शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ताह्मणमळा येथील जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:50 IST

चिपळूण : भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशातील रोर्इंग जिल्ह्यात चीनच्या सीमेवर सेवा बजावत असताना तालुक्यातील ताह्मणमळा गवळवाडी येथील जवान जयेंद्र राजाराम तांबडे (वय ३४) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अरुणाचल प्रदेशातील उंच अशा ठिकाणी प्राणवायू कमी पडल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सोमवारी (दि. २ जुलै) सकाळी ८.३० वाजता त्यांचे निधन झाले.रोर्इंग जिल्ह्यात ...

चिपळूण : भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशातील रोर्इंग जिल्ह्यात चीनच्या सीमेवर सेवा बजावत असताना तालुक्यातील ताह्मणमळा गवळवाडी येथील जवान जयेंद्र राजाराम तांबडे (वय ३४) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अरुणाचल प्रदेशातील उंच अशा ठिकाणी प्राणवायू कमी पडल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सोमवारी (दि. २ जुलै) सकाळी ८.३० वाजता त्यांचे निधन झाले.रोर्इंग जिल्ह्यात पायोनियर कंपनीमध्ये जयेंद्र तांबडे हे शिपाई पदावर होते. मंगळवारी सकाळी ही माहिती तालुक्यात पसरली. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास त्यांना अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला व आॅक्सिजनची कमतरता भासल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला.या हिल स्टेशनवरून त्यांना मोटारीने अरुणाचल प्रदेशातील सैन्याच्या रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांची प्राणज्योत मालवली. २००८ मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. त्यांचे दोन चुलत बंधू सैन्यात आहेत. अवघ्या ३४ व्या वयाच्या जवानाचा अकाली मृत्यू झाल्याने तांबडे कुटुंबीयांनाच नाही तर पंचक्रोशीला धक्का बसला आहे.जवान जयेंद्र यांचे आई-वडील ताह्मणमळा येथे शेती करतात. त्यांचीपत्नी प्रियांका दोन लहानमुलांसह चिपळूणमध्ये राहते. दोन भाऊ मुंबईमध्ये कामाला आहेत. सैन्यामध्ये असलेले त्यांचे चुलत भाऊ प्रवीण तांबडे हे सुटीनिमित्त गावाला आले होते. येथेच त्यांना ही दु:खद बातमी कळली. त्यानंतर ते मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबईला गेले आहेत.रात्री उशिरा पार्थिव आणणारहवामान खराब असल्यामुळे अरुणाचल प्रदेशमधून त्यांचा मृतदेह आणण्यास उशीर झाला. रोहिंग येथील दिब्रुगड, त्यानंतर कोलकाता येथून विमानाने मुंबई येथे त्यांचा मृतदेह आणण्यात आला.मंगळवारी सायंकाळी उशिरा ताह्मणमळा येथे त्यांचे पार्थिव आणले जाणार आहे. आज, बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.दोन लहानगीजयेंद्र यांचा मुलगा अंकित साडेतीन वर्षांचा, तर मुलगी आर्या फक्त सव्वा वर्षाची आहे. त्यामुळे जयेंद्र यांच्या अशा अकाली जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.