शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

अखेर २० खाड्यांमधील गाळ उपसा करणार?, चेंडू आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:59 IST

Mirkarwada Bandar, ratnagirinews, वर्षानुवर्षे समुद्राच्या खाड्यांमधील गाळ उपसा न झाल्याने या खाड्या धोकादायक बनल्या आहेत. या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौका अपघातग्रस्त होत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर केला आहे. त्यामुळे आता लवकरच या खाड्यांमधील गाळ उपसा होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

ठळक मुद्देसहाय्यक मत्स्य संचालक विभागाचा प्रस्ताव दापोली तालुक्यात सर्वाधिक गरज

रत्नागिरी : वर्षानुवर्षे समुद्राच्या खाड्यांमधील गाळ उपसा न झाल्याने या खाड्या धोकादायक बनल्या आहेत. या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौका अपघातग्रस्त होत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर केला आहे. त्यामुळे आता लवकरच या खाड्यांमधील गाळ उपसा होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असल्याने खाड्यांचे प्रमाणही मोठे आहे. या खाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. त्यामुळे मच्छिमारांचा उदरनिर्वाह यावर होत असतो. मात्र, वर्षानुवर्षे या खाड्यांमध्ये साचलेला गाळ अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे खाड्यांच्या मुखाशी असलेल्या या गाळांमध्ये अनेक नौका अडकून दुर्घटनाग्रस्त झाल्या आहेत. त्यात अनेकांचा बळीही गेला आहे.या दुर्घटना रोखण्यासाठी येथील येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ उपसा व्हावा, यासाठी मत्स्य आयुक्त अतुल पटणे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठीचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे.जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ उपसा करण्यासाठी विस्तृत आराखडाही तयार करण्यात आला आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्त नागनाथ भादुले, अधिकारी संतोष देसाई, परवाना अधिकारी रश्मी आंबुलकर यांनी मत्स्य आयुक्त अतुल पटणे, प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार केला आहे. येत्या अधिवेशनात हा आराखडा सादर करण्यात येणार आहे. प्रत्येक खाडीसाठी १ कोटी रुपये असा २० कोटी रुपयांचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे.या खाड्यांमध्ये कामसाखरीनाटे, हर्णै, बाणकोट, केळशी, सालदुरे, अडखळ, आंजर्ले, मिरकरवाडा, मांडवी, काळबादेवी, गोळप, पालशेत, आडे - उटंबर, तुळसुंदे, दाभोळखाडी, चिंचबंदर, पडवे, पूर्णगड, जैतापूर, जयगड. 

टॅग्स :Mirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरी