शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

राज्य देणार नाही ते केंद्र सरकार देईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST

चिपळूण : पूर परिस्थितीचा अंदाज आपण स्वतःहून घेतला असून, ती भयावह परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने मदत करायला हवी ...

चिपळूण : पूर परिस्थितीचा अंदाज आपण स्वतःहून घेतला असून, ती भयावह परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने मदत करायला हवी होती. मात्र, ती का केली नाही, याचा जाब ठाकरे सरकारला नक्कीच विचारला जाईल. मात्र, राज्य सरकारने जे दिले नाही, ते केंद्र सरकार देईल. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे व्यापाऱ्यांना दिले.

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर आलेल्या राणे यांचे चिपळूण व्यापारी महासंघ, लोटे येथील उद्योजक संघटना, खेर्डी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व अन्य पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी राणे म्हणाले की, केंद्रात पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाले आहे. कोकणवासीयांनी दिलेल्या आशीर्वादामुळेच आतापर्यंतची पदे मिळाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग खात्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने सोपवली असून, या खात्याच्या आधारे कोकणी माणसाला प्रगतीकडे व उद्योजकतेकडे नेण्यासाठी प्रयत्न करेन.

कोकणात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणून रोजगाराच्या माध्यमातून कोकणचे दरडोई उत्पन्न व विकास दर वाढवण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. गेल्या सात वर्षात केंद्र सरकारने विविध योजना राबवल्या. देशातील नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळावे, यासाठी एक लाख ७० हजार कोटी रुपयांची योजना जाहीर केली. त्यातून आज देशातील ८० कोटी नागरिकांना लाभ होत आहे. शासनाच्या या योजनांच्या माध्यमातून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा काढल्याचेही राणे यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांना राज्य सरकारकडून मदत मिळण्याची अपेक्षा होती. ती झालेली नाही. मात्र, केंद्र सरकार ती कसर भरून काढेल, असे आश्वासन त्यांनी दिले.