाणून घ्या. त्यांच्या वागण्यावरुन मुला-मुलीच्या वागण्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

एकसारखी आवड किंवा कमतरता

मुलगा आणि मुलीची पसंत जर एकसारखी असली तर त्यांना असं वाटतं की, ते दोघे किती एकसारखे आहेत. पण केवळ आवडी-निवडी एकसारख्या असून भागत नाही. दोघांचा एकमेकांवरील विश्वास आणि विचार हे जास्त महत्त्वाचे आहेत. आवड काही प्रमाणात एकसारखी असणं गरजेचं असतं. अनेकदा मुलांमध्ये आणि मुलींमध्ये एकसारख्या कमतरता असतात. त्यामुळे त्यांना वाटतं की, हेच स्थळ योग्य आहे कारण काही कमतरता माझ्यात आहेत आणि काही त्याच्यात. 

पार्टनरला बदलणार

अनेकदा मुला/मुलींना वाटतं की, ते पार्टनरला बदलतील. हा विचार चुकीचा आहे. तुम्ही ज्या रुपात समोरच्याला पसंत केलं आहे, त्यातच स्वीकार कराल तर चांगलं होईल. कुणाला बदलणे सोपे नाहीये आणि योग्यही नाहीये. त्यापेक्षा स्वत:ला बदलण्याचा विचार करा. 

इमोशनल निर्णय

लग्न हे दोन हृदयांचं नातं आहे हे बरोबर आहे पण प्रॅक्टिकल होणेही तितकेच गरजेचे आहे. इमोशनल होऊन घेतलेला निर्णय योग्य नसतो. प्रेमाशिवाय जीवनात पैसे, करिअर, सिक्युरिटी, फॅमिली इत्यादी गोष्टीही गरजेच्या असतात. जर जीवनात भौतीक गरजा पूर्ण न झाल्यास चांगली चांगली नाती तुटतात.

घाई गडबडीत अटी मान्य करणे

लगेच सगळं ठरवून लग्न करण्याच्या पद्धतीला अनेकजण पसंत करतात. पण काहीही फायनल करण्यापूर्वी थोडा वेळ घ्या. जगात लाखो लोक जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यामुळे काही कमी नाहीये. तसेच अनेकदा घरातील लोक मुलाचं किंवा मुलीचं लग्न व्हावं यासाठी विचित्र मागण्या मान्य करुन करतात. अशाने दोन्हीबाजूच्या अपेक्षा वाढतात. आणि त्या पूर्ण झाल्यास नात्यात कटूता येते.

स्वभावकडे दुर्लक्ष करणे

अनेकदा पार्टनरच्या शोधात त्या व्यक्तीच्या स्वभावाला फार महत्त्वच दिलं जात नाही. मुलगा किंवा मुलगी हे जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही की, समोरचा व्यक्ती किती प्रेमळ आणि किती जुळवून घेणारा आहे, कोणताही अट न घालता आपल्याला सपोर्ट करणारा आहे का? अनेकजण बोलण्यावरही लक्ष देत नाहीत. पण हे कोणत्याही नात्यासाठी महत्त्वाचं आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न