शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

मिरकरवाडा टप्पा -२चे काम सुरू, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये नवीन बंदर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:36 IST

कोकणातील बंदरांच्या विकासासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील बंदरांसाठी ३१२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिरकरवाडा टप्पा - २चा समावेश आहे, तर सिंधुदुर्गातील आनंदवाडी येथे मासेमारी बंदर उभारण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील करंजा येथे मासे उतरविण्यासाठी बंदर बांधण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमिरकरवाडा टप्पा -२चे काम सुरू, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये नवीन बंदर होणारअर्थसंकल्पीय अधिवेशात तरतूद : कोकणातील बंदर विकासासाठी ३१२ कोटी

रत्नागिरी : कोकणातील बंदरांच्या विकासासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील बंदरांसाठी ३१२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिरकरवाडा टप्पा - २चा समावेश आहे, तर सिंधुदुर्गातील आनंदवाडी येथे मासेमारी बंदर उभारण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील करंजा येथे मासे उतरविण्यासाठी बंदर बांधण्यात येणार आहे.विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात सोमवारी मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने झाली. या भाषणामध्ये त्यावेळी त्यांनी रत्नागिरीतील मिरकरवाडा टप्पा - २च्या कामाबाबत माहिती दिली. मिरकरवाडा बंदर टप्पा २च्या कामाला प्रारंभ होऊन प्राथमिक टप्प्यात ब्रेकवॉटर वॉल उभारणे व टेट्रापॉड टाकणे अशा कामांचा प्रारंभ झालेला आहे. त्यामध्ये जुन्या ब्रेकवॉटरवॉलची नव्याने १५९ मीटर लांबी वाढवण्यात आली आहे.

हे काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर असून, अजून काँक्रिटीकरणाचे काम बाकी आहे, तर बंदराला नव्याने आणखी ६७५ मीटरची ब्रेक वॉटरवॉल उभारण्यात येत आहे. या वॉलचे ५२५ मीटरचे काम पूर्णत्त्वाकडे गेलेले आहे. टप्पा २च्या कामासाठी एकूण ७३ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ दोन ब्रेकवॉटरच्या होत असलेल्या कामांवरच ५२ कोटी रुपयांचा निधी खर्ची पडल्याचे सांगितले जात आहे.केंद्र आणि राज्य शासनाचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत मच्छिमारांना आवश्यक असणाऱ्या बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मिरकरवाडा टप्पा-२चे काम हाती घेण्यात आले असले तरी या कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे काम थांबले आहे. यासंदर्भात दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत यावर चर्चाही करण्यात आली होती. या चर्चेमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, शासनाने ३५ कोटी देण्याचे मान्य केले आहेत.दिल्लीतील बैठकीनंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील टप्पा २चे काम सुरू असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. देवगड) येथे आणखी दुसरे ८८ कोटी रुपये खर्चाचे मोठे मासेमारी बंदर उभारण्यात येणार आहे.

करंजा (जि. रायगड) येथे १५० कोटी रुपये खर्चाचा मासळी उतरविण्याचा मोठा बंदर प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. असल्याचेही राज्यपाल यांनी यावेळी बोलतानासांगितले.मिरकरवाडा टप्पा २चे काम हाती घेतलेले असतानाच ज्या जागेत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. त्या अद्याप तेथेच आहेत. या झोपड्या हटविल्यानंतर पुन्हा तेथे उभारण्यात आल्या. काही झोपड्यांचे पक्के बांधकाम करण्यात आल्याने या झोपड्या हटविण्यात अडथळे येत आहेत.बंदराच्या टप्पा २मधील जेटीची कामे, पथदीप, रस्ते दुरूस्ती, शीतगृह, स्टोअरेज, शौचालये आदी सर्व सोयी-सुविधा उभारणीची मोठी कामे बाकी आहेत. या बंदारात जेटींची पुनर्बांधणी, १६मीटरचे ३०० ट्रॉलर्स आणि १७ मीटरचे २०० पर्ससीन-तथा-ट्रॉलर्स अशा एकूण ५०० नौकांसाठी मासे उतरविण्याच्या जागा, आऊटफिटिंग, नौका दुरूस्ती, नौका पार्किंग आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे नियोजित केले आहे.मिरकरवाडा बंदर टप्पा २ पूर्ण झाल्यानंतर देशातील प्रथम क्रमांकाचे अद्ययावत बंदर उदयास येईल, असे सांगितले जात आहे. त्या कामांना अजूनही प्रारंभ झालेला नाही. दोन ब्रेक वॉटरवॉलवरच आतापर्यंत ५२कोटीचा निधी खर्ची पडला आहे.

टॅग्स :Mirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरी