शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

'या' ७ प्रकारच्या व्यक्तींना डेट करत असाल तर वेळीच व्हा सावध, नंतर होईल पश्चाताप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 16:09 IST

अनेकदा एखाद्या नात्याची सुरूवात ही केवळ आकर्षणामुळे होते. पुढे ते या आकर्षणाला प्रेम समजून संसारही थाटतात.

(Image Credit : eharmony.co.uk)

अनेकदा एखाद्या नात्याची सुरूवात ही केवळ आकर्षणामुळे होते. पुढे ते या आकर्षणाला प्रेम समजून संसारही थाटतात. पण पुढे अशा काही गोष्टी घडतात की, दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधून भांडणं होतात. ही भांडणं, वाद टाळायचे असतील तर लग्नाआधीच एकमेकांना चांगलं जाणून घेणं महत्वाचं ठरतं. जर तुम्ही एखाद्या मुलाला डेट करत असाल तर त्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला कळेलच असं नाही. त्यामुळे तुम्ही डेट करत असलेल्या व्यक्तीच्या खालील 7 सवयींकडे नक्की लक्ष द्या...यात फायदा तुमचाच...

१) संकुचित विचाराचा

(Image Credit : wikihow.com)

जी व्यक्ती तुमच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. ती व्यक्ती कायम तुमच्यावर या ना त्या कारणाने बंधनं लादत असतात. सतत तुमच्यावर संशय घेत असतात, तर या नात्याबाबत तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. ती व्यक्ती तुमच्यासोबत किती एकनिष्ठ आहे हे तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. खरंतर अशा व्यक्तीमुळे तुम्हाला सुख मिळण्याऐवजी त्रासच जास्त होण्याची शक्यता अधिक असू शकते. 

2) मनमानी करणारा/करणारी

(Image Credit : drprem.com)

काही लोकं अशी असतात जी सतत 'मेरीच गीनो' अशा अविर्भावात वागत असतात. दोघांनी मिळून तयार झालेलं हे नातं तो त्याच्याच नियमांनी हाकत असतो. अशावेळी  दोघांपैकी एकाची कुचंबना होण्याची जास्त शक्यता असते. प्रत्येक नात्यांत काही बेसिक अलिखित नियम असतात. हे नियम पाळले गेले नाही तर भांडणं वाढतात. 

3) स्त्रियांचा आदर

(Image Credit : monkknows.com)

जी व्यक्ती स्त्रियांचा आदर करत नसेल तर मग काय बोलायचं? तुमच्या आयुष्यातील व्यक्ती जर तुमचा आदरच करत नसेल आणि तुम्हाला सतत दुय्यम लेखत असेल तर त्या नात्याला काय अर्थ? कोणत्याही नात्यात ऐकमेकांचां आदर करणं महत्वाचं असतं.

 4) विचार आणि भावनांचा आदर

कोणत्याही नात्यात तुमचे विचार आणि भावना जपणंही तितकंच महत्वाचं आहे. जर हे होत नसेल तर त्याला खरंच प्रेम म्हणता येईल का? असा प्रश्न उभा ठाकतो. जर तुमच्या विचारांचा आणि भावनांचा आदर होत असेल, तरच तुम्ही योग्य व्यक्तीसोबत आहात असे समजा.

5) सतत विनाकारण भांडणारी व्यक्ती

(Image Credit : stellar.ie)

प्रेमाच्या नात्यात भांडणातही एक गोडवा असतो. पण ते भांडण फार काळ असू नये. भांडण हा प्रेमाचाच एक भाग आहे. पण काही व्यक्ती विनाकारण उगाच काहीतरी कारण शोधून सतत भांडत असतात. काही कारण असल्यावर भांडण केल्यास एकवेळ ठिक. पण उगाच भांडण केल्याने तुमचा मनस्ताप अधिक वाढण्याची शक्यता आहे.

6) खोटं बोलून फसवणारी व्यक्ती

(Image Credit : glamour.com)

ते म्हणतात ना की, एखादं खोटं बोलल्याने कुणाचं नुकसान होत नसेल तर ते खोटं एकवेळ चालून जातं. पण एखादी व्यक्ती सतत खोट्याचा आधार घेऊन तुमची फसवणूक करत असेल तर हे अडचणीचं ठरु शकतं. एक खोटं बोलायला दुसरं खोटं आणि दुसरं खोट बोलायला तिसरं. अशावेळी नात्यामध्ये फक्त दुरावा निर्माण होतो. जर ती व्यक्ती नातं तोडण्यासाठी हेच कारण असेल तर खरचं याचा विचार करा.

7) खाजगी स्पेस 

(Image Credit : divorcedgirlsmiling.com)

प्रत्येक नात्यात दोघांनीही एकमेकांना खाजगी स्पेस देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला खाजगी आयुष्य आहे. याचं भान ठेवून स्वतंत्र आयुष्य जगण्यास मदत करणं गरजेचं आहे. पण ते होत नसेल तर विचार करावा.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप