शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा रद्द करून काय होणार साध्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST

मुलांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न असल्याने निर्माण झालेल्या संकटकालीन परिस्थितीत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र भविष्यात मुलांच्या ...

मुलांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न असल्याने निर्माण झालेल्या संकटकालीन परिस्थितीत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र भविष्यात मुलांच्या करिअरवर परिणाम होण्याचा धोका आहे. परीक्षा न घेता मुले पास करण्याच्या निर्णयामुळे मुलांमध्ये, पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी हे क्षणिक आहे. परीक्षा न घेण्यामुळे मुलांच्या लेखनावर परिणाम झाला असून, सराव कमी झाला आहे. शिवाय वाचन, आकलन करून पेपर सोडविण्याची पद्धत बंद पडू लागली आहे. गेल्या वर्षापासून परीक्षा रद्द करण्यात येत असल्याने दोन वर्षे विनाकष्ट, मुलांना सहज एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाता येत आहे.

विद्यापीठांनीही बहुपर्यायी पद्धतीने उन्हाळी परीक्षेचे नियोजन केले आहे. गतवर्षी रुग्णवाढीमुळे जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र ऑनलाइन सुरू होते. वेळेची मर्यादा असल्याने अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. नोव्हेंबरपासून पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. मात्र पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन सुरू होते. शासनाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे अभ्यासात हुशार असणारे, होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा एक महिना लांबणीवर गेल्या आहेत. परीक्षा लांबणीवर टाकल्याने मुलांचे नुकसान होत आहे. परीक्षा पुढे ढकलून वेळ मारली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. आता विद्यार्थी, पालकांचे लक्ष राज्य शासनाच्या बोर्डकडे लागले आहे. परीक्षा रद्द करण्याऐवजी जर शाळा पातळीवर परीक्षा घेता येतील का? मुलांच्या, शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षेबाबत प्रश्न असल्यामुळे याबाबत काही नियोजन होणे गरजेचे आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर काही प्रयत्न होणे गरजेचे आहे.

मुलांना सहज पास होण्याची सवय लागली तर मात्र अभ्यासाकडील कल कमी होणार आहे. किंबहुना आधीच कमी झाला आहे. कोरोनामुळे मुले घरात असल्याने मोबाइलकडे ओढा वाढला आहे. पालकांनी किती सांगितले तरी मोबाइलकडेच मुले अधिक आकृष्ट होत आहेत. चिडखोर, हट्टी, दंगेखोर झाल्याची तक्रार पालक करू लागले आहेत. काही जागरूक पालकच मुलांना मोबाइलपासून बाजूला ठेवून दररोज काही वेळ वाचन, व्यायाम, बैठे खेळ घेत आहेत. एकूणच मुलांचे लक्ष मोबाइलपासून दूर करण्याकरिता पालकांनी जागरूक होत घरापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. परीक्षा रद्द करण्यापेक्षा त्यातून काही मार्ग काढता येईल का, याबाबत विचार करावा. जेणेकरून मुलांच्या भविष्यात कुठेही अडसर निर्माण होणार नाही.