शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेनंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 18:47 IST

Ratnagiri ZpNews- रत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे दि. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर राजीनामे देणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच जिल्हा नियोजन समितीवर असलेल्या सदस्यांना यावेळीही अध्यक्ष, सभापतिपदापासून दूर राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेनंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामेशिवसेनेचे ३९, राष्ट्रवादीचे १५ असे पक्षीय बलाबल

रत्नागिरी : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे दि. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर राजीनामे देणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच जिल्हा नियोजन समितीवर असलेल्या सदस्यांना यावेळीही अध्यक्ष, सभापतिपदापासून दूर राहावे लागणार आहे.पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाच्या मुदतीप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती यांना राजीनामे देण्याचे आदेश शिवसेनेकडून देण्यात आले आहेत. मात्र, या सर्व पदाधिकाऱ्यांची मुदत मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे ३९, राष्ट्रवादीचे १५ आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले एक सदस्य असे पक्षीय बलाबल आहे.

दरम्यान, त्यामध्ये शिवसेनेच्या १६ सदस्य जिल्हा नियोजन समिती आहेत. त्यामुळे उर्वरित २३ जणांना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतिपदे मिळणार हे निश्चित होते. त्यापैकी महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे आणि समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव या जिल्हा नियोजन समितीवर आहेत. नियोजन समितीचे सदस्य पद राष्ट्रवादीकडे जाऊ नये, यासाठी ऋतुजा जाधव यांना शिवसेनेकडून संधी देण्यात आली होती.दरम्यान, चंद्रकांत मणचेकर, पर्शुराम कदम, पूजा नामे, स्वप्नाली पाटणे, रेश्मा झगडे, मानसी साळवी आणि मंदा शिवलकर हे नियोजन समितीचे सदस्य नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेतील पदे मिळणार हे निश्चित आहे. मात्र, शिवसेनेमध्ये मानसी साळवी आणि मंदा शिवलकर यांच्याबद्दल नाराजी असल्याने त्यांना सभापतिपदापासून दूर ठेवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.कौन बनेगा अध्यक्षअध्यक्षपदासाठी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू व बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती अण्णा कदम यांच्यासह आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र व राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विक्रांत जाधव यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, विक्रांत जाधव यांचे नाव चर्चेत असले तरी ते अजूनही राष्ट्रवादीमध्येच आहेत. राज्यात आघाडी सरकार असल्याने त्यांना संधी मिळू शकते. मात्र काही जणांचा त्याला विरोध आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी