शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

ब्रेकअपनंतर एक्ससोबत मैत्री करण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 13:06 IST

एक्स तर तुमच्या जीवनाचा महत्वाचा भाग असतो. त्यामुळे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे अधिक फायद्याचेच आहे.

बेक्रअप कधीही कुणासाठीही सोपं नसतं. तुमच्या भावना दुखावल्या जातात. अनेक प्रश्न मनाला पडतात आणि बदला घेण्याची भावना तुमच्या नात्याला नेहमीसाठी बुरशी लावून जाते. तसं तर अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की, तुमचं ब्रेकअप झाल्यास तुमच्या आत दडवून ठेवलेल्या राग, मत्सर, द्वेषामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच नकारात्मक विचारांना सोडून तुमच्या एक्ससोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. याने तुमचाच फायदा होईल.

रिसर्चमध्ये समोर आलं आहे की, कुणाची चूक माफ केल्याने तुमचं आरोग्य अधिक चांगलं होतं. तुमचं हृदय आरोग्यदायी राहतं. कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी राहते, चांगली झोप येते, ब्लड प्रेशन कंट्रोल राहतं, तणाव, स्ट्रेस नाहीसा होतो. सोबतच यामुळे आयुष्यही वाढतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला क्षमा करा आणि त्याच्या चुका विसरून जा. याने तुमचं डोकं शांत होईल. 

या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेवू पण तुमच्या एक्सचं तुमच्या जीवनात काही ना काही, कधी ना कधी महत्व होतं. जी व्यक्ती कधी तुमच्या जीवनात महत्वाची होती, ज्यासोबत तुम्ही जीवनातील अनेक महत्वाचे क्षण घावलले होते. त्या सगळ्या आठवणींना एकाएकी नष्ट करणे शक्य नाही. नात्याचा असा कटू अंत जीवनाला बेरंग करू शकतो. त्यामुळेच आपल्या एक्सच्या संपर्कात रहा जेणेकरून त्या आठवणी तुमच्या जीवनात यादगार राहतील.

कित्येकदा पार्टनरसोबत ब्रेकअप करण्याचा अर्थ त्या सर्व मित्रांशी ब्रेकअप करणं जे तुमचे कॉमन फ्रेन्ड होते. तशी ही स्थिती सर्वांसाठीच कठिण आणि विचित्र असते. पण जर तुम्ही तुमच्या एक्ससोबत समजून-जाणून ब्रेकअप केल्यास आणि मैत्री ठेवल्यास त्या मित्रांनाही गमवण्याची शक्यता कमीच असते. 

जर तुम्ही लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये राहिले असाल आणि तुम्हाला माहिती असेल की, तुमच्या एक्सपेक्षा जास्त चांगलं तुम्हाला कुणीही समजू शकत नाही. अशात तुमच्या मनात त्याच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर असतोच. याचा अर्थ तुम्ही चांगले मित्र होऊ शकता. जीवनात कधी कुणाशी काम पडेल सांगता येत नाही. अशात एक्स तर तुमच्या जीवनाचा महत्वाचा भाग असतो. त्यामुळे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे अधिक फायद्याचेच आहे.

जर दीपिका पादुकोन आणि रणबीर कपूर सारखे तुम्ही दोघेही एकाच इंडस्ट्रीत काम करत असाल तर शक्यता आहे की, तुम्हाला पुढे सोबतही काम करावं लागेल. त्यामुळे जुन्या गोष्टींना विसरून किंवा चांगली आठवण केवळ लक्षात ठेवून राग मनातून काढून टाकणे. अशात केवळ तुम्ही कपल नाहीत म्हणून आपलं करिअर धोक्यात टाकणं हे पण शहाणपणाचं नसेल.

टॅग्स :relationshipरिलेशनशिप