शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

तक्रार अशी करा की ऐकली गेली पाहिजे, प्रश्नांचा करू नका भडीमार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 12:04 IST

पत्नीची नेहमी तक्रार असते की, पती त्यांना वेळ देत नाहीत आणि तेच पतीची तक्रार असते की, पत्नी जास्त खर्च करते. तशा या तक्रारी फारच सामान्य आहेत.

(Image Credit : www.rd.com)

पत्नीची नेहमी तक्रार असते की, पती त्यांना वेळ देत नाहीत आणि तेच पतीची तक्रार असते की, पत्नी जास्त खर्च करते. तशा या तक्रारी फारच सामान्य आहेत. पण काही गोष्टी अशा असतात ज्या सांगणे आणि समजून घेणे दोन्ही गरजेच्या असतात. जेणेकरून नातं चांगलं रहावं. अशा अनेक तक्रारी असतात ज्या मनाच्या एका कोपऱ्यात वर्षानुवर्षे असतात, पण कधी सांगू शकत नाहीत किंवा असं म्हणूया की, संधी मिळत नाही. नात्यांमध्ये तक्रारी होणे सामान्य बाब आहे. खासकरून तेव्हा जेव्हा नातं आयुष्यभरासाठी असतं. अशात तक्रारी या दूर करण्यातच फायदा असतो. त्यासाठी तक्रार निट ऐकून घेणे महत्त्वाचे आहे.

भावना व्यक्त करा

काही वाईट वाटलं असेल आणि बोलण्यात अडचण येत असेल तर या स्थितीतून बाहेर पडा. बोलणं गरजेचं आहे. मनात साचवून ठेवाल तर रागात साचलेलं सगळं बाहेर पडेल. मनातलं सांगून टाकणं नात्याच्या मजबूतीसाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे अशा वेळेचा शोध घ्या जेव्हा तुम्हाला दोघांनाही पुरेसा वेळ असेल. दोघांचाही मूड शांत असेल अशी वेळ निवडा. बोलण्याची सुरूवात शांतपणे करा. सामान्य भाषेत जे सांगायचं ते सांगा.

(Image Credit : www.rd.com)

काय करू नये - बोलण्याची सुरूवात करताच टिका, आरोप, चिडचिड करू नका. याने समोरची व्यक्ती एकतर निघून जाईल नाही तर संवाद वादात बदलेल. समोरच्याला हे वाटू देऊ नका की, तुम्ही त्याला दोष देताय, त्यांना असं वाटावं की, तुम्ही तुमच्या मनातलं त्याच्याशी बोलताय.

जे सांगायचं ते स्पष्ट सांगा

(Image Credit : amansquest.com)

तुम्ही जेव्हा बोलण्याची सुरूवात करता आणि पार्टनरला सांगता की, तुम्हाला त्यांच्या वागण्याबाबत कसं वाटतं, तेव्हा यावेळी स्पष्ट बोला. त्या गोष्टींबाबत सांगा ज्या तुम्हाला खटकतात. जेणेकरून समोरच्याला समजून घेऊ शकेल आणि आपल्या वागण्यात बदल आणू शकेल.

(Image Credit : www.bustle.com)

काय करू नये - हवेत गोष्टी केल्याने काहीही फायदा होत नाही. जे काही बोलायचंय किंवा सांगायचंय ते स्पष्ट असावं. तुम्ही समोरच्यावर दोषरोप करताय असं वाटायला नको.

जे मनात आहे ते बोला

(Image Credit : www.allrelationshipmatters.com.au)

जर तुम्हाला वाटत असेल की, समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजू शकत नाही. तेव्हा मनातत्या मनात अंदाज बांधत बसण्यापेक्षा यावर मोकळेपणाने बोला. जर तुम्हाला वाटतं की, पतीने तुम्हाला वेळ द्यावा तर याबाबत त्यांना सांगा. पतीला जर वाटत असेल तर की, तुम्ही प्रत्येक गोष्टीतील लुडबूड कमी करावी किंवा प्रश्न कमी विचारावे तर या गोष्टीतही बदल व्हायला हवा. मनात जे आहे ते एकमेकांशी बोलणार नाही तर समस्येचं समाधान कसं निघणार? याचा विचार करा.

(Image Credit : www.mensstyle.com.au)

काय करू नये - मनात गैरसमज ठेवू नका. या गोष्टीची वाट बघू नका की, समोरची व्यक्ती बोलणं सुरू करेल. तक्रारींचा पेटारा जेवढ्या लवकर उघडाल तेवढ्या लवकर समस्या दूर होईल.

समस्या समजून घ्या

(Image Credit : thestir.cafemom.com)

आता बोलणं सुरू झालंच आहे तर हे जाणून घेणं गरजेचं आहे की, समस्या काय आहे. सोबतच हेही विचारा की, त्यांच्या वेगळ्या वागण्याचं कारण काय आहे. शांतपणे विचारलं तर तेही तुमच्यासमोर स्पष्टपणे बोलू शकतील. दोघांनीही समस्या समजून घेणं महत्त्वाचं आहे.

काय करू नये - समस्या जाणून घेताना प्रश्नांचा भडीमार करू नका. तसेच प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्यासाठी समोरच्याला वेळ द्या. लागोपाठ प्रश्न विचारल्याने समोरच्या व्यक्तीची चिडचिड होणे स्वाभाविक आहे.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप