शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सर्वसाधारण सभेनंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 18:47 IST

Ratnagiri ZpNews- रत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे दि. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर राजीनामे देणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच जिल्हा नियोजन समितीवर असलेल्या सदस्यांना यावेळीही अध्यक्ष, सभापतिपदापासून दूर राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेनंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामेशिवसेनेचे ३९, राष्ट्रवादीचे १५ असे पक्षीय बलाबल

रत्नागिरी : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे दि. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर राजीनामे देणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच जिल्हा नियोजन समितीवर असलेल्या सदस्यांना यावेळीही अध्यक्ष, सभापतिपदापासून दूर राहावे लागणार आहे.पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाच्या मुदतीप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती यांना राजीनामे देण्याचे आदेश शिवसेनेकडून देण्यात आले आहेत. मात्र, या सर्व पदाधिकाऱ्यांची मुदत मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे ३९, राष्ट्रवादीचे १५ आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले एक सदस्य असे पक्षीय बलाबल आहे.

दरम्यान, त्यामध्ये शिवसेनेच्या १६ सदस्य जिल्हा नियोजन समिती आहेत. त्यामुळे उर्वरित २३ जणांना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतिपदे मिळणार हे निश्चित होते. त्यापैकी महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे आणि समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव या जिल्हा नियोजन समितीवर आहेत. नियोजन समितीचे सदस्य पद राष्ट्रवादीकडे जाऊ नये, यासाठी ऋतुजा जाधव यांना शिवसेनेकडून संधी देण्यात आली होती.दरम्यान, चंद्रकांत मणचेकर, पर्शुराम कदम, पूजा नामे, स्वप्नाली पाटणे, रेश्मा झगडे, मानसी साळवी आणि मंदा शिवलकर हे नियोजन समितीचे सदस्य नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेतील पदे मिळणार हे निश्चित आहे. मात्र, शिवसेनेमध्ये मानसी साळवी आणि मंदा शिवलकर यांच्याबद्दल नाराजी असल्याने त्यांना सभापतिपदापासून दूर ठेवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.कौन बनेगा अध्यक्षअध्यक्षपदासाठी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू व बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती अण्णा कदम यांच्यासह आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र व राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विक्रांत जाधव यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, विक्रांत जाधव यांचे नाव चर्चेत असले तरी ते अजूनही राष्ट्रवादीमध्येच आहेत. राज्यात आघाडी सरकार असल्याने त्यांना संधी मिळू शकते. मात्र काही जणांचा त्याला विरोध आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी