शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

वादळी परिस्थितीमुळे बुरोंडी समुद्रात चार बोटी बुडाल्या-सात खलाशांना वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:17 IST

दापोली : तालुक्यातील बुरोंडी बंदरात निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीने मच्छिमारांना चांगलाच दणका दिला. शनिवारी किनारपट्टी भागात झालेल्या वादळामुळे ४ ...

ठळक मुद्देफयान वादळाच्या आठवणी झाल्या ताज्या

दापोली : तालुक्यातील बुरोंडी बंदरात निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीने मच्छिमारांना चांगलाच दणका दिला. शनिवारी किनारपट्टी भागात झालेल्या वादळामुळे ४ बोटी उलट्या झाल्या. सुदैवाने खलाशांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. फयान वादळानंतर पहिल्यांदाच या वादळी स्थितीने पोटात भिती निर्माण केली होती, अशी प्रतिक्रिया मच्छिमारांनी बोलताना व्यक्त केली.

दक्षिणेकडून अचानकपणे आलेल्या वादळी वाºयामुळे शनिवारी दुपारी बुरोंडी बंदरातील किनारपट्टी भागात मच्छिमारी करणाºया चार पारंपरिक बोटी भरकटल्या. बोटीवरील ७ खलाशी समुद्रात बुडाले. सुदैवाने याच भागात असलेल्या काही मच्छिमारांना ही बाब समजली. त्यांनी एकेक खलाशाचा शोध सुरु केला. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सातही खलाशांना वाचवण्यात यश आले.

यामध्ये चार खलाशी जखमी झाले होते. त्यांना दापोलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर या चारहीजणांना सोडून देण्यात आले. समुद्र्रात अचानक  फयानसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छिमार बांधवांचा एकच गोंधळ उडाला. या वादळामुळे लाखो रुपयाचे मच्छीमार बोटीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने खलाशी बचावले आहेत. फयान वादळासारखीच ही परिस्थिती होती. त्यामुळे फयान वादळाच्या आठवणी ताज्या झाल्या. बोट कलंडल्यानंतर क्षणभर काहीच कळाले नाही. आम्ही समुद्रात गटांगळ्या खाऊ लागलो. सुदैवाने किनारपट्टीतील नागरिकांनी तसेच समुद्रात असलेल्या मच्छिमारांनी पाहिले आणि त्यांनी आमचा जीव वाचवला नाहीतर आम्ही वाचूच शकलो नसतो, अशी प्रतिक्रिया बचावलेल्या खलाशांनी दिली.

 

बंदरात जेटी नसल्यामुळे वादळी वाºयाने वारंवार मच्छीमारांचे नुकसान होत आहे. झालं ते खूप झालं, सरकारने आता तरी लक्ष द्यावे. जेटीअभावी  बुरोंडी बंदरातील मच्छिमार बांधवांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. फयानसारखा धोका टाळण्यासाठी जेटी होणे गरजचे आहे.-चंद्रकांत खळे,माजी अध्यक्ष, बुरोंडी मच्छीमार सोसायटी

 

समुद्र्रात वादळ झाल्यास बुरोंडी बंदरात बोटी लावण्यासाठी सुरक्षित जागा नाही , बोटी उभ्या करण्यासाठी दाभोळ किंवा हर्णै बंदरात घेऊन जावे लागते, मात्र मध्येच वादळाने गाठल्यास मोठी हानी होत आहे. फयान वादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, आतासुद्धा खूप नुकसान झालं आहे.-महादेव बेंदरकर,उपाध्यक्ष, बुरोंडी मच्छीमार सोसायटी.

 

शनिवारच्या वादळी थरारनाट्यात काही स्थानिक मच्छिमार बांधवांमुळे खलाशी सुदैवाने बचावले आहेत. कोकणातील मासेमार मत्स्यदुष्काळसारख्या परिस्थितीचा सामना करत असताना दुसरीकडे मात्र, अचानक दक्षिणेकडून आलेल्या वादळांमुळे मासेमारी व्यवसाय ठप्प असून मासेमारी बोटी किनाºयावर नांगर टाकून उभ्या आहेत.-राजन काळेपाटील, मच्छीमार, बुरोंडी

 

समुद्र्रात फयानसारखं वादळ निर्माण झालं होत. या वादळामुळे आमची बोट उलटली. आम्ही समुद्रात कोसळलो. स्थानिक मच्छिमारांनी आम्हाला मदतीचा हात दिला. नाहीतर... विचारच करवत नाही.-केशव पाटील, जखमी मच्छीमार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण