शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

भरडले जाणारे जागे कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST

मारुतीचं शेपूट वाढत जातं, तशी महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यापूर्वी महागाई झाल्यानंतर वातावरण पेटत होते. मात्र, आता गॅस ...

मारुतीचं शेपूट वाढत जातं, तशी महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यापूर्वी महागाई झाल्यानंतर वातावरण पेटत होते. मात्र, आता गॅस सिलिंडर कुठेही कोणीही डोक्यावर घेऊन रस्त्यावर आलेले दिसत नाही. त्यामुळे आता गरिबांना कोणीही वाली उरलेला नाही. कारण दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असली तरी ग्रामीण, शहरात, राज्यात आणि देशात वेगळेच प्रश्न उपस्थित करुन आंदोलने पेटविली जात असली तरी महागाईविरोधात कोणतेही आंदोलन पेटताना दिसत नाही. जे सर्वसामान्य लोक यात भरडले जात आहेत, तेच मुळात जागे नसल्याने आवाज उठवणार कोण, हाच मोठा प्रश्न आहे. गरीब मेला तरी चालेल, पण किमती वाढल्याच पाहिजेत, अशा भूमिकेत राजकीय पक्षांची नेतेमंडळी मिरवताना दिसत आहेत.

दररोज वेगवेगळ्या प्रश्नांवर राजकीय मंडळी मुलाखती देताना दिसतात. पण महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर कोणीही ब्र सुध्दा काढताना दिसत नाही. यापेक्षा गोरगरिबांचे दुर्दैव नाही. महागाईने गरीब भरडला जात आहे, याचा विचार करण्यासाठी कोणालाही वेळ मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महागाई कमी होईल, गरिबांना दोन घास जास्त घेता येतील, तसेच काही तरी पैसे बाजूला ठेवता येतील, असेही आता वाटत नाही. त्यामुळे गरीब आणखीच गरीब होत चालला आहे, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

जणू काही लोकांना महागाईची सवयच लागलेली आहे, असे म्हटल्यावर चुकीचे ठरणार नाही. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर यांचे दर पेटले आहेत. इंधन महाग झाल्याने अन्नधान्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खासगी नोकर, कर्मचाऱ्यांची नोकरी राहीलच, याचा नेम नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. उत्पादनच नसेल तर नोकरवर्ग ठेवून काय करणार, असा विचार प्रत्येक व्यापारी, उद्याेगपती करीत असल्याने त्यात काय चूक आहे. मात्र, अनेक वर्षे प्रचंड नफा कमवून देणाऱ्या नोकर, कर्मचाऱ्यांचा विचार होणे आवश्यक आहे. तसा विचार कोणीही करीत नसल्याने आज अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली असतानाच त्यांना आणखी मारक ठरली आहे ती महागाई.

राजकीय पक्षांनी गरीब जनतेचा विचार करणे अपेक्षित आहे. सत्तेवर आल्यानंतर त्या गरीबांना कोण विचारतो, अशी स्थिती आहे. केवळ गरीबांचा, सर्वसामान्यांचा मतांसाठी वापर करुन नंतर त्यांना पाठीशी नाचवायचं, असाच प्रकार सुरु आहे. त्यामुळे जनतेला कोणीही जुमानत नाहीत. त्यांच्या मूळ समस्या, प्रश्नांकडे कोणालाही लक्ष देण्यासाठी वेळ नाही. गरीब, सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. कोट्यवधींच्या घोषणा करण्यात येतात. मात्र, त्याचा लाभ गरिबांपर्यंत मिळतो काय, याचा विचार कोण करणार, याची विचारणा कोण करणार. राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यामध्ये माहीर झाले आहेत. केवळ चुका पाहून दररोज स्वत:च्या प्रसिध्दीच्या मागे लागण्यापेक्षा महागाईवर बोलावे. मंदिर-मशीद, जात-धर्मापलिकडे काही आहे की नाही. लोक बेरोजगारी, गरीबीमुळे हैराण झाले आहेत. अन्नधान्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत तसेच त्यांच्या रोजगाराबाबत बोला, ते न बोलता केवळ राजकारण खेळत बसायचे, असा प्रकार सुरु आहे. हे कोठेही थांबायला पाहिजेत. याचा प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करावा, अन्य जनता कधीही माफ करणार नाही.