शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले, शिवसेनेचे २७ जानेवारीला चक्काजाम आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 18:08 IST

काम न करणाऱ्या ठेकेदारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवणार.

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेले अकरा महिने रखडले आहे. त्यामागून मंजूर झालेला समृद्धी महामार्ग पूर्ण होत आला आहे. ठेकेदार व अधिकारी सूचना देऊनही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कोकणी माणसाच्या सहनशीलता संपत आली आहे.काम न करणाऱ्या ठेकेदारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवला जाणार असून, २७ जानेवारी रोजी मुंबई-गोवा महामार्गावर पाच ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.वाकेड ते आरवली हे दोन टप्पे प्रामुख्याने रखडले असून, या क्षेत्रात नऊ ते दहा टक्केच कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महामार्गाच्या कामाबाबत जनतेकडून संताप व्यक्त होत असल्याने केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता लांजा, पाली, हातखंबा, आरवली, चिपळूण या ठिकाणी चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार साळवी यांनी स्पष्ट केले. खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले जाणार आहे.खासदार राऊत, मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अनेकवेळा बैठका घेतल्या आहेत. महिनाभरापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रखडलेली कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महिना उलटूनही ठेकेदाराने लक्ष दिलेले नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे महामार्गाचे काम ठप्पच आहे. त्यामुळे केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेनेबरोबरच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.खेडमध्ये आमदार योगेश कदम, चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधव व आमदार निकम, हातखंबा व पाली येथे मंत्री सामंत व लांजात आपण याचे नेतृत्व करणार असल्याचे आमदार साळवी यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात खासदार विनायक राऊत स्वत: सहभागी होणार आहेत. यावेळी महामार्गावरील बाजारपेठा बंद ठेवून व्यापारीही आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनीही परखड मते व्यक्त केली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख वेदा फडके, उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, जगदीश राजापकर, संजू साळवी, रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, शहरप्रमुख बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गShiv Senaशिवसेना