शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘इकडे आड, तिकडे विहीर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:32 AM

तसं पाहिलं तर कोकणी माणसामध्ये कमालीची सोशिकता आहे, त्याचबरोबर कमालीचा स्वाभिमानही. घरात खायला नसले, तरी दुसऱ्याच्या वळचणीला जाऊन हात ...

तसं पाहिलं तर कोकणी माणसामध्ये कमालीची सोशिकता आहे, त्याचबरोबर कमालीचा स्वाभिमानही. घरात खायला नसले, तरी दुसऱ्याच्या वळचणीला जाऊन हात पसरणे, ही त्याची वृत्तीच नाही. स्वत:कडचे देईल; पण दुसऱ्याकडचे घ्यायला त्याला तेवढाच कमीपणा वाटतो. म्हणूनच गेल्या काही वर्षांत कोकणी माणसाच्या संकटात सातत्याने भर पडत आहे. मात्र, तेवढे आघात पेलूनही त्या संकटांचा सामना करण्याचे बळ निर्माण करण्यासाठी तो कसोशीने धडपड करीत आहे. त्यातून पुन्हा नव्या दमाने उभारी घेत आहे, हे कोकणी माणसाचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. गेल्या वर्षाप्रमाणेच या वर्षातही त्याची संकटाने पाठ सोडलेली नाही. २०२१ हे वर्ष उजाडल्यानंतर कोरोनाचे संकट नष्ट होईल, असे वाटत होते. त्यामुळे या वर्षाची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा सुरू होती. हे वर्ष आले; मात्र, कोरोनाला मागे टाकून येण्याऐवजी ते कोरोनाला पुन्हा सोबत घेऊन आले. त्यामुळे हे वर्षही गेल्या वर्षाचीच पुनरावृत्ती ठरली. उलट हे वर्ष अधिकच विध्वंसक ठरले. या वर्षात कोरोनाने माणसांचा संहारच करायचा जणू पण केला आहे. अनेक कुटुंबे बाधित झाली. अनेक जवळचे आप्त जाताना बघून कुणाकुणाचे दु:ख करायचे आणि कुणाला सावरायचे, हेच काही कळेनासे झाले. मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा नंगानाच सुरूच आहे. रुग्णांच्या संख्येने ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मृत्यूची संख्याही आता हजाराच्या वाटेवर आहे. त्यातच आता ताैक्ते संकटाने दोन दिवस जिल्ह्यात धुमाकूळ माजवला होता. गेल्यावर्षीच्या निसर्ग वादळाच्या आठवणी ताज्या असतानाच, या चक्रीवादळाच्या रूपाने पुन्हा धोक्याची घंटा वाजवली. पण ‘इकडे आड, तिकडे विहीर’ या म्हणीप्रमाणे कोकणी माणूस संकटाने भयभीत झाला, तरीही तो हातपाय गाळून न घेता, त्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी करतो, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचीही कोकणावरील नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात वादळे, अतिवृष्टी, दरड कोसळणे, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती आता ठायी ठायी समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या वर्ष- दीड वर्षात कोरोना आणि नैसर्गिक आपत्ती पाठोपाठ येत आहेत. मात्र, खचून न जाता काेकणी माणूस पुन्हा नव्या दमाने उभा रहात आहे. म्हणूनच असंख्य संकटे त्याचा पाठलाग करूनही त्यातून बाहेर पडण्यात तो यशस्वी होतोय. हे आत्मबल त्याला कुठून मिळते, असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.