शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

कुठे शोधणार वारसदार? मुंबई-गोवा महामार्गाचा 4.5 टक्के मोबदला पडून

By शोभना कांबळे | Updated: September 2, 2022 20:53 IST

काही गावांमध्ये वारसांनी काही वर्षांपूर्वीच स्थलांतर केले असल्याने त्यांचे पत्ते शोधणे अवघड झाले आहे.

शोभना कांबळे

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील १०१ गावांना आतापर्यंत १९८४ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, काही वारसदारांना पोटीसा पाठवूनही त्यांनी मोबदल्याची रक्कम न नेल्याने सुमारे साडेचार टक्के मोबदल्याची रक्कम अजूनही प्रशासनाकडे पडून आहे. काही गावांमध्ये वारसांनी काही वर्षांपूर्वीच स्थलांतर केले असल्याने त्यांचे पत्ते शोधणे अवघड झाले आहे.

२०६.२६ किलोमीटरच्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ साठी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या सहा तालुक्यांमधील १०१ गावांमधील ४४१.४७ इतके क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. भूसंपादन संस्थेकडून निवाडा जाहीर झाल्यानंतर मार्च २०१७ सालापासून जमीनमालकांना माेबदला देण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या १०१ गावांसाठी २०७७ कोटी २८ लाख एवढा निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला आहे. त्यापैकी या गावांतील खातेदारांना १९८४.२४ कोटी (९५.५२ टक्के) एवढी मोबदल्याची रक्कम वितरीत करण्यात आली आहे तर ९३.०४ कोटी (४.४८ टक्के) एवढा निधी प्रशासनाकडे अजूनही जमा आहे. काही खातेदार मुंबई किंवा अन्य शहरात नोकरी, धंद्यानिमित्त स्थलांतरीत झालेले आहेत. त्यामुळे काहींचे प्रकरण न्यायालय प्रविष्ठ असल्याने त्याचा निर्णय प्रलंबित असल्याने हा निधी अद्याप वितरीत झालेला नाही. त्याचबरोबर काही खातेदारांच्या पत्त्यावर मोबदल्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र, काही खातेदार त्या पत्त्यावर राहात नसल्याने त्यांचाही मोबदला अद्याप पडूनच आहे. त्यामुळे मोबदल्याची रक्कम सुमारे ९६ टक्के वितरीत करण्यात आली असली तरी उर्वरित साडेचार टक्के निधीत वारसच आले नसल्याचे प्रमाण जास्त आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी