शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

भरडले जाणारे जागे कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST

मारुतीचं शेपूट वाढत जातं, तशी महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यापूर्वी महागाई झाल्यानंतर वातावरण पेटत होते. मात्र, आता गॅस ...

मारुतीचं शेपूट वाढत जातं, तशी महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यापूर्वी महागाई झाल्यानंतर वातावरण पेटत होते. मात्र, आता गॅस सिलिंडर कुठेही कोणीही डोक्यावर घेऊन रस्त्यावर आलेले दिसत नाही. त्यामुळे आता गरिबांना कोणीही वाली उरलेला नाही. कारण दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असली तरी ग्रामीण, शहरात, राज्यात आणि देशात वेगळेच प्रश्न उपस्थित करुन आंदोलने पेटविली जात असली तरी महागाईविरोधात कोणतेही आंदोलन पेटताना दिसत नाही. जे सर्वसामान्य लोक यात भरडले जात आहेत, तेच मुळात जागे नसल्याने आवाज उठवणार कोण, हाच मोठा प्रश्न आहे. गरीब मेला तरी चालेल, पण किमती वाढल्याच पाहिजेत, अशा भूमिकेत राजकीय पक्षांची नेतेमंडळी मिरवताना दिसत आहेत.

दररोज वेगवेगळ्या प्रश्नांवर राजकीय मंडळी मुलाखती देताना दिसतात. पण महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर कोणीही ब्र सुध्दा काढताना दिसत नाही. यापेक्षा गोरगरिबांचे दुर्दैव नाही. महागाईने गरीब भरडला जात आहे, याचा विचार करण्यासाठी कोणालाही वेळ मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महागाई कमी होईल, गरिबांना दोन घास जास्त घेता येतील, तसेच काही तरी पैसे बाजूला ठेवता येतील, असेही आता वाटत नाही. त्यामुळे गरीब आणखीच गरीब होत चालला आहे, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

जणू काही लोकांना महागाईची सवयच लागलेली आहे, असे म्हटल्यावर चुकीचे ठरणार नाही. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर यांचे दर पेटले आहेत. इंधन महाग झाल्याने अन्नधान्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खासगी नोकर, कर्मचाऱ्यांची नोकरी राहीलच, याचा नेम नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. उत्पादनच नसेल तर नोकरवर्ग ठेवून काय करणार, असा विचार प्रत्येक व्यापारी, उद्याेगपती करीत असल्याने त्यात काय चूक आहे. मात्र, अनेक वर्षे प्रचंड नफा कमवून देणाऱ्या नोकर, कर्मचाऱ्यांचा विचार होणे आवश्यक आहे. तसा विचार कोणीही करीत नसल्याने आज अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली असतानाच त्यांना आणखी मारक ठरली आहे ती महागाई.

राजकीय पक्षांनी गरीब जनतेचा विचार करणे अपेक्षित आहे. सत्तेवर आल्यानंतर त्या गरीबांना कोण विचारतो, अशी स्थिती आहे. केवळ गरीबांचा, सर्वसामान्यांचा मतांसाठी वापर करुन नंतर त्यांना पाठीशी नाचवायचं, असाच प्रकार सुरु आहे. त्यामुळे जनतेला कोणीही जुमानत नाहीत. त्यांच्या मूळ समस्या, प्रश्नांकडे कोणालाही लक्ष देण्यासाठी वेळ नाही. गरीब, सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. कोट्यवधींच्या घोषणा करण्यात येतात. मात्र, त्याचा लाभ गरिबांपर्यंत मिळतो काय, याचा विचार कोण करणार, याची विचारणा कोण करणार. राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यामध्ये माहीर झाले आहेत. केवळ चुका पाहून दररोज स्वत:च्या प्रसिध्दीच्या मागे लागण्यापेक्षा महागाईवर बोलावे. मंदिर-मशीद, जात-धर्मापलिकडे काही आहे की नाही. लोक बेरोजगारी, गरीबीमुळे हैराण झाले आहेत. अन्नधान्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत तसेच त्यांच्या रोजगाराबाबत बोला, ते न बोलता केवळ राजकारण खेळत बसायचे, असा प्रकार सुरु आहे. हे कोठेही थांबायला पाहिजेत. याचा प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करावा, अन्य जनता कधीही माफ करणार नाही.