शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कुठे शोधणार वारसदार? मुंबई-गोवा महामार्गाचा 4.5 टक्के मोबदला पडून

By शोभना कांबळे | Updated: September 2, 2022 20:53 IST

काही गावांमध्ये वारसांनी काही वर्षांपूर्वीच स्थलांतर केले असल्याने त्यांचे पत्ते शोधणे अवघड झाले आहे.

शोभना कांबळे

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील १०१ गावांना आतापर्यंत १९८४ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, काही वारसदारांना पोटीसा पाठवूनही त्यांनी मोबदल्याची रक्कम न नेल्याने सुमारे साडेचार टक्के मोबदल्याची रक्कम अजूनही प्रशासनाकडे पडून आहे. काही गावांमध्ये वारसांनी काही वर्षांपूर्वीच स्थलांतर केले असल्याने त्यांचे पत्ते शोधणे अवघड झाले आहे.

२०६.२६ किलोमीटरच्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ साठी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या सहा तालुक्यांमधील १०१ गावांमधील ४४१.४७ इतके क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. भूसंपादन संस्थेकडून निवाडा जाहीर झाल्यानंतर मार्च २०१७ सालापासून जमीनमालकांना माेबदला देण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या १०१ गावांसाठी २०७७ कोटी २८ लाख एवढा निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला आहे. त्यापैकी या गावांतील खातेदारांना १९८४.२४ कोटी (९५.५२ टक्के) एवढी मोबदल्याची रक्कम वितरीत करण्यात आली आहे तर ९३.०४ कोटी (४.४८ टक्के) एवढा निधी प्रशासनाकडे अजूनही जमा आहे. काही खातेदार मुंबई किंवा अन्य शहरात नोकरी, धंद्यानिमित्त स्थलांतरीत झालेले आहेत. त्यामुळे काहींचे प्रकरण न्यायालय प्रविष्ठ असल्याने त्याचा निर्णय प्रलंबित असल्याने हा निधी अद्याप वितरीत झालेला नाही. त्याचबरोबर काही खातेदारांच्या पत्त्यावर मोबदल्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र, काही खातेदार त्या पत्त्यावर राहात नसल्याने त्यांचाही मोबदला अद्याप पडूनच आहे. त्यामुळे मोबदल्याची रक्कम सुमारे ९६ टक्के वितरीत करण्यात आली असली तरी उर्वरित साडेचार टक्के निधीत वारसच आले नसल्याचे प्रमाण जास्त आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी