शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:01 IST

२० एमएमएटीपीए एवढ्या क्षमतेच्या या रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार एकर आणि क्रूड ऑइल टर्मिनलसाठी १,००० एकर जागा लागणार आहे.

रत्नागिरी : बारसू (ता. राजापूर) येथे होणाऱ्या केंद्र सरकारच्या बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पात उपयोगात येणारे पाणी आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पुनर्वापर प्रक्रिया यांचा वापर करून त्याचा पुनर्वापर या रिफायनरीमध्येच करण्यात येणार आहे. त्यामुळे हे पाणी बाहेर सोडले जाणार नाही. या प्रकल्पात शून्य द्रव उत्सर्जित होणार असल्याने कोकणच्या दृष्टीने पर्यावरणाला पूरक असणारा असा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प प्रदूषणकारी असल्याने रत्नागिरीला हानिकारक असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात असल्याने यातून या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. २० एमएमएटीपीए एवढ्या क्षमतेच्या या रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार एकर आणि क्रूड ऑइल टर्मिनलसाठी १,००० एकर जागा लागणार आहे.प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा हरित असल्याने जगातील बहुतेक रिफायनरीपेक्षा अधिक हरित आणि स्वच्छ असणार आहे. ही रिफायनरी हरित करण्यासाठी विशिष्ट अशी रचना करण्यात आली आहे. या रिफायनरीमध्ये उपयोगात येणारे पाणी आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक पुनर्वापर प्रक्रिया यांचा वापर करून  रिफायनरीमध्येच पुनर्वापर होणार आहे. त्यामुळे हे  पाणी बाहेर सोडले जाणार नाही. कार्बन उत्सर्जन कमीत कमी असणारी जागतिक दर्जाची ऊर्जा आणि तंत्रज्ञानाचा वापर होणार असून वायू उत्सर्जन करताना ऑनलाइन तपासणी यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यायोगे वायू परिमाण सातत्याने तपासणी नियंत्रित केली जाणार आहे. कमी कार्बन उत्सर्जन असणाऱ्या इंधनांचा वापर करण्यात येणार आहे. 

कसा असेल प्रकल्प --     दाेन लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित.-     भारतातील सार्वजनिक तेल क्षेत्रातील इंडियन ऑइल काॅर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड या प्रमुख तेल कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे.-     साैदी येथील M/S Saudi Aramco आणि यूएई येथील ADNOC दोन जागतिक स्तरावरील कंपन्या गुंतवणुकीसाठी इच्छुक.  

टॅग्स :konkanकोकणBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पRatnagiriरत्नागिरी