शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शिवसेना पक्ष प्रवक्तेपदी निवड, उदय सामंत यांना वाय प्लस सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:50 IST

शिवसेनेने रत्नागिरीला पुन्हा एकदा झुकते माप दिले असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड केली आहे. खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवक्ते म्हणून निवड होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिवसेना पक्ष प्रवक्तेपदी निवड, उदय सामंत यांना वाय प्लस सुरक्षारत्नागिरीला पुन्हा एकदा झुकते माप

रत्नागिरी : शिवसेनेने रत्नागिरीला पुन्हा एकदा झुकते माप दिले असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड केली आहे. खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवक्ते म्हणून निवड होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या दोघांचीही निवड करण्यात आली. मंत्री उदय सामंत यांच्यासह परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, धैर्यशील माने, नीलम गोऱ्हे, प्रियांका चतुर्वेदी, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, किशोरी पेडणेकर यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उदय सामंत यांनी आपल्या कार्यकौशल्याने पक्षात चांगला ठसा उमटवला आहे. अल्पावधीतच त्यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण केली आहे.

निवडणुकीच्या काळात पुण्याची जबाबदारी सामंत यांच्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना नेते म्हणूनही त्यांची निवड झाली होती. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत राज्य मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्रीपद त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड झाली आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी