शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

राज्य देणार नाही ते केंद्र सरकार देईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST

चिपळूण : पूर परिस्थितीचा अंदाज आपण स्वतःहून घेतला असून, ती भयावह परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने मदत करायला हवी ...

चिपळूण : पूर परिस्थितीचा अंदाज आपण स्वतःहून घेतला असून, ती भयावह परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने मदत करायला हवी होती. मात्र, ती का केली नाही, याचा जाब ठाकरे सरकारला नक्कीच विचारला जाईल. मात्र, राज्य सरकारने जे दिले नाही, ते केंद्र सरकार देईल. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे व्यापाऱ्यांना दिले.

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर आलेल्या राणे यांचे चिपळूण व्यापारी महासंघ, लोटे येथील उद्योजक संघटना, खेर्डी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व अन्य पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी राणे म्हणाले की, केंद्रात पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाले आहे. कोकणवासीयांनी दिलेल्या आशीर्वादामुळेच आतापर्यंतची पदे मिळाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग खात्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने सोपवली असून, या खात्याच्या आधारे कोकणी माणसाला प्रगतीकडे व उद्योजकतेकडे नेण्यासाठी प्रयत्न करेन.

कोकणात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणून रोजगाराच्या माध्यमातून कोकणचे दरडोई उत्पन्न व विकास दर वाढवण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. गेल्या सात वर्षात केंद्र सरकारने विविध योजना राबवल्या. देशातील नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळावे, यासाठी एक लाख ७० हजार कोटी रुपयांची योजना जाहीर केली. त्यातून आज देशातील ८० कोटी नागरिकांना लाभ होत आहे. शासनाच्या या योजनांच्या माध्यमातून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा काढल्याचेही राणे यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांना राज्य सरकारकडून मदत मिळण्याची अपेक्षा होती. ती झालेली नाही. मात्र, केंद्र सरकार ती कसर भरून काढेल, असे आश्वासन त्यांनी दिले.