शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

यंदा अंधारमय दिवाळी

By admin | Updated: November 8, 2015 23:34 IST

२३ हजार शिक्षक : विनाअनुदानित प्राध्यापकांचा प्रश्न गंभीर

मार्लेश्वर : महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांवर काम करणाऱ्या प्राध्यापकांना शासन वेतन अनुदान सुरू करु न शकल्याने यावर्षीही राज्यातील सुमारे २३ हजार विनाअनुदानित प्राध्यापकांची दिवाळी अंधारमय जाणार आहे. रिकाम्या पोटी काम करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांची व्यथा सरकारला कळत नसल्याने विनाअनुदानित प्राध्यापकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा समितीतर्फे आंदोलने, उपोषणे करण्यात आली. बोर्डाच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आले. प्राध्यापकांची होणारी परवड काँग्रेस सरकारने लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २६ फेब्रुवारी २०१४ रोजी या सर्व कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द वगळून त्यांना अनुदान सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय होऊन दीड वर्ष उलटलं तरी सध्या प्राध्यापकांना वेतन अनुदनाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. महाराष्ट्रात सन २००१ पासून आजवर विनाअनुदानित तत्वावर ११ हजार ९०० तुकड्यांवर सुमारे २३ हजार प्राध्यापक अध्यापनाचे काम करत आहेत.जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना एम. ए. बी. एड., एम. एस्सी. बी. एड., एम. कॉम. बी. एड. आदी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक असते. उच्चशिक्षण घेऊन सुध्दा या प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घोषणेनंतर राज्यात सुरु असलेल्या विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे आॅनलाईन व आॅफलाईन पध्दतीने मुल्यांकन करण्यात आले. परंतु, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय आॅफलाईन मूल्यांकनाला पात्र. नसल्याचे घोषित करण्यात आले. शिक्षणाधिकाऱ्यांच्या या भूमिकेवर कोल्हापूरचे विभागीय उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी मौनव्रत ठेवल्याने सध्या रत्नागिरी, सिंधुदुुर्ग जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय आॅफलाईन मुल्यांकनापासून वंचित राहिली आहेत. एकीकडे राज्यामध्ये गेली पाच वर्षे कोकण बोर्ड अव्वल स्थानी आहे. हे अव्वल स्थान गाठून देणारी विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये वेतन अनुदान देतेवेळी मूल्यांकनासच अपात्र कशी? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या राज्यातील कोणत्याही तालुक्याचा अभ्यास केल्यास सुमारे ६५ टक्के कनिष्ठ महाविद्यालये ही विनाअनुदानित तत्वावर चालवली जात आहेत. (वार्ताहर)२००१पासून संघर्ष२४ नोव्हेंबर २००१ला कनिष्ठ महाविद्यालये अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित तत्वावर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली.नुकसानी : वैयक्तिक मान्यता शिबिरच नाहीसन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशांना अनुदान दिले जाईल, अशी घोषणा होऊन परिपत्रक देखील जारी केले होते. परंतु, घोषणा ते वेतनलाभ यामध्ये खूप दिरंगाई होत असल्याने प्राध्यापक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या २०१४-१५ची संच मान्यता कामकाज पूर्ण झाले नसल्याने गेली सव्वा वर्षे प्राध्यापकांचे वैयक्तिक मान्यता शिबिर झाले नसल्याने विना अनुदानित प्राध्यापकांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.