शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर २० खाड्यांमधील गाळ उपसा करणार?, चेंडू आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:59 IST

Mirkarwada Bandar, ratnagirinews, वर्षानुवर्षे समुद्राच्या खाड्यांमधील गाळ उपसा न झाल्याने या खाड्या धोकादायक बनल्या आहेत. या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौका अपघातग्रस्त होत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर केला आहे. त्यामुळे आता लवकरच या खाड्यांमधील गाळ उपसा होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

ठळक मुद्देसहाय्यक मत्स्य संचालक विभागाचा प्रस्ताव दापोली तालुक्यात सर्वाधिक गरज

रत्नागिरी : वर्षानुवर्षे समुद्राच्या खाड्यांमधील गाळ उपसा न झाल्याने या खाड्या धोकादायक बनल्या आहेत. या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौका अपघातग्रस्त होत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर केला आहे. त्यामुळे आता लवकरच या खाड्यांमधील गाळ उपसा होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असल्याने खाड्यांचे प्रमाणही मोठे आहे. या खाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. त्यामुळे मच्छिमारांचा उदरनिर्वाह यावर होत असतो. मात्र, वर्षानुवर्षे या खाड्यांमध्ये साचलेला गाळ अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे खाड्यांच्या मुखाशी असलेल्या या गाळांमध्ये अनेक नौका अडकून दुर्घटनाग्रस्त झाल्या आहेत. त्यात अनेकांचा बळीही गेला आहे.या दुर्घटना रोखण्यासाठी येथील येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ उपसा व्हावा, यासाठी मत्स्य आयुक्त अतुल पटणे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठीचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे.जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ उपसा करण्यासाठी विस्तृत आराखडाही तयार करण्यात आला आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्त नागनाथ भादुले, अधिकारी संतोष देसाई, परवाना अधिकारी रश्मी आंबुलकर यांनी मत्स्य आयुक्त अतुल पटणे, प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार केला आहे. येत्या अधिवेशनात हा आराखडा सादर करण्यात येणार आहे. प्रत्येक खाडीसाठी १ कोटी रुपये असा २० कोटी रुपयांचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे.या खाड्यांमध्ये कामसाखरीनाटे, हर्णै, बाणकोट, केळशी, सालदुरे, अडखळ, आंजर्ले, मिरकरवाडा, मांडवी, काळबादेवी, गोळप, पालशेत, आडे - उटंबर, तुळसुंदे, दाभोळखाडी, चिंचबंदर, पडवे, पूर्णगड, जैतापूर, जयगड. 

टॅग्स :Mirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरी