शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘इकडे आड, तिकडे विहीर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

तसं पाहिलं तर कोकणी माणसामध्ये कमालीची सोशिकता आहे, त्याचबरोबर कमालीचा स्वाभिमानही. घरात खायला नसले, तरी दुसऱ्याच्या वळचणीला जाऊन हात ...

तसं पाहिलं तर कोकणी माणसामध्ये कमालीची सोशिकता आहे, त्याचबरोबर कमालीचा स्वाभिमानही. घरात खायला नसले, तरी दुसऱ्याच्या वळचणीला जाऊन हात पसरणे, ही त्याची वृत्तीच नाही. स्वत:कडचे देईल; पण दुसऱ्याकडचे घ्यायला त्याला तेवढाच कमीपणा वाटतो. म्हणूनच गेल्या काही वर्षांत कोकणी माणसाच्या संकटात सातत्याने भर पडत आहे. मात्र, तेवढे आघात पेलूनही त्या संकटांचा सामना करण्याचे बळ निर्माण करण्यासाठी तो कसोशीने धडपड करीत आहे. त्यातून पुन्हा नव्या दमाने उभारी घेत आहे, हे कोकणी माणसाचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. गेल्या वर्षाप्रमाणेच या वर्षातही त्याची संकटाने पाठ सोडलेली नाही. २०२१ हे वर्ष उजाडल्यानंतर कोरोनाचे संकट नष्ट होईल, असे वाटत होते. त्यामुळे या वर्षाची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा सुरू होती. हे वर्ष आले; मात्र, कोरोनाला मागे टाकून येण्याऐवजी ते कोरोनाला पुन्हा सोबत घेऊन आले. त्यामुळे हे वर्षही गेल्या वर्षाचीच पुनरावृत्ती ठरली. उलट हे वर्ष अधिकच विध्वंसक ठरले. या वर्षात कोरोनाने माणसांचा संहारच करायचा जणू पण केला आहे. अनेक कुटुंबे बाधित झाली. अनेक जवळचे आप्त जाताना बघून कुणाकुणाचे दु:ख करायचे आणि कुणाला सावरायचे, हेच काही कळेनासे झाले. मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा नंगानाच सुरूच आहे. रुग्णांच्या संख्येने ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मृत्यूची संख्याही आता हजाराच्या वाटेवर आहे. त्यातच आता ताैक्ते संकटाने दोन दिवस जिल्ह्यात धुमाकूळ माजवला होता. गेल्यावर्षीच्या निसर्ग वादळाच्या आठवणी ताज्या असतानाच, या चक्रीवादळाच्या रूपाने पुन्हा धोक्याची घंटा वाजवली. पण ‘इकडे आड, तिकडे विहीर’ या म्हणीप्रमाणे कोकणी माणूस संकटाने भयभीत झाला, तरीही तो हातपाय गाळून न घेता, त्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी करतो, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचीही कोकणावरील नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात वादळे, अतिवृष्टी, दरड कोसळणे, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती आता ठायी ठायी समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या वर्ष- दीड वर्षात कोरोना आणि नैसर्गिक आपत्ती पाठोपाठ येत आहेत. मात्र, खचून न जाता काेकणी माणूस पुन्हा नव्या दमाने उभा रहात आहे. म्हणूनच असंख्य संकटे त्याचा पाठलाग करूनही त्यातून बाहेर पडण्यात तो यशस्वी होतोय. हे आत्मबल त्याला कुठून मिळते, असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.