शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करायला निघाला असाल तर 'या' चुका टाळाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 16:05 IST

खऱ्या आयुष्यात साथीदार निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. खरं आयुष्य हे डायलॉगबाजीवर चालत नसतं.

ऊपरवाले ने हर किसी के लिए कहीं न कहीं, कोई न कोई एक स्पेशल इंसान जरूर बनाया है... दिल तो पागल हैं या सिनेमातील हा माधुरीचा डायलॉन ऐकला की, अनेकांना असं वाटतं हा डायलॉग त्यांच्यासाठीच आहे. पण खऱ्या आयुष्यात साथीदार निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. खरं आयुष्य हे डायलॉगबाजीवर चालत नसतं. तसेच साथीदार निवडताना या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही तर नंतर पश्चाताप करुन फायदा होणार नाही. 

परफेक्ट जोडीदारीचा शोध

अनेकदा फरफेक्ट जोडीदाराच्या शोधात हातून चांगली स्थळं निघून जातात. या जगात कुणीच परफेक्ट नाहीये, त्यामुळे परफेक्ट जोडीदार शोधण्यापेक्षा राइट जोडीदार शोधा. तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये काय हवंय, त्याची एक लिस्ट तयार करा. मग याचा विचार करा की, तुम्ही यातील कोणत्या गोष्टी असल्या आणि नसल्या तर तुम्हाला चालेल. पूर्ण लिस्ट मिळवण्याच्या नादात तुम्हाला आयुष्यभर एकटच रहावं लागू शकतं.

प्रेमाने पोट भरत नाही

अनेकदा काही लोक प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखू शकत नाहीत आणि लग्न करण्याचा निर्णय घेतात. लव्ह मॅरेजमध्ये अनेकदा हा विचार केला जातो की, प्रेमाच्या आधारे ते आयुष्य जगतील पण केवळ प्रेमाने पोट भरत नाही. तुम्ही प्रेमाला आपली ताकद बनवा, मजबूरी नाही. जर दोघांमध्ये समजूतदारपणा असेल तर नातं घट्ट होईल.

फॅमिलीकडे दुर्लक्ष करणे

अनेकदा काही लोक जोडीदार निवडताना असा विचार करतात की, परिवार कसाही असो काय फरक पडतो? सोबत मुला-मुलीला रहायचंय ना? पण सत्य हे आहे की, लग्न केवळ दोन लोकांचं नाही तर दोन परिवारांचं नातं असतं. त्यामुळे लग्न ठरवताना दोन्ही परिवारातील सदस्यांबाबत जाणून घ्या. त्यांच्या वागण्यावरुन मुला-मुलीच्या वागण्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

एकसारखी आवड किंवा कमतरता

मुलगा आणि मुलीची पसंत जर एकसारखी असली तर त्यांना असं वाटतं की, ते दोघे किती एकसारखे आहेत. पण केवळ आवडी-निवडी एकसारख्या असून भागत नाही. दोघांचा एकमेकांवरील विश्वास आणि विचार हे जास्त महत्त्वाचे आहेत. आवड काही प्रमाणात एकसारखी असणं गरजेचं असतं. अनेकदा मुलांमध्ये आणि मुलींमध्ये एकसारख्या कमतरता असतात. त्यामुळे त्यांना वाटतं की, हेच स्थळ योग्य आहे कारण काही कमतरता माझ्यात आहेत आणि काही त्याच्यात. 

पार्टनरला बदलणार

अनेकदा मुला/मुलींना वाटतं की, ते पार्टनरला बदलतील. हा विचार चुकीचा आहे. तुम्ही ज्या रुपात समोरच्याला पसंत केलं आहे, त्यातच स्वीकार कराल तर चांगलं होईल. कुणाला बदलणे सोपे नाहीये आणि योग्यही नाहीये. त्यापेक्षा स्वत:ला बदलण्याचा विचार करा. 

इमोशनल निर्णय

लग्न हे दोन हृदयांचं नातं आहे हे बरोबर आहे पण प्रॅक्टिकल होणेही तितकेच गरजेचे आहे. इमोशनल होऊन घेतलेला निर्णय योग्य नसतो. प्रेमाशिवाय जीवनात पैसे, करिअर, सिक्युरिटी, फॅमिली इत्यादी गोष्टीही गरजेच्या असतात. जर जीवनात भौतीक गरजा पूर्ण न झाल्यास चांगली चांगली नाती तुटतात.

घाई गडबडीत अटी मान्य करणे

लगेच सगळं ठरवून लग्न करण्याच्या पद्धतीला अनेकजण पसंत करतात. पण काहीही फायनल करण्यापूर्वी थोडा वेळ घ्या. जगात लाखो लोक जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यामुळे काही कमी नाहीये. तसेच अनेकदा घरातील लोक मुलाचं किंवा मुलीचं लग्न व्हावं यासाठी विचित्र मागण्या मान्य करुन करतात. अशाने दोन्हीबाजूच्या अपेक्षा वाढतात. आणि त्या पूर्ण झाल्यास नात्यात कटूता येते.

स्वभावकडे दुर्लक्ष करणे

अनेकदा पार्टनरच्या शोधात त्या व्यक्तीच्या स्वभावाला फार महत्त्वच दिलं जात नाही. मुलगा किंवा मुलगी हे जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही की, समोरचा व्यक्ती किती प्रेमळ आणि किती जुळवून घेणारा आहे, कोणताही अट न घालता आपल्याला सपोर्ट करणारा आहे का? अनेकजण बोलण्यावरही लक्ष देत नाहीत. पण हे कोणत्याही नात्यासाठी महत्त्वाचं आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न