शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर विकासाच्या कामाचा आठवडाभरात शुभारंभ, ११३ कोटींच्या निधीला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:45 IST

अतिक्रमणे हटविल्यानंतर बंदराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदर टप्पा २ अंतर्गत विकास करण्यासाठी शासनाकडून ११३ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता यापूर्वीच देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी २२ काेटींचा निधी उपलब्ध आहे. या कामांचे भूमिपूजन आठवडाभरात करण्यात येणार असल्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात सांगितले. त्यामुळे लवकरच या बंदराचा कायापालट झालेला पाहायला मिळणार आहे. २२ कोटींची कामे दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहेत.मिरकरवाडा बंदराच्या २५ हेक्टर जागेवर गेली कित्येक वर्षे अनधिकृत बांधकामे होती. त्यामुळे बंदराचा विकास गेली कित्येक वर्षे रखडला होता. मंत्री नीतेश राणे यांनी रत्नागिरी दौरा केल्यानंतर वस्तुस्थिती पाहून वर्षानुवर्षे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेली सर्व बांधकामे त्वरित हटवण्याच्या सूचना दिल्या. ही अतिक्रमणे हटविल्यानंतर बंदराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्यातील निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आठवडाभरात पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत २२ कोटी निधीच्या कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे मंत्री नीतेश राणे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच मिरकरवाडा बंदराचे रुपडे पालटलेले पाहायला मिळणार आहे.यापूर्वी मिरकरवाडा टप्पा १ मध्ये ७४ कोटी रुपये मंजूर झाले होते. यामध्ये मत्स्य बंदराच्या पश्चिमेकडील अस्तित्वात असलेल्या १५० मीटर लांबीच्या ब्रेकवॉटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उत्तरेकडील ६७५ मीटर लांबीच्या नवीन ब्रेकवॉटरचे काम पूर्ण झाले. त्यानंतर आता टप्पा २ साठी ११३ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.दुसऱ्या टप्प्यात ही कामे१५० मीटरची लाटरोधक भिंत बांधणे, नौकांच्या मार्गातील गाळ काढणे, लिलाव गृह, जाळे विणण्याच्या शेड, निवारा शेड, धक्का व जेटी दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, वर्कशॉप बांधणे, प्रशासकीय इमारत, उपाहार गृह, रेडियो कम्युनिकेशन सेंटर, प्रसाधन गृह, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गार्ड रूम बांधणे, आग प्रतिबंधक उपाययोजना आदी कामांचा यामध्ये समावेश आहे.