शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

रत्नागिरी-मुंबई विमानसेवेची कॅप्टन शिवानी असेल - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 12:23 IST

रत्नागिरी : रत्नागिरी -मुंबई विमानसेवा सुरू झाली की, आपल्या रत्नागिरीचा अभिमान असलेली शिवानी नागवेकर ही त्या विमानाची कॅप्टन असेल ...

रत्नागिरी : रत्नागिरी-मुंबई विमानसेवा सुरू झाली की, आपल्या रत्नागिरीचा अभिमान असलेली शिवानी नागवेकर ही त्या विमानाची कॅप्टन असेल आणि पहिल्या विमानात मी आणि बाळासाहेब असणार, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीतील भाई विलणकर यांची नात शिवाजी नागवेकर हिने महिला वैमानिक हाेण्याचा मान मिळविला आहे. यानिमित्त तिचा माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात नागरी सत्काराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सत्कार साेहळ्याला माजी आमदार बाळ माने, माजी कुलगुरू श्रीरंग कद्रेकर, उद्याेजक रवींद्र सामंत, भाऊ शेट्ये, मिलिंद कीर, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित हाेते.मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, तिने किती कष्ट केले आहेत, ती कशी इथपर्यंत पाेहाेचली आहे, काेणत्या प्रसंगातून गेली आहे हे तिने सांगितले आहे; पण, प्रसंग तिनेही कुठेतरी लिहून ठेवले पाहिजेत. भविष्यात आपण काेठेही असू; पण मागे आपण किती कष्ट घेतले आहेत, हे लाेकांना कळले पाहिजे. शिवानीसारख्या विद्यार्थ्यांना कळले पाहिजे. तुझ्यानंतर तयारी हाेणारी जी पिढी आहे, त्यांनाही कळले पाहिजे. पायलट म्हणून काम करीत असताना रत्नागिरी विमानतळाचा उल्लेख झाला. बाळासाहेबांनी सांगितले आहे की, विमानतळ येथे सुरू हाेणार; पण आज रत्नागिरीकरांच्या समाेर सांगताे की, विमानतळ सुरू करणार आणि पहिल्या विमानात शिवानी, मी आणि बाळासाहेब असणार, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, आपण जरी माेठे हाेताे, पण आपल्यातील नेतृत्वाला रत्नागिरीने जन्म दिलेला आहे. आपल्या पालकांनी, शिक्षणाने नेतृत्वाला जन्म दिलेला आहे हे जरी सांभाळलेस, तर रत्नागिरीकर तुला खांद्यावर घेऊन नाचतील, असेही सामंत म्हणाले. ज्यावेळी याठिकाणी एखादी इन्स्टीट्यूट बांधताे त्याचे नेतृत्व रत्नागिरीकर म्हणून करण्याची ताकद तुझ्या मनगटात असावी, असे सामंत म्हणाले. शिवानीमुळे विलणकर किंवा नागवेकरांचे नाव माेठे झाले नाही तर रत्नागिरीचे नाव माेठे झाले, असेही मंत्री सामंत म्हणाले.

अशी काेपरखळीबसस्थानक पण सुरू करणार बसस्थानकावर विमान मात्र लावणार नाही. कारण हल्ली बसस्थानकावर विमानदेखील लावण्याची प्रवृत्ती वाढतेय; पण शिवानीचे विमानतळ हे रत्नागिरीच्या विमानतळावरच १०० टक्केच उतरणार, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत