शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

लाइफ पार्टनरकडून कधीही या ७ अपेक्षा ठेवणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 12:59 IST

प्रत्येकालाच आपल्या पार्टनरकडून काहीना काही अपेक्षा असतात. खरंतर आपल्या पार्टनरकडून काही गोष्टींची अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही.

(Image Credit : Psychalive)

प्रत्येकालाच आपल्या पार्टनरकडून काहीना काही अपेक्षा असतात. खरंतर आपल्या पार्टनरकडून काही गोष्टींची अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही. अर्थात त्या चुकीच्या किंवा फार जास्त असू नयेत. अनेकदा काही रिलेशनशिप या एकमेकांकडून फार जास्त किंवा चुकीच्या अपेक्षा ठेवल्यामुळेच टिकत नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला ७ अशा गोष्टी सांगत आहोत ज्यांची तुम्ही तुमच्या पार्टनरकडून अपेक्षा करू नका. याने तुम्हाला तुमचं नातं चांगलं आणि टिकवून ठेवण्यास मदत होईल.

तुमच्या मनातलं ओळखण्याची अपेक्षा

प्रत्येकवेळी तुमच्या मनात काय सुरू आहे किंवा तुम्ही काय विचार करताय हे पार्टनरने स्वत:हून ओळखावं ही खरंतर चुकीचीच अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही काही वर्षे जरी तुम्ही सोबत घालवले असतील तरीही याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला वाढदिवसाला काय गिफ्ट हवंय किंवा त्या दिवशी तुम्हाला काहीतरी स्पेशल करायचं आहे हे त्याला आपोआप कळेल. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरने तुमच्यासाठी काही वेगळं करावं किंवा काही वेगळं घ्यावं असं वाटत असेल तर त्याला थेट सांगा. हे कधीही चांगलं. 

नेहमी परफेक्ट दिसावं

तुम्हाला जर असं वाटत असेल की, तुमच्या पार्टनरने प्रत्येकवेळी परफेक्ट दिसावं तर तुम्ही एखाद्या बाहुलीसोबत डेट करायला हरकत नाही. कुणी कसं रहावं, कुणी कसं वागावं हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मग तो-ती तुमचा पार्टनर का असेना. जसे तुम्ही आहात तसाच जर दोघांनाही आनंद मिळत असेल तर कशाला बनावटीवर इतकं लक्ष केंद्रीत करायचं. 

हो ला हो...

दोन व्यक्ती एकसारखे असू शकत नाहीत आणि त्यांचे विचारही तंतोतंत सारखे नसतात. वेगवेगळ्या गोष्टींवर तुमच्या पार्टनरचे वेगळे विचार असणे यात काहीच गैर नाही. महत्त्वाचं हे ठरतं की, तुम्ही तुमचा पार्टनर जसा आहे तसा स्विकारणे. एकमेकांच्या विचारांचा, मतांचा सन्मान करणे हे महत्त्वाचं आहे. यानेच तुमचं नातं अधिक काळ चांगलं राहू शकतं. 

सगळं तूच बघ, तूच काळजी घे

लग्न झालेलं असो वा तुम्ही सिरिअस रिलेशनशिपमध्ये असाल तर याचा अर्थ हा नाही की, तुमच्या पार्टनरनेच तुमच्या गरजांची काळजी किंवा घराची संपूर्ण जबाबदारी घ्यावी. पार्टनरने तुमची काळजी घ्यावी, तुम्हाला समजून घ्यावं ही अपेक्षा करणे चूक नाही. पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणं किंवा तिला प्रत्येक गोष्टीकडे बघायला सांगणं चुकीचं आहे. 

आधीसारखाच वाग

जसजसा काळ पुढे जातो व्यक्ती बदलतो. अनेकदा आपण विचार करतो तशा गोष्टी होत नसतात. म्हणजे आता ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता ती व्यक्ती पुढील काही वर्षांनी आणखी बदलेल. हेच तुमच्यासोबतही घडू शकतं. त्यामुळे हे चुकीचच आहे की, पार्टनरला आधीसारखाच रहा, बदलू नकोस, असाच वाग किंवा तसाच वाग म्हणणं. 

शारीरिक संबंध

तुमचं लग्न जरी झालं असेल तरी सुद्धा तुमचा किंवा समोरच्या व्यक्तीचा मूड झाला म्हणून शारीरिक संबंध ठेवणे योग्य नाही. म्हणजे ही गोष्ट दोघांच्याही आनंदाची आहे. त्यामुळे ही गोष्ट दोघांच्याही इच्छेनुसारच व्हायला हवी. एकट्याच्या मनानुसार नाही.

कामाची तडजोड

ही फारच चुकीची अपेक्षा आहे. आपल्या कामासाठी पार्टनरला त्याच्या करिअरसोबत तडजोड करायला सांगणे चुकीचे आहे. हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. समोरच्या व्यक्तीने स्वत:हून असं केलं तर वेगळी गोष्ट आहे. पण कुणाला यासाठी जबरदस्तीने असं काही सांगणे चुकीचेच आहे. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप