शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दोन वर्षं झाली की हो; २२ गावकऱ्यांचा बळी घेणाऱ्या तिवरे धरणफुटीचा अहवाल कुठे मुरला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 15:21 IST

संदीप बांद्रे चिपळूण : तालुक्यातील तिवरे - भेंदवाडी येथील धरणफुटीला दोन वर्षे पूर्ण होत आली तरी याप्रकरणी अद्याप कोणावरही ...

संदीप बांद्रे

चिपळूण : तालुक्यातील तिवरे - भेंदवाडी येथील धरणफुटीला दोन वर्षे पूर्ण होत आली तरी याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. या दुर्घटनेनंतर शासनाने स्थापन केलेले विशेष चौकशी पथक व पुनर्विलोकन समिती यांचे अहवाल अद्यापही गुलदस्त्यात का आहेत? तिवरे धरणफुटीप्रकरणी संबंधित जबाबदार लोकांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न चिपळूणवासीयांमधून विचारला जात आहे.

तालुक्यातील तिवरे - भेंदवाडी येथील धरण २ जुलै २०१९ रोजी फुटल्याने मोठी जीवित व वित्तहानी झाली. यामध्ये २२ ग्रामस्थांचा नाहक बळी गेला. या दुर्घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेत ६ जुलै २०१९ रोजीच्या आदेशान्वये या जीवित व वित्तहानीप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमले. या पथकात पथक प्रमुख अविनाश सुर्वे (सचिव, जलसंपदा तथा कार्यकारी संचालक, विदर्भ सिंचन विकास महामंडळ, नागपूर), सदस्य - मुख्य अभियंता (लघुसिंचन) जलसंधारण, जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांचा समावेश करण्यात आला. या पथकाने तिवरे धरणफुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे व त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे, लघु सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, माल गुजारी तलाव व इतर तत्सम बाबतीत भविष्यात अशा घटना घडू नयेत, याकरिता उपाय सुचवणे. या पथकाने आपला अहवाल दोन महिन्यांच्या आत शासनाला सादर करावा, असे या आदेशानव्ये स्पष्ट करण्यात आले होते.

त्यानुसार या विशेष पथकाने आपला अहवाल सादर केल्यानंतर पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली. या समितीला आणखी दोन महिन्यांची म्हणजेच २० फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, या पुनर्विलोकन समितीच्या अहवालाचे पुढे काय झाले, हे अजूनही कळले नाही. एकंदरीत तिवरे धरणफुटीप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच तिवरे धरणग्रस्तांचे अद्यापही काही प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे तिवरे धरणग्रस्तांसह मृत ग्रामस्थांना न्याय मिळणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

टॅग्स :floodपूरRatnagiriरत्नागिरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार