शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

परीक्षा रद्द करून काय होणार साध्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST

मुलांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न असल्याने निर्माण झालेल्या संकटकालीन परिस्थितीत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र भविष्यात मुलांच्या ...

मुलांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न असल्याने निर्माण झालेल्या संकटकालीन परिस्थितीत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र भविष्यात मुलांच्या करिअरवर परिणाम होण्याचा धोका आहे. परीक्षा न घेता मुले पास करण्याच्या निर्णयामुळे मुलांमध्ये, पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी हे क्षणिक आहे. परीक्षा न घेण्यामुळे मुलांच्या लेखनावर परिणाम झाला असून, सराव कमी झाला आहे. शिवाय वाचन, आकलन करून पेपर सोडविण्याची पद्धत बंद पडू लागली आहे. गेल्या वर्षापासून परीक्षा रद्द करण्यात येत असल्याने दोन वर्षे विनाकष्ट, मुलांना सहज एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाता येत आहे.

विद्यापीठांनीही बहुपर्यायी पद्धतीने उन्हाळी परीक्षेचे नियोजन केले आहे. गतवर्षी रुग्णवाढीमुळे जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र ऑनलाइन सुरू होते. वेळेची मर्यादा असल्याने अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. नोव्हेंबरपासून पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. मात्र पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन सुरू होते. शासनाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे अभ्यासात हुशार असणारे, होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा एक महिना लांबणीवर गेल्या आहेत. परीक्षा लांबणीवर टाकल्याने मुलांचे नुकसान होत आहे. परीक्षा पुढे ढकलून वेळ मारली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. आता विद्यार्थी, पालकांचे लक्ष राज्य शासनाच्या बोर्डकडे लागले आहे. परीक्षा रद्द करण्याऐवजी जर शाळा पातळीवर परीक्षा घेता येतील का? मुलांच्या, शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षेबाबत प्रश्न असल्यामुळे याबाबत काही नियोजन होणे गरजेचे आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर काही प्रयत्न होणे गरजेचे आहे.

मुलांना सहज पास होण्याची सवय लागली तर मात्र अभ्यासाकडील कल कमी होणार आहे. किंबहुना आधीच कमी झाला आहे. कोरोनामुळे मुले घरात असल्याने मोबाइलकडे ओढा वाढला आहे. पालकांनी किती सांगितले तरी मोबाइलकडेच मुले अधिक आकृष्ट होत आहेत. चिडखोर, हट्टी, दंगेखोर झाल्याची तक्रार पालक करू लागले आहेत. काही जागरूक पालकच मुलांना मोबाइलपासून बाजूला ठेवून दररोज काही वेळ वाचन, व्यायाम, बैठे खेळ घेत आहेत. एकूणच मुलांचे लक्ष मोबाइलपासून दूर करण्याकरिता पालकांनी जागरूक होत घरापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. परीक्षा रद्द करण्यापेक्षा त्यातून काही मार्ग काढता येईल का, याबाबत विचार करावा. जेणेकरून मुलांच्या भविष्यात कुठेही अडसर निर्माण होणार नाही.