शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

उशिरा लग्न करण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 11:36 IST

घरातील वयोवृद्ध लोक अनेक उदाहरणं देत लवकर लग्न करण्याचा सल्ला देतात. पण आजच्या काळात उशिरा लग्न करण्याचेही अनेक फायदे आहेत.

घरातील लोक मुला-मुलींचं वय 25 झालं की, त्यांच्या मागे लग्नाचा तगादा लावतात. घरातील वयोवृद्ध लोक अनेक उदाहरणं देत लवकर लग्न करण्याचा सल्ला देतात. पण आजच्या काळात उशिरा लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत. ते काय हे जाणून घेऊया... 

आर्थिक स्थैर्य

वेळेनुसार तुमची आर्थिक स्थिती मजबूत झालेली असते. करिअरही ब-यापैकी सेट झालेलं असतं. वेळेनुसार तुमच्यात बराच समजूतदारपणाही आलेला असतो. वायफळ गोष्टींवर तुम्ही खर्च करणं टाळत असता. त्यामुळे तुमची बरीच बचत झालेली असते. 

परिपक्वता

काही लोकांना जबाबदारीची जाणिव ही वयासोबत नाहीतर वेळेनुसार होते. अशात तुमच्याकडे तुमच्यात आलेल्या समजूतदारपणाचा योग्य उपयोग करण्याची संधी असते. यावेळात तुम्ही तुमच्या भविष्याबाबत आणखी चांगल्याने विचार करु शकता.

स्वत:ला ओळखण्याची संधी

उशीरा लग्न करण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुम्हाला स्वत:ला ओळखण्याची संधी मिळते. तुम्हाला स्वत:कडून काय हवंय आणि दुस-यांकडून काय हवंय, याचं ब-यापैकी उत्तर मिळालेलं असतं. 

वेळेनुसार विचार बदलतात

वेळेनुसार व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल होत असतो याबाबत कुणाचही दुमत नसेल. 20व्या वर्षी जी गोष्ट तुम्हाला आवडायची ती 40 व्या वर्षीही आवडेलच हे गरजेचं नाही. पण वयाच्या एका वळणावर तुम्हाला लाईफबद्दल गंभीरतेने विचार करण्याची गरज असते. 

स्वप्न पूर्ण करण्याची संधी

जर तुम्ही उशीराने लग्न कराल तर तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळते. कुटूंबाच्या अडचणीमध्ये अडकण्याऐवजी तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष करिअर आणि स्वप्न पूर्ण करण्यावर केंद्रीत करु शकता.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न