शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

अखेर २० खाड्यांमधील गाळ उपसा करणार?, चेंडू आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:59 IST

Mirkarwada Bandar, ratnagirinews, वर्षानुवर्षे समुद्राच्या खाड्यांमधील गाळ उपसा न झाल्याने या खाड्या धोकादायक बनल्या आहेत. या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौका अपघातग्रस्त होत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर केला आहे. त्यामुळे आता लवकरच या खाड्यांमधील गाळ उपसा होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

ठळक मुद्देसहाय्यक मत्स्य संचालक विभागाचा प्रस्ताव दापोली तालुक्यात सर्वाधिक गरज

रत्नागिरी : वर्षानुवर्षे समुद्राच्या खाड्यांमधील गाळ उपसा न झाल्याने या खाड्या धोकादायक बनल्या आहेत. या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौका अपघातग्रस्त होत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर केला आहे. त्यामुळे आता लवकरच या खाड्यांमधील गाळ उपसा होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असल्याने खाड्यांचे प्रमाणही मोठे आहे. या खाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. त्यामुळे मच्छिमारांचा उदरनिर्वाह यावर होत असतो. मात्र, वर्षानुवर्षे या खाड्यांमध्ये साचलेला गाळ अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे खाड्यांच्या मुखाशी असलेल्या या गाळांमध्ये अनेक नौका अडकून दुर्घटनाग्रस्त झाल्या आहेत. त्यात अनेकांचा बळीही गेला आहे.या दुर्घटना रोखण्यासाठी येथील येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ उपसा व्हावा, यासाठी मत्स्य आयुक्त अतुल पटणे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठीचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे.जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ उपसा करण्यासाठी विस्तृत आराखडाही तयार करण्यात आला आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्त नागनाथ भादुले, अधिकारी संतोष देसाई, परवाना अधिकारी रश्मी आंबुलकर यांनी मत्स्य आयुक्त अतुल पटणे, प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार केला आहे. येत्या अधिवेशनात हा आराखडा सादर करण्यात येणार आहे. प्रत्येक खाडीसाठी १ कोटी रुपये असा २० कोटी रुपयांचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे.या खाड्यांमध्ये कामसाखरीनाटे, हर्णै, बाणकोट, केळशी, सालदुरे, अडखळ, आंजर्ले, मिरकरवाडा, मांडवी, काळबादेवी, गोळप, पालशेत, आडे - उटंबर, तुळसुंदे, दाभोळखाडी, चिंचबंदर, पडवे, पूर्णगड, जैतापूर, जयगड. 

टॅग्स :Mirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरी